मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिल्ली विधानसभा : आयात उमेदवार आणि नकारात्मकतेचा भाजपला फटका

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने विक्रमी (७० पैकी ६७) विजय मिळविला आहे. त्यांच्या विजयाने भाजपचा (७० पैकी ०३) आणि एका अर्थाने मोदींचा अश्वमेध रोखला गेला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या दिल्लीत भाजपला केवळ तीन जागांवर रोखून त्यांच्या गेल्या नऊ महिन्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ता-पैसा-जात-धर्म आणि नकारात्मकता यांच्यापलिकडे मतदार विचार करतात याचा भाजपला नऊ महिन्यात विसर पडला होता. सर्वसामान्यांच्या हिताऐवजी नकारात्मक राजकारणावर स्वार होऊन विजय मिळविता येईल याला भाजप बळी पडली. दुसरीकडे पॅरेशूट उमेदवार किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार करुन स्वपक्षीयांचा रोष ओढवून घेतला, त्याचाच परिणाम त्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला. भाजपमध्ये अंतर्गत लोकशाहीची गरज राजकीय विश्लेषक डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या मतानुसार, सध्याच्या राजकारणात वचनांची आणि आश्वासनांची परिपूर्ती करणे राजकीय पक्षांसाठी अत्यंत गरजेचे आहे. सत्ता मिळविण्यासाठी जनतेच्या आकांक्षा जागवणे वेगळी गोष्ट आहे आणि त्याची परिपूर्ती करणे वेगळी बाब...

औरंगाबाद मनपा निवडणुकीचा बाजार रंगणार, आपण २२ जागा तरी जिंकणार का?

लोकसभा-विधानसभेनंतर औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची निवडणूक आली. रोजच्या जगण्याच्या लढाईचे प्रश्न (जन्म-मृत्यू नोंदीपासून रस्ते, पाणी, स्वच्छता आणि बरेच काही )जेथून सुटले पाहिजे त्या पालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. वार्ड आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची आणि मतदारांची फोनाफोनी सुरु झाली आहे. आता औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीची रंगत पाहाण्यासारखी राहाणार आहे. वार्डांची संख्या वाढून ११३ वर गेली आहे. ११३ वार्ड झाल्यानंतरही अनेक दिग्गजांची निवडणूक लढण्याची आणि लढले तरी जिंकण्याची संधी हुकली आहे. त्याचे कारण म्हणजे वार्ड आरक्षणाने या दिग्गजांचा  पत्ता कापला आहे. त्यामुळे अनेक नवे चेहरे पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. भाजपची (एनडीए) केंद्रात तर भाजप-सेनेची राज्यात सत्ता आहे. औरंगाबादला युती होते की नाही हे अजून ठरायचे आहे. काँग्रेसचे नेहमीप्रमाणेच गोलमाल वातावरण तर, राष्ट्रवादी किती जोर लावते हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे. औरंगाबादमधूनच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केलेला 'एमआयएम' हा फॅक्टर किती प्रभावी ठरतो याकडे केवळ औरंगाबाद आणि मराठवाड्याचे नाही तर महाराष्...