माणूस म्हणून जगत असताना अनेक चांगल्या गोष्टी - घटना लक्ष वेधून घेत असतात, त्याच बरोबर मनाला न पटणार्या घटना बेचैन करत असतात. गेल्या आठवड्यात उजव्या हाताच्या आंगठ्याची योग्य हलचल होत नाही म्हणून छोटे अॉपरेशन झाले, त्यामुळे घरात पडून आहे. याच दरम्यान ओबामा भारतात येऊन गेले - दिल्लीत निवडणूक दंगलीला रंग चढत आहे - राज्यात शेतकरी आत्महत्या सूरुच आहे - तसेच विवेकानंद यांच्या धार्मिक विचारांवर पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात अदृष्य चकमक सूरू आहे - भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील दोन शब्द गायब करण्यात आले- मोदीने जोधपुरी सूटवर स्वतःचे नाव लिहून घेतले - गल्लीपासून दिल्ली पर्यंत असे काही घडत असताना मला "मोकल्या हाताने " लिहिता येत नसल्याचे वाइट वाटते. 😴 श्टी
शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा