मुख्य सामग्रीवर वगळा

हक्क कोणाचा... अन् भंग कोणाचा ?

२३ मार्च १९३१  रोजी भगतसिंग - राजगुरू - सुखदेव या तीन क्रांतिवीरांना इंग्रज सरकारने फाशी दिली होती. उद्या तो शहिद दिवस आहे. त्यांच्या सारखेच आता विधानसभेत बॉम्ब टाकावा असे वाटत आहे. त्यांनी जरी फक्त सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी धुरांचा बॉम्ब फेकला होता, तरी आता फेकला जाणारा बॉम्ब तिथल्या सर्व आमदारांना मुळापासून संपवणारा असावा असे वाटते. कोणत्याही मद्यावर या आमदारांची तोंडे पन्नास दिशांना असतात मात्र, पत्रकारांच्या हक्कभंगाविरोधात ते सर्व एकत्र येतात या पेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय ? एकाही आमदाराराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड असू नये. केवळ यांचेच जनतेने आणि पत्रकारांनी ऐकावे अशीच यांची अपेक्षा आहे का ?  त्यांच्या विरोधात काही बोलयचेच नाही का ? हे कुठले तुर्रमख्खा लागून गेले ?

महाराष्ट्र राज्याचे राजकारण एवढ्या रसातळाला गेले आहे की, ज्या वास्तूत बसून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावे त्याच वास्तूत एका पोलिस अधिका-यावर हात उगारले गेले. तेही एक दोघांनी नाही तर, पाच-पंचविस आमदारांनी.  कोणी दुस-याने हे कृत्य केले असते तर, गोष्ट वेगळी होती मात्र, कायद्याचे राज्य आणू... सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही आशा आणा-भाखा घेतलेल्या आमदारांनी एका पोलिस अधिका-याला गल्लीतील गुंडाप्रमाणे लाथाडावे याला लोकशाही म्हणावे का ? असाच प्रश्न आता पडायला लागला आहे....

एकीकडे पोलिसाला सभागृहात मारहाण करायची आणि त्यांच्या या झुंडशाहीबद्ददल बोलले म्हणून राज्यातील दोन पत्रकारांविरोधात हक्कभंगाचा ठराव आणयाचा... हे तर अतिच झाले... मी निझामाची रझाकारी पाहिली नाही. इंग्रजांचे अत्याचार पाहिले नाही. मोगलाईशी तर संबंधच नाही... मात्र, हे सर्व राज्यकर्ते जे करत होते, तेच आजचेही करतात यात आता मला शंका वाटत नाही.  

सुचिन सूर्यवंशी या वाहतूक सहायक पोलिस निरीक्षकाने वांद्रे वरळी सी लिंकवर आमदाराची गाडी अडवली म्हणून त्याच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव. एक साधा पोलिस निरीक्षक, तोही वाहतूक शाखेचा, त्याच्या विरोधात हक्कभंग आणण्याची आमदराला बुद्धीच कशी होते. काय मोठा गुन्हा त्याचा. तर त्याने बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर दोन कलमा लावल्या. यावेळी ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्या दरम्यान शाब्दिक चकमक झाली, कोणी कोणाल्या शिव्या दिल्या हे दोघानाच माहित. मात्र, विधिमंडळाच्या वास्तूत पोलिसाला मारणे याचे समर्थनच होऊ शकत नाही.  आमदार महोदय त्या शिपूर्ड्या (खासगीत ते पोलिसांना असेच बोलतात आणि उघड उघड मारतात देखील.) विरोधात त्याच्या वरिष्ठांकडे जाऊ शकले असते, त्याला निलंबीत केले जाऊ शकत होते. कायद्याची अनेक कवाडे उघडी असताना त्याला मारणे हाच जर या आमदारांपूढे पर्याय होता तर, मग लोकशाहीची चाड असलेल्यांनी त्यांच्या विरोधात बोलायचे नाही तर, काय त्यांच्या दारातील मांजर होऊन राहयचे.

बरं ज्या, एका आमदाराची गाडी अडवली त्याने हक्कभंग आणला, तर समजू शकले असते. पण, त्याला अनेक आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यासोबतच मारहाण करण्यासाठी राम कदम म्हणाले तसे, चाळीस - पन्नास आमदार होते. फक्त ज्यांचे चेहरे ओळखीचे आहेत त्यांचीच नावे समोर आली. असे जर असेल तर या लोकांना कायदे करण्याचा अधिकार आहे का ? असा सवाल माझ्या मनात उपस्थित होतो. केवल ९ महिन्यांच्या निलंबना ऐवजी यांचे सदस्यत्व कायमचे रद्द करून यांना निवडणूकाल उभे राहाण्यापासूनही रोखले पाहिजे अशी शिक्षा द्यायला हवी होती. आता न्यायालयाने सोमवार २५ मार्चपर्यंत आमदार क्षितीज ठाकूर आणि आमदार राम कदम यांना कोठडी सुनावली आहे.  कदाचित सोमवारी त्यांना जामीनावर सोडण्यात येईलही. पण, त्यांचा गुन्हा केवळ ९ महिन्यांच्या निलंबना एवढा छोटा नक्कीच नाही. लिखाणाची पुनरुक्ती होईल पण लिहिल्याशिवाय राहवत नाही की, आमदारांनी हात उगारणे कधीही मान्य होऊ शकत नाही. लोकशाहीची अनेक अस्त्रे त्यांच्याकडे होती, त्याअंतर्गत ते सूर्यवंशीना 'सरळ' करू शकले असते. असे असताना त्यांनी हात उगारून आपल्यातले पशुत्व सिद्ध करून दाखवले. त्यानंतर या सर्व घटनेबद्दल थोडे कठोर होत बोलले म्हणून आयबीएन लोकमतचे संपादक निखील वागळे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याविरुद्धही हक्कभंग प्रस्ताव आणला. आता या नादानीला काय म्हणावे. हा केवळ या दोघांवरचा आमदरांचा रोष मला वाटत नाही.तर, ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि पत्रकारांची मस्कटदाबी आहे. आमच्या विरोधात बोलणा-या प्रत्येकाचा आवाज आम्हाला दाबता येतो, ही मग्रुरी दाखवण्याची ही खुम-खुमी आहे. यानंतर अनेक पक्षांचे नेते सांगायला लागले की, हे चुकीचे झाले. आहो पण, हे करणारे दुसरे - तिसरे कोणी नव्हते, तर तुमच्या पक्षांचेही आमदार त्यात सामिल होते. चुकीचे झाले हे त्यांना सांगा ! आणि खरचं तुम्हाला वाटते ना हे चुकीचे झाले तर, पक्ष शिस्तीनुसार जी कारवाई होत असेल ती कारवाई करा. नुसत्याच तोंडाच्या वाफा दवडून काही होणार नाही. 

या पत्रकारांची टिळकांशी तुलना करायची नाही पण, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल टीळकांनी केल्यानंतर त्यांना मंडालेच्या तुरूंगात डांबले होते. आताचे काळे इंग्रेज पत्रकारांना काळकोठडीत डांबू शकत नाही, म्हणून किमान त्यांच्या विरोधात हक्कभंग तरी आणा.  हा दुधाची तहान ताकावर भागून खूष होण्याचा प्रकार राज्यकर्त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे सर्व प्रकार घडत आहे. काय वाटत असले त्यांच्या स्मृतींना?

पुढील वर्षी निवडणूक आहे. तेव्हा हेच मारहाण करणारे आमच्या दारात येऊन आम्हाला मतदान करा म्हणाणार आहेत. तेव्हा यांना मतदान करायचे नाही असे मी लाख ठरवले तरी, ज्या दुस-याला मी निवडणार आहे, तो याचा ही बापच असतो... त्याच्यावही दोन गुन्हे जास्त असतात, एखादा तिसरा पहावा म्हटलं तरी, चित्र फार वेगळे नसते. तेव्हा निवडणूकीवर अबोल बहिष्कार टाकण्याशिवाय माझ्यासारख्याकडे पर्याय नसतो...  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...