मुख्य सामग्रीवर वगळा

औरंगाबाद मनपा निवडणूक ऐतिहासिक होणार

औरंगाबाद शहर म्हटलं की डोळ्या समोर येतात, अजिंठा - वेरुळच्या लेण्या, बीबीचा मकबरा, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान, बौध्द लेणी, आणि माझं विद्यापीठ. इथल्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसी मुळं औरंगाबाद शहर आशियातील सर्वात वेगाने वाढणारे शहर बनले होते. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि जगाच्या नकाशावरील औरंगाबाद शहर - जिल्हा आहे. इथल्या जायकवाडी धरणामुळे येथील एमआयडीसी भरभराटीस आली. औरंगाबादच्या पाण्याची चव इतकी भारी की देशभरातील बियर उत्पादकांना इथं आपल्या फॅक्टरीज उभाराव्या वाटल्या. एका ऑस्ट्रेलियन बियर कंपनीने हे पाणी बियर साठी अत्यंत चांगले उपयुक्त असल्याचा अहवालदेखील दिला आहे. त्यामुळेच औरंगाबादेत देशातील प्रत्येक बियरचा कारखाना आहे. आणि आता धान्यापासून मद्यनिर्मीतीचेही कारखाने हे जायकवाडी धरणालगत पैठण एमआयडीसीतच उभारले जाऊ लागले आहेत. असं हे औद्योगिक आणि सांस्कृतिक, शैक्षणीक दृष्ट्या महत्त्वाचं शहर.
औरंगाबादवर स्वातंत्र्यपूर्व काळात निजामांचा अंमल होता. औरंगाबाद हे हैद्राबादला जोडलेलं होतं. येथील जून्या इमारतीवर अजूनही निजामकालीन छाप दिसते. मलिक अंबरने या शहराची शास्त्रशुध्द रचना केली होती. शहराची पिण्याच्यापाण्याची व्यवस्था, वाहतूक, मलनिस्सारण या मुलभूत सोयींचा मलिक अंबरने व्यवस्थीत आराखडा तयार केला होता. या अराखड्यानुसार हे शहर वसवलेलं आहे. पानचक्की च्या भिंतीवरुन पडणारे पाणी आजही येथे येणा-या नागरिकांसाठी , सैलानींचे आकर्षण आहे. असा एतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचा विकास आज औरंगाबाद की संभाजीनगर या वादातच अडकून पडला आहे.
20 वर्षांपासून औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसेना - भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. येत्या 11 ऐप्रिल रोजी या एतिहासीक शहराच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार यासाठी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक देखील ऐतिहासिकच ठरणार अशी चिन्ह दिसत आहेत.
औरंगाबाद महापालिकेसाठीची पहिली निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेला औरंगाबादने महापालिकेने मुंबई ठाण्यानंतर पहिलं मोठं यश मिळवून दिलं. 60 सदस्यांच्या पालिकेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. मात्र राजकारणात नवख्या असलेल्या या शिवसैनिकांना पालिकेचे महापौरपद मात्र मिळवता आले नाही. कॉग्रेसने कमी जागा जिंकून देखील अपक्ष , रिपाई , दलित पँथर , मुस्लिम लिग यांच्या सहकार्याने शांताराम काळे यांना औरंगाबाद शहराचे पहिले महापौर बनविले. महानगर पालिकेच्या या पहिल्या पाच वर्षात शिवसेनेकडून विद्यमान अपक्ष आमदार प्रदिप जैस्वाल यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली. औरंगाबाद मधील शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रदिप जैस्वाल हे 2010 च्या विधानसभा निवडणूकीपर्यंत सेनेसोबत होते. सेने कडून ते नगरसेवक, महापौर, खासदार झाले मात्र मागील विधानसभा निवडणूकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यांनी औरंगाबाद मध्य मधुन अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. आज औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेनेचे पहिले महापौर शिवसेना - भाजप युतीच्या विरोधात आहेत. तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी यांनी प्रथमच मनपा निवडणूकीत आघाडी केली आहे. या आघाडी सोबत जैस्वाल यांची शहर विकास आघाडी देखील आहे. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही सत्ताधारी शिवसेना-भाजप युती विरुध्द कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि जैस्वाल यांची शहर विकास प्रगती आघाडी यांच्यातच होणार अशी चिन्ह आहेत. यासोबतच बंडखोरांशीही कडवी झुंज या युती आणि आघाडीला द्यावी लागणार आहे. शिवसेनेच्या जाहिर झालेल्या पहिल्या यादीवर अनेक शिवसैनिक नाराज आहेत. खासदार चंद्रकांत खैरे यांनी नक्षत्रवाडी या मागासवर्गीयांसाठी राखीव प्रभागातून स्वत:च्या मुलाला ह्रषिकेश खैरेला उमेदवारी मिळवून दिली आहे. एवढच नाही तर खैरेंच्या ड्रायव्हरला देखील शिवसेनेचे अधिकृत तिकीट मिळाले आहे. याचे शल्यं शिवसैनिकांना अधिक आहे. यासोबतच सेनेने यंदा अनेक तरुण नवे चेहरे दिले आहेत. पहिल्या यादीतील 36 पैकी 30 चेहरे नविन आहेत. यामुळे शिवसेनेत अनेक बंडोबा असणार यात शंकाच नाही. या बंडोबांना थंड करण्यातच नेत्यांची शक्ती खर्च होणार आहे.
2005च्या निवडणूकीत कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडा झाली नव्हती. तेव्हा कॉंग्रेसने रिपब्लीकन पक्षाच्या 5 ते 6 उमेदवारांना पंजाच्या निशाणीवर उभे केले होते . यातील संजय जगताप, मिलिंद दाभाडे , प्रकाश गायकवाड यांच्या पत्नी आणि इतर दोन कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार निवडून आले होते. यावेळीही कॉंग्रेस दलित उमेदवार फोडण्याची शक्यता अधिक आहे. तसेच शिवसेना भाजप प्रमाणेच कॉंग्रेस राष्ट्रवादीलाही बंडखोरीची मोठी बाधा होणार आहे. आघाडीत कॉंग्रेस 53 , राष्ट्रवादी 30 आणि शहर प्रगती विकास आघाडीला 16 जागा सोडण्यात आल्या असल्यातरी उमेदवार जाहिर करण्यात आलेले नाहीत. बंडोबांना शांत करण्यासाठीच आघाडीने हा पवित्रा घेतलेला असला तरी उमेदवारी मिळो अथवा ना मिळो इच्छुकांनी अर्ज दाखल करुन ठेवले आहेत.
महापालिकेत मोठ्याप्रमाणात असलेल्या या चार पक्षांव्यतरिक्त भारिप बहुजन महासंघ, रिपाई, भाकप, माकप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना , समाजवादी पार्टी, शिवराज्य पक्ष, आणि अनेक संघटना या निवडणूकीत उतरणार आहेत. आज शनिवार आणि सोमवारी उमेदवारी दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक आहेत . त्यानंतर 99 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात राहतात हे उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतरच कळेल.
एकूणच कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शहर प्रगती विकास आघाडी यांची ऐतिहासिक आघाडी , आणि शिवसेना - भाजपची अनैसर्गीक युती किती जागा मिळवतात आणि इतर पक्ष आणि अपक्षांना कसे आपल्या जाळ्यात ओढून घेतात यावरच महापालिकेची सत्ता कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे. तुर्तास निवडणूकीचा धुराळा उडाला आहे, त्यामुळे अंधूक अंधूकच दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...