मुख्य सामग्रीवर वगळा

संमातर सेन्सॉर

2010 या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगलीच नटरंगी झाली. 1 जानेवारीला नटरंग प्रदर्शित झाला, त्याला सबंध महाराष्ट्रदेशातून उत्तम प्रतिसाद लाभलाय. नंटरंगच्या मागोमाग झेंडा हा ठाकरे घराण्याचा राजकीयपट मांडणारा चित्रपट मराठी रसिक मायबापाच्या भेटीस उत्सुक होता. यानंतर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय म्हणणारे महेश मांजरेकर शिक्षणाच्या आयचा घो... म्हणत येणार होते. या दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने मान्यताही दिलेली आहे. मात्र झेंडा मुळे कुणाचा तरी स्वाभिमान दुखावलाय तर, मांजरेकरांच्या चित्रपटाचे नाव शिवराळ असल्यामुळे त्याच्या नामांतरासाठी शिवबाचे मराठे बाह्या सरसावून पुढे आलेत.


शासनाचे सेन्सॉर बोर्ड, न्यायालय या व्यवस्था असतांना तिथे दाद मागण्याची कुणाचीच तयारी नाही. जनतेच्या दरबारातही या चित्रपटांचे भवितव्य ठरुदेत असं कोणीही म्हणायला तयार नाही.


सेन्सॉर बोर्डला समांतर सेन्सॉरशिप ही काही आजचीच बाब नाही. अनेक चित्रपट - नाटके हे या सेन्सॉरशिपच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक , दिपा मेहतांचा वॉटर यासह अनेक कलाकृतींना या मुठभर अस्मिता, धर्मिक भावना, स्वाभिमान दुखावल्याच्या कारणावरुन आपल्या प्रदर्शनावर बंदी आणावी लागली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही अशी गळचेपी होवूनही कलाकार एकत्र येवून याविरोधात आवाज का उठवत नाही. या प्रश्नाचेही उत्तर अजून मिळालेले नाही.


सिने-नाट्य कलाकारांबाबतच असं घडतं असंही काही नाही, चित्रकार, साहित्यीक यांनाही या समांतर सेन्सॉर बोर्डाचा तेवढाच त्रास होतो. मात्र आजपर्यंत हे साहित्यीकही या विरोधात एकत्र आलेले नाही. मागील वर्षी आनंद यादवांना त्यांच्या पुस्तकातील भाग वगळूनही साहित्यासंमेलनाचे अध्यक्षपद भुषविता आले नाही. अध्यक्षाविना संमेलन पार पडले.


आता वळुयात आपल्या मुळ मुद्याकडे, झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा घो...


नटरंगच्या झगमगीत यशानंतर झेंडा हा बहुचर्चीत चित्रपट प्रदर्शित होता होता राहिलाय. झेंडा ठाकरे घराण्यावर आधारीत चित्रपट. त्यामुळे ठाकरे घराण्यातील राजकारण, त्यांच्यातील फुट आणि त्यांच्या सावलीत मोठे झालेल्या प्रत्येकाचा उल्लेख यात झालेला असणार हे सहाजिक आहे. राज्याचे वसुलीमंत्री नारायण राणे यांचे शेंडेफळाचा स्वाभिमान या चित्रपटातील सदा मालवणकर या व्यक्तीरेखेमुळे दुखावलाय. आता हा स्वाभिमान राणेंच्या सांगण्यावरुनच दुखावलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नितेश राणेची स्वाभिमान संघटना चित्रपटाचे दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांना सदा मालवणकरची व्यक्तीरेखा बदला अन्यथा चित्रपट बंद पाडला जाईल अशा धमक्या देत आहेत. या धमक्यांना घाबरुन , सरकारी व्यवस्थेकडे दाद न मागता गुप्ते साहेबांनी मालवणकर हे नाव बदलण्याचं कबुल केलयं. नुसतच नाव बदलण्याचं कबुल केलं नाही तर ती व्यक्तीरेखाही काढुन टाकण्याचंही मान्य केलं.


यासर्व प्रकारावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे हे कोणीही नाकारणार नाही. मात्र अवधुत गुप्तेंही सरकारकडे दाद नमागता या बदलास का तयार झाले हे कोडेच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...