मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बजेट की क्रिकेट

फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे देशाचं बजेट ''बघण्याचा'' आठवडा. 24 फेब्रुवारीला ममतादीदींनी रेल्वे बजट सादर केलं. युपीए सरकारमध्ये मागीलवेळी लालु यादवांकडे असलेलं हे नफ्यातलं खातं, यंदाच्या युपीए हंगामात ममतादीदींकडे आलं. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आहेत त्यामुळे बंगालला रेल्वे बजेट मधे झुकतं माप असणार हे मिडियाने सर्वसामान्यांच्या मनावर चांगलच ठसवलं होतं, मात्र मी देशाची रेल्वे मंत्री आहे हे ममतादीदींनी त्यांच्या बजेटमधून दाखवून दिलं. महाराष्ट्राच्या वाट्यालातर ममतादीदींनी बंगाली मिठाई भरभरून दिली. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना कुठलीही भाडेवाढ नकरता फार मोठा दिलासा दिलाय. तसच नेट सेव्ही झालेल्या प्रवाशांनाही ई-टिकीट बुकींगमध्ये 10 रुपयांची बचत दिली आहे. आणि मालवाहतूक भाडेवाढ ही नाही. असं एकंदर काही वाढीव न देता काही काढून घेतलं नाही हे समाधान मात्र दीदींनी भारतीयांना दिलयं. मराठवाड्याच्या तोंडाला नेहमीप्रमाणे पाने पुसली गेलीय. हे घीसंपीटं वाक्य मराठवाड्यातील नागरिकांसाठी यंदा पुन्हा कामी आलय. एकही नवी गाडी नाही. नवा रेल्वे मार्ग नाही. इलेक्ट्रीक ...

मुंबई - मराठीचा वांझोटा वाद

मुंबई कोणाची? महाराष्ट्रात मराठी सक्तीची. हा वाद पुन्हा एकदा चांगलाच रंगलाय. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत टॅक्सी परवाना मराठी बोलता येणारांनाच दिला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्र्यांना कान पिचक्या दिल्या असाव्यात. परिणामी अशोकरावांनी 'यु टर्न' घेत टॅक्सी चालकांना ग्राहकांना समजेल (अर्थात हिंदी-गुजराथी) अशा स्थानिक भाषेत संवाद साधावा असा पवित्रा घेतलाय. या टॅक्सी परवान्यावरुन उद्योगपती मुकेश आंबानी यांना एनडीटिव्हीच्या एका चर्चासत्रात बरखा दत्त यांनी छेडलं असता, त्यानीही 'मुंबई सर्व भारतीयांची आहे' , असं म्हटलं . झालं, शिवसेना - मनसे या मुद्यांच्या शोधात असलेल्या पक्षांना आयता विषय मिळाला. आंबानींच्या 'मुंबई इंडियन्स' च्या कॅप्टननेही असचं वक्तव्य मुंबईत केलं तेव्हाही बाळ ठाकरे आणि कंपनीला हे मुंबई वेगळे करण्याचे कारस्थान वाटले. आता आंबानी आणि सचिन कोणत्या सत्तास्थानावर आहेत की, ज्यांच्या बोलण्याने मुंबई वेगळी होईल हे ठाकरेंनाच माहित. मात्र या वक्तव्यामुळे असं बोलणा-यांना सेना धडा शिकवेल असं शिवसेने...