लक्ष्मण माने. 'उपरा' या पुस्तकाने महाराष्ट्रातील साहित्य जगत् ढवळून काढल्यानंतर लक्ष्मण मानेचा 'उपरा'कार लक्ष्मण माने झाले. आता पद्मश्री लक्ष्मण माने. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीवर विश्वास असणा-य मानेंनी ज्या समाजातून आलो त्यांच्यासाठी काही करायचे ठरविले तेव्हा, "शिक्षण" हेच या समाजाला उन्नत्त करु शकेल हे जाणले आणि त्यांच्या साठी स्वत:च्या मालकीच्या जागेत आश्रम शाळा सुरु केली. या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळेच्या तीन खोल्या आज पाडण्यात आल्या.
सातारा पालिकेने कोर्टाच्या आदेशाने ही शाळा जमीनदोस्त केली असलीतरी या मागे कच्छी आणि बारटक्के असोसिएट्स या बिल्डरांचा हात आहे.
सातारा जिल्हातील करंजे येथे वहिवाटीनुसार लक्ष्मण माने यांच्या मालकीच्या जागेत
भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेची ही आश्रम शाळा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त असलेल्या या शाळेला त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या पोलीस खात्यांच्या सुरक्षेत पाडण्यात आले. या मुळे शासनापेक्षा बिल्डर भारी भरले आहेत, असंच म्हणावं लागेल.
उपरा या पुस्तकात माने यांनी सुरुवातीलाच लिहलं आहे की, ''जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते तसचं लिहीत गेलो पुन्हा एकदा तेज जगणं जगत आहे." या ओळींचीच पुनुरोक्ती माने यांच्या आणि पर्यायाने भटक्या विमुक्तांच्या आयुष्यात आली आहे. असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
भटक्या विमुक्तांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शाळा महत्त्वाचं काम करत आहे. आपल्याच जातीतील माणसाची शाळा आहे त्यामुळे आपल्या पोरांचं तिथ चांगलंच होईल हा विश्वास त्या निरक्षर मायबापांना आहे. त्यामुळे ही शाळा चालु राहणं , तिच्या इयत्ता वाढणं, वर्ग खोल्यांमध्ये आणि मुलभूत सोयीसुविधांमधे वाढ होणं पुरोगामी म्हणवूण घेणा-या आणि धनदांडग्यांच्या ईशा-यावर चालणा-या महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. शरद पवारांच्या मुलीचा सुप्रियांचा सक्रीय सहभाग असलेली ही शाळा त्यांच्याच शासनात पाडली जाते. याचा अर्थ सर्वसामान्य माणूस शासन व्यवस्थेपेक्षा न्यायव्यवस्था श्रेष्ठ असा घेईलही, परंतू ही शासनाची धूळफेक आहे. मुंबै-पुण्या प्रमाणेच आता महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधेही बिल्डर लॉबी सक्रीय असल्याचे हे उदाहरण आहे. बिल्डरांना हवी असलेली जागा ते साम,दाम,दंड,भेद वापरुन हस्तगत करत आहेत. यातून कोणीच सुटु शकत नसल्याचंच यातून दिसत आहे.
या घटनेनंतर शासनातल्या कोणत्याच मंत्र्यानेही या घटनेची चौकशी केली जाईल, असे मगरीचे आश्रुही ढळले नाही आणि लक्ष्मण माने यांना पुन्हा एकदा "उपरा" ठरवलं आहे.
सातारा पालिकेने कोर्टाच्या आदेशाने ही शाळा जमीनदोस्त केली असलीतरी या मागे कच्छी आणि बारटक्के असोसिएट्स या बिल्डरांचा हात आहे.
सातारा जिल्हातील करंजे येथे वहिवाटीनुसार लक्ष्मण माने यांच्या मालकीच्या जागेत
भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेची ही आश्रम शाळा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त असलेल्या या शाळेला त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या पोलीस खात्यांच्या सुरक्षेत पाडण्यात आले. या मुळे शासनापेक्षा बिल्डर भारी भरले आहेत, असंच म्हणावं लागेल.
उपरा या पुस्तकात माने यांनी सुरुवातीलाच लिहलं आहे की, ''जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते तसचं लिहीत गेलो पुन्हा एकदा तेज जगणं जगत आहे." या ओळींचीच पुनुरोक्ती माने यांच्या आणि पर्यायाने भटक्या विमुक्तांच्या आयुष्यात आली आहे. असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
भटक्या विमुक्तांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शाळा महत्त्वाचं काम करत आहे. आपल्याच जातीतील माणसाची शाळा आहे त्यामुळे आपल्या पोरांचं तिथ चांगलंच होईल हा विश्वास त्या निरक्षर मायबापांना आहे. त्यामुळे ही शाळा चालु राहणं , तिच्या इयत्ता वाढणं, वर्ग खोल्यांमध्ये आणि मुलभूत सोयीसुविधांमधे वाढ होणं पुरोगामी म्हणवूण घेणा-या आणि धनदांडग्यांच्या ईशा-यावर चालणा-या महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. शरद पवारांच्या मुलीचा सुप्रियांचा सक्रीय सहभाग असलेली ही शाळा त्यांच्याच शासनात पाडली जाते. याचा अर्थ सर्वसामान्य माणूस शासन व्यवस्थेपेक्षा न्यायव्यवस्था श्रेष्ठ असा घेईलही, परंतू ही शासनाची धूळफेक आहे. मुंबै-पुण्या प्रमाणेच आता महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधेही बिल्डर लॉबी सक्रीय असल्याचे हे उदाहरण आहे. बिल्डरांना हवी असलेली जागा ते साम,दाम,दंड,भेद वापरुन हस्तगत करत आहेत. यातून कोणीच सुटु शकत नसल्याचंच यातून दिसत आहे.
या घटनेनंतर शासनातल्या कोणत्याच मंत्र्यानेही या घटनेची चौकशी केली जाईल, असे मगरीचे आश्रुही ढळले नाही आणि लक्ष्मण माने यांना पुन्हा एकदा "उपरा" ठरवलं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा