मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मण अजूनही 'उपरा'

लक्ष्मण माने. 'उपरा' या पुस्तकाने महाराष्ट्रातील साहित्य जगत् ढवळून काढल्यानंतर लक्ष्मण मानेचा 'उपरा'कार लक्ष्मण माने झाले. आता पद्मश्री लक्ष्मण माने. फुले, शाहू, आंबेडकर चळवळीवर विश्वास असणा-य मानेंनी ज्या समाजातून आलो त्यांच्यासाठी काही करायचे ठरविले तेव्हा, "शिक्षण" हेच या समाजाला उन्नत्त करु शकेल हे जाणले आणि त्यांच्या साठी स्वत:च्या मालकीच्या जागेत आश्रम शाळा सुरु केली. या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आश्रमशाळेच्या तीन खोल्या आज पाडण्यात आल्या.
सातारा पालिकेने कोर्टाच्या आदेशाने ही शाळा जमीनदोस्त केली असलीतरी या मागे कच्छी आणि बारटक्के असोसिएट्स या बिल्डरांचा हात आहे.
सातारा जिल्हातील करंजे येथे वहिवाटीनुसार लक्ष्मण माने यांच्या मालकीच्या जागेत
भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्थेची ही आश्रम शाळा आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या विश्वस्त असलेल्या या शाळेला त्यांच्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या पोलीस खात्यांच्या सुरक्षेत पाडण्यात आले. या मुळे शासनापेक्षा बिल्डर भारी भरले आहेत, असंच म्हणावं लागेल.
उपरा या पुस्तकात माने यांनी सुरुवातीलाच लिहलं आहे की, ''जे जगलो, जे भोगलं, अनुभवलं, पाहिलं, ते तसचं लिहीत गेलो पुन्हा एकदा तेज जगणं जगत आहे." या ओळींचीच पुनुरोक्ती माने यांच्या आणि पर्यायाने भटक्या विमुक्तांच्या आयुष्यात आली आहे. असं म्हटल्यास वावगं ठरु नये.
भटक्या विमुक्तांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही शाळा महत्त्वाचं काम करत आहे. आपल्याच जातीतील माणसाची शाळा आहे त्यामुळे आपल्या पोरांचं तिथ चांगलंच होईल हा विश्वास त्या निरक्षर मायबापांना आहे. त्यामुळे ही शाळा चालु राहणं , तिच्या इयत्ता वाढणं, वर्ग खोल्यांमध्ये आणि मुलभूत सोयीसुविधांमधे वाढ होणं पुरोगामी म्हणवूण घेणा-या आणि धनदांडग्यांच्या ईशा-यावर चालणा-या महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. शरद पवारांच्या मुलीचा सुप्रियांचा सक्रीय सहभाग असलेली ही शाळा त्यांच्याच शासनात पाडली जाते. याचा अर्थ सर्वसामान्य माणूस शासन व्यवस्थेपेक्षा न्यायव्यवस्था श्रेष्ठ असा घेईलही, परंतू ही शासनाची धूळफेक आहे. मुंबै-पुण्या प्रमाणेच आता महाराष्ट्रातल्या इतर शहरांमधेही बिल्डर लॉबी सक्रीय असल्याचे हे उदाहरण आहे. बिल्डरांना हवी असलेली जागा ते साम,दाम,दंड,भेद वापरुन हस्तगत करत आहेत. यातून कोणीच सुटु शकत नसल्याचंच यातून दिसत आहे.
या घटनेनंतर शासनातल्या कोणत्याच मंत्र्यानेही या घटनेची चौकशी केली जाईल, असे मगरीचे आश्रुही ढळले नाही आणि लक्ष्मण माने यांना पुन्हा एकदा "उपरा" ठरवलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...