मानवमुक्तीचा लढा सुरुच ठेवा हे प्रसिध्द विचारवंत आणि दलित पॅंथरच्या संस्थापकांपैकी एक असलेले प्रा. अरुण कांबळे यांचे सोलापूरातील आजचे भाषण. या भाषणातून पुन्हा एकदा प्रा. कांबळे यांच्यातील पॅंथर बोलला असं वाटतंय. संसदीय राजकारणाची पॅंथरला कधीच गरज वाटली नाही. सभागृहामधे जावूनच प्रश्न सुटतात यावर पॅँथरचा विश्वास नव्हता. त्यामुळेच प्रा. कांबळेंनी रिपब्लीकन पुढा-यांच्या पराभवानंतर जनआंदोलनाची गरज आधोरेखीत करुन पँथर संघटनेची आज गरज असल्याचं म्हटलं आहे. आजच्या दलित नेत्यांवरती दलित जनतेचा विश्वास राहिलेला तर नाहीच. परंतू या नेत्यांचे अनुयायी म्हणवून घेणारेही तन-मनाने या नेत्यांच्या बरोबरच आहेत. हे विधान धाडसाचं ठरणारं आहे. कारण दलित जनतेवरील अन्याय अत्याचार थांबत नाहीत, ग्रामीण भागातील दलितांची अडवणूक आणि छळवणूकीचे नवे प्रकार नव्या सरंजामदारांनी (राज्यकर्त्यांनी) शोधून काढले आहेत. या सगळ्या जाचातून दलित जनतेची सोडवणूक करण्यास खंबीरपणे कोणताच तथाकथीत दलित नेता अंगझटकून पुढे सरसावत नाही. या गोष्टींचा दलित जनतेला आणि सामान्य कार्यकर्त्यांना उबग आलाय. यामुळे खरोखरच सुप्त लाट दलित कार्यकर्ते आणि ...