मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

औरंगाबाद मनपा निवडणूक ऐतिहासिक होणार

औरंगाबाद शहर म्हटलं की डोळ्या समोर येतात, अजिंठा - वेरुळच्या लेण्या, बीबीचा मकबरा, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, बौध्द लेणी, आणि माझं विद्यापीठ. इथल्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसी मुळं औरंगाबाद शहर आशियातील सर्वात वेगाने वाढणारे शहर बनले होते. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि जगाच्या नकाशावरील औरंगाबाद शहर - जिल्हा आहे. इथल्या जायकवाडी धरणामुळे येथील एमआयडीसी भरभराटीस आली. औरंगाबादच्या पाण्याची चव इतकी भारी की देशभरातील बियर उत्पादकांना इथं आपल्या फॅक्टरीज उभाराव्या वाटल्या. एका ऑस्ट्रेलियन बियर कंपनीने हे पाणी बियर साठी अत्यंत चांगले उपयुक्त असल्याचा अहवालदेखील दिला आहे. त्यामुळेच औरंगाबादेत देशातील प्रत्येक बियरचा कारखाना आहे. आणि आता धान्यापासून मद्यनिर्मीतीचेही कारखाने हे जायकवाडी धरणालगत पैठण एमआयडीसीतच उभारले जाऊ लागले आहेत. असं हे औद्योगिक आणि सांस्कृतिक, शैक्षणीक दृष्ट्या महत्त्वाचं शहर. औरंगाबादवर स्वातंत्र्यपूर्व काळात निजामांचा अंमल होता. औरंगाबाद हे हैद्राबादला जोडलेलं होतं. येथील जून्या इमारतीवर अजूनही निजामकालीन छाप दिसते. मलिक अंबरने या शहराची शास्त्...