मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुखणं

माणूस म्हणून जगत असताना अनेक चांगल्या गोष्टी - घटना लक्ष वेधून घेत असतात, त्याच बरोबर मनाला न पटणार्या घटना बेचैन करत असतात.  गेल्या आठवड्यात उजव्या हाताच्या आंगठ्याची योग्य हलचल होत नाही म्हणून छोटे अॉपरेशन झाले, त्यामुळे घरात पडून आहे.  याच दरम्यान ओबामा भारतात येऊन गेले - दिल्लीत निवडणूक दंगलीला रंग चढत आहे - राज्यात शेतकरी आत्महत्या सूरुच आहे -  तसेच विवेकानंद यांच्या धार्मिक विचारांवर पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात अदृष्य चकमक सूरू आहे - भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील दोन शब्द गायब करण्यात आले- मोदीने जोधपुरी सूटवर स्वतःचे नाव लिहून घेतले - गल्लीपासून दिल्ली पर्यंत असे काही घडत असताना मला "मोकल्या हाताने " लिहिता येत नसल्याचे वाइट वाटते.  😴       श्टी

भूमिका

नवीन वर्ष आले की, नित्य नियमाने मी व्यायाम करण्याचा संकल्प करतो. त्याला निसर्गही तेवढीच साथ देतो. जानेवारीमध्ये बोचर्‍या थंडीचे दिवस असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा संकल्प प्रत्यक्षात उतरवणे अंगी लागते. मात्र, पंधरा-वीस दिवसांनी संक्रांत येते आणि हिवाळा कमी-कमी होऊ लागतो तसा माझा उत्साह देखील मावळतो. संकल्पावरच संक्रांत येते. मग व्यायामाचा संकल्प केला होता हे देखील विसरायला होते. असो. हा झाला १ जानेवारी २०१५ पर्यंतचा इतिहास. यावर्षी संकल्प म्हणून नाही तर, मी स्वतःसाठी काही लिहू इच्छित आहे. माध्यमाच्या जगात काम करत असताना आपला स्वतःचा काही दृष्टीकोण असला पाहिजे. स्वतःचे असे काही मत असले पाहिजे. स्वतःची काही भूमिका असली पाहिजे, असे अनेक दिवसांपासून मनात घोळत होते.  रस्त्याने चालताना अनेक गोष्टी दिसतात त्या बातमीत मांडणे शक्य होत नाही.  नवीन वर्षाच्या निमीत्ताने मनातील या विचारांना मुर्तरुप देण्याचे निश्चित केले आहे. मित्रांसोबतच्या चर्चेत, फेसबुक - ट्विटर या सोशल साइट्सवर आणि ब्लॉगवरही मी माझी काही मते मांडत असतो. पण, त्यात एकसंधपणा नसतो. एकसुत्रता नसते. त्यामुळे चर्चेच्या...