मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'आपला' माणूस सत्तेपासून कोरडा का?

महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आणि दिवळीला सुरवात झाली आहे.या दोन्ही सणांच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा या गावातील आई, वडिल आणि मुलगा या उमेदीच्या वयातील कुटुंबाची हत्या करून त्यांचे तुकडे करून विहीरीत टाकण्यात आले. आता राज्यात कोणाचेही सरकार नसल्यामुळे कोणी मंत्री फिरकणार नाही, निवडणुका संपल्यामुळे आमदार आणि काल आमदार होण्याच्या शर्यतीतीलही फिरकणार नाहीत. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर तेवढे अत्याचार पर्यटन करुन येतील. पुढे काय? नगरमध्ये याआधीही काही महिन्यांपूर्वी अशाच दोन घटना झाल्या ही, तिसरी! एवढेच काय ते येथील पोलिस प्रशासनासाठी या घटनचे महत्त्व. सहा महिन्यांपूर्वी नितीन आगे या तरुणाचे हत्याकांड झाले होते. त्याच्या आरोपींचे काय झाले हे नंतर दलित नेत्यांनी प्रशासन आणि राज्यकर्त्यांना विचारले का? तर याचे उत्तर नाही असेच आहे.काल हत्याकांड झालेल्या सुनील जयश्री संजय जाधव या मुलगा - आई - वडिलांच्या हत्याकांडाचे वेगळे काय होणार. याला तुम्ही आणि मी जबाबदार नाही का? नगरमध्येच का हत्या होत आहेत असा माझा प्रश्न नाही, तर दलितांवरच ही वेळ का येत आहे? ...

दर महिन्याला कविता नवीन असते

१ ज्या डायरीत माझ्या लेखांची आणि कवितांची जंत्री असायची ती आता दर एक तारखेलाच हातात घेतो एक तारखेच्या पहिल्या पानावर ठरलेली मुक्तछंदातील कविता असते घराचा - कर्जाचा - एलआयसीचा हप्ता त्याखाली किराना - लाईट - मोबाईल - पाणी बीलाचं दुसरं कडवं प्रत्येक महिन्याचा ठरलेला हिशेब तरीही दर महिन्याला कविता नवीन असते कधी सुनित, कधी पानभर, तर कधी दिर्घ होऊन जाते लाख ठरवतो यंदा चारोळीतच हिशेब मांडावा पण, अनाहूत डॉक्टर भेटीने इसीजीच्या चिठ्ठीप्रमाणे वाढतच जातो कवितेचा पदर २ शेअर बाजारासमोरील उधळलेला सांड माझ्याच घरावर कसा चाल करुन येतो

महाराष्ट्र शासनाने ग्रंथालयाचे रोपटे रुजण्याआधीच उपटून फेकले

महाराष्ट शासनाने ग्रंथालय चळवळीचं रोपटं उगवून येण्याआधीच उपटून फेकण्याचा चंग बांधला आहे. ग्रंथालयाचा आत्मा म्हणेज पुस्तके.  सध्याच्या महागाईच्या युगात कागद आणि छपाईच्या खर्चाने पुस्तकांच्या किंमती वाढल्या आहेत. एखाद्या सामान्य व्यक्तीने ग्रंथालय स्थापन करण्याचा विचारही केला तरी त्याला चार ते पाच लाखांचा खर्च अपेक्षित आहे. असे असताना राज्य शासनाकडून ग्रंथालयाला सुरवातीचे अनुदान म्हणून किती रक्कम मिळते तर, चार - पाच लाख रुपये खर्च करून सलग तीन ते चार वर्षे देणगी आणि वाचकांच्या दयेवर ग्रंथालय चालवून वर्षाला 500 रुपये ते 20 हजार रुपयांपर्यंत सरकारकडून अनुदान दिले जाते. तेही नियमीत मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र, ग्रंथालय चळवळीचं रोपटं उपटून फेकणा-यांच्या डोळ्यात फक्त 'अ' वर्ग दर्जाचे 4 लाख 80 हजार खूपताना दिसत आहेत. ग्रामीण भागामधील ब, क आणि ड वर्गातील ग्रंथालये ही पूर्णपणे संचालक मंडळाच्या उदारतेवरच सूर आहेत. असे असताना त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाकडे दूर्लक्ष्य करून किरकोळ चूकांचा प्रपोगंडा करुन ग्रंथालये बंद करण्याचा घाट शासनाने घातला आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये अद्याप ए...