मुख्य सामग्रीवर वगळा

मनसेतून 'श्वेतप्रकाश' बाहेर

मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकसभेच्या निवडणूकी नंतर सामान्य मतदाराने जरी या पक्षाचा गांभीर्य़ाने विचार करयाला सुरुवात केली नसली तरी, राज्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपला नवा - तरुण मतदार या पक्षाकडे आकृष्ट होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतांना दिसले. मात्र मागील काही दिवसात मनसेतील प्रमुख पदावरील दोन व्यक्तींची पक्षातून झालेली हकालपट्टी पुढील काळात या पक्षाचा चेहरा कोणता राहणार हे स्पष्ट करणारी ठरली आहे. श्वेता परुळकर यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आलं. तेव्हा मिडीया शिवाय कोणीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कारण श्वेता या काही मास लिडर नव्हत्या. त्यांच्या जाण्याने मनसेला देखील फार मोठा धक्का बसला नाही की त्या शिवसेनेत गेल्यामुळे सेनेचाही एखादा गड मजबूत झाला असंही काही नाही. शिवसेनेला त्यातल्यात्यात एकच जमेची बाजू की मनसेने चेहरा दिलेली माणसेच आता मनसेच्या विरोधात बोलायला त्यांना मिळाली. त्यामुळे सेनेला आता त्यासाठी जास्त शक्ती खर्च करण्याची गरज उरलेली नाही. काल (21 जूलै) रोजी औरंगाबादच्या प्रकाश महाजनांनी मनसेतून अपमानीत झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. मुळचे बीडचे आणि दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे दिवंगत प्रमोद महाजनांचे धाकटे बंधू (प्रविण महाजन पेक्षा मोठे) असलेले प्रकाश यांची मनसेने पक्षविरोधी कारवया केल्याच्या कारणाने हकालपट्टी केली. मात्र या हकालपट्टी मागे बीडच्या संपर्कप्रमुखांशी (कर्णबाळा) त्यांचा झालेला राडा हे प्रमुख कारण आहे. प्रकाश महाजनांच्या जाण्यानेही मनसेला काडीमात्र फरक पडणार नाही हे राज ठाकरे आणि इतर 'सरचिटणीसां'ना माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्या राड्या नंतर तिस-याच दिवशी प्रकाश यांची हकालपट्टीची नोटीस पक्षाच्या नोटीस बोर्डवर टांगण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रकाश हे अतिशय हळवे झाले. त्यांना मनस्वी दु:ख झालं. 'मोतोश्री' वरील सेना प्रवेश सोहळ्यात ते पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांना अश्रु अनावर झाल्यांचही महाराष्ट्रानं पाहिलं. कोणतीही आशा , आपेक्षा न बाळगता प्रकाश राज यांच्या मागे उभे राहीले होते. मराठवड्यात एक चांगलं नेतृत्व प्रकाश महाजनांच्या निमीत्तानं राज ठाकरेंना उभं करता आंलं आसतं . मात्र तसं काहीही न होता, प्रकाश यांना स्वत:च्या कर्मभुमीतच मनसेच्या 'राडा' संस्कृतीला सामोरं जावं लागलं . आणि राज यांनी त्यांची कैफियत एकून न घेताच त्यांची हकालपट्टी केली.
आता प्रश्न निर्माण होतो की श्वेता आणि प्रकाश या 'पांढरपेश्या' व्यक्तींची हकालपट्टी करुन राज ठाकरे हे पक्षात केवळ राडा करु शकणा-यांनाच स्थान देणार आहेत का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...