मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'गड' आला सेनेचा "सिंह" गेला रिपाईचा

रिपब्लिकन पक्षाचे नेत रामदास आठवले यांचा मुंबई महापालिकेत केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र याच वेळी त्यांनी ज्या दोन पक्षांशी युती केली त्या शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. भाजप तर मागील निवडणूकीपेक्षा तीनने अधिक आहे. मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे. ज्याची भाजपनेत्यांनाही अपेक्षा नव्हती. या सगळ्यावर रिपाई नेते आठवले यांनी नुकतेच मुंबईत भाष्य केले आहे. गेली अनेक वर्षे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर होतो. आमची मते त्यांना मिळत होती, परंतु आता आम्ही शिवसेना-भाजपबरोबर आहोत. महापालिका निवडणुकीत मात्र या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने आणि आमच्यातही बंडखोरी झाल्याने रिपाइंचे उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पुन्हा एकदा केला. मुंबई पत्रकार संघात आयोजित एका कार्यक्रमात शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले एकत्र आले होते. याप्रसंगी आठवले म्हणाले की, ‘गड आला पण सिंह गेला’ अशी आमची अवस्था झ...

मी गर्दीशी बोलतोय....

रोजचा दिवस नवा, हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यात मला सांगण्यासारखे वेगळे असे काही नाही. आजचा दिवसही कालच्या सारखाच गेला. रोजच्या नियमाप्रमाणे ऑफिसमध्ये आलो, ऑफिसामध्ये मला नेमून दिलेले काम पूर्ण केले आणि आता घरी जायची वेळ टळून गेली आहे. बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट दिल्या नाही म्हणून हा प्रपंच. आता मी मुंबई सोडून आठ-नऊ महिने झाले आहेत. आता मी माझ्या मुळ गावी म्हणजे औरंगाबादमध्ये आहे. एवढ्या दिवसांनी मी लिहित आहे, म्हणजे मुंबईत मुबलक वेळ होता असा त्याचा मुळीच अर्थ नाही. मुंबईतील पूर्णवेळ हा ऑफिससाठी होता. कारण तिथे मी ऑफिस संपल्यानंतर घरी जाऊन काय करु ? असा प्रश्न माझ्या समोर उभा राहात असे. (कधी कधी नरिमन पॉईंट - मंत्रालयाकडे चक्कर मारायला जायचो. तेवढाच काय तो विरंगूळा) त्यामुळे वाचन ब-यापैकी वाढलं होतं. हा ही त्या वेळेचा मला फायदा झाला. इथे म्हणजे औरंगाबादला मात्र ऑफिस व्यतीरिक्त अनेक कामे असतात, त्यामुळे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर घरची आणि इतर काही महत्त्वाची कामे उरकण्यात दिवस निघून जातो आणि दुसरा दिवस उजाड़तो. पण, मी ही सर्वांचीच (कदाचित नसेलही. असे सन्माननीय अपवाद वगळून...