माणूस म्हणून जगत असताना अनेक चांगल्या गोष्टी - घटना लक्ष वेधून घेत असतात, त्याच बरोबर मनाला न पटणार्या घटना बेचैन करत असतात. गेल्या आठवड्यात उजव्या हाताच्या आंगठ्याची योग्य हलचल होत नाही म्हणून छोटे अॉपरेशन झाले, त्यामुळे घरात पडून आहे. याच दरम्यान ओबामा भारतात येऊन गेले - दिल्लीत निवडणूक दंगलीला रंग चढत आहे - राज्यात शेतकरी आत्महत्या सूरुच आहे - तसेच विवेकानंद यांच्या धार्मिक विचारांवर पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात अदृष्य चकमक सूरू आहे - भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील दोन शब्द गायब करण्यात आले- मोदीने जोधपुरी सूटवर स्वतःचे नाव लिहून घेतले - गल्लीपासून दिल्ली पर्यंत असे काही घडत असताना मला "मोकल्या हाताने " लिहिता येत नसल्याचे वाइट वाटते. 😴 श्टी
वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा