मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हक्क कोणाचा... अन् भंग कोणाचा ?

२३ मार्च १९३१  रोजी भगतसिंग - राजगुरू - सुखदेव या तीन क्रांतिवीरांना इंग्रज सरकारने फाशी दिली होती. उद्या तो शहिद दिवस आहे. त्यांच्या सारखेच आता विधानसभेत बॉम्ब टाकावा असे वाटत आहे. त्यांनी जरी फक्त सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी धुरांचा बॉम्ब फेकला होता, तरी आता फेकला जाणारा बॉम्ब तिथल्या सर्व आमदारांना मुळापासून संपवणारा असावा असे वाटते. कोणत्याही मद्यावर या आमदारांची तोंडे पन्नास दिशांना असतात मात्र, पत्रकारांच्या हक्कभंगाविरोधात ते सर्व एकत्र येतात या पेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय ? एकाही आमदाराराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड असू नये. केवळ यांचेच जनतेने आणि पत्रकारांनी ऐकावे अशीच यांची अपेक्षा आहे का ?  त्यांच्या विरोधात काही बोलयचेच नाही का ? हे कुठले तुर्रमख्खा लागून गेले ? महाराष्ट्र राज्याचे राजकारण एवढ्या रसातळाला गेले आहे की, ज्या वास्तूत बसून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावे त्याच वास्तूत एका पोलिस अधिका-यावर हात उगारले गेले. तेही एक दोघांनी नाही तर, पाच-पंचविस आमदारांनी.  कोणी दुस-याने हे कृत्य केले असते तर, गोष्ट वेगळी होती मात्र, कायद्याचे राज्य ...

ग्राहक राजा... जागा हो !

आज जागतिक ग्राहक दिन आहे. ग्राहकाच्या हक्कांचे रक्षण करणारे अनेक कायदे राज्य आणि केंद्र सरकार कडून केले जात आहेत. उत्पादन निर्माते आणि दुकानदारही ग्राहकाला देव म्हणत त्याला मोठा मान-सन्मान देतात आणि हळूच त्याच्या खिशाला अशी काही कात्री लावतात की, त्याला कळत सुद्धा नाही की, आपण लुबाडल्या गेलो आहोत. सध्या कोणत्याही मौल्यवान वस्तुच्या खरेदीला गेल्यानंतर दुकानदाराकडून एक वाक्य हमखास फेकले जाते, साहेब-बाईसाहेब हौसेला कुठे मोल असते का ? अरे बाबा, हौसेला मोल नसते हे मान्य आहे. पण हौस कोणाची होत आहे आणि फजिती कोणाची एवढे कळण्याची तरी आम्हाला उसंत देत जा ! आज सकाळी साधरण दहा-सव्वा दहाची वेळ होती, औरंगाबादच्या मुख्य बाजारपेठेतली एका दुकानात गेलो होतो. नेमकेच दुकान उघडले गेले होते. दुकानातील सामानावरील धुळ झटकण्याचेच काम सुरु होते. तेव्हाच तेथील एका महिला कर्मचा-याला एक महाविद्यालयीन मुलगा म्हणाला, मला ती वस्तू द्याना.. तेव्हा थोड्या चढ्या आवाजातच ती महिला बोलली त्यावर दुकानाचे मालक शांतपणे त्या महिलेला म्हणाले, त्यांना घाई असेल लवकर आवर आणि त्यांना काय हवे ते दे.. तेव्हा असे वाटले की, किती...