मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किती ही मळमळ

रिमझिम पावसात दोघं शांत चाललेले असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनी धरलेला अडोसा एका वळणावर थांबतो. रिमझिम पावसांच्या सरीने दोघेही नक्षिकांत चिंब झालेले. तो हातातील वह्या पुस्तकं डोक्यावर धरून तर ती ओढणी डोक्यावर व्यवस्थीत करत हातात असलेलं 'एनहिलेशन ऑफ कास्ट' डोक्यावर धरून झपझप पावलं उचलायला लागते. रिमझिम पावसात एकमेकांसोबत चालून आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघालेला नाही. आता त्याच्या तगमग अधिकच वाढलेली... ही का बोलत नसेल. कशाचा राग.. की कोणासोबत बिनसलं आज... की आपल्याकडूनच एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल... एक ना दोन तो दिवसभरातील सगळ्या घटना आठवायला लागतो... अखेर पाऊस थांबतो आणि त्याच्या ओठांना शब्द फुटतात... सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला ...

मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा...

गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वी राजस्थान हायकोर्टातून निवृत्त होणाऱ्या न्यायाधिशांनी दिला होता. त्यावर राष्ट्रीय स्तरावर बरीच चर्चा झाली. गुजरातमध्ये गोरक्षणाच्या नावावर वाढत चाललेला हिंसाचारही चिंतेचा विषय बनला आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी गुजरात दौऱ्यावर असताना गायीच्या नावाखाली माणसांना मारणे योग्य नसल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून 'गाय' हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे. नुकताच एक अहवाल आला होता त्यात महाराष्ट्रात गोरक्षणाच्या नावाने गुजरात आणि उत्तर प्रदेश एवढा हिंसाचार नसल्याचे म्हटले होते. हे कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोचले की काय? आपण कसे काय मागे राहिलो याचे त्यांना दुःख झाले असावे म्हणूनच फडणवीसांच्या वाणीतूनही आता गायीचे गोडवे निघाले आहेत. तेही गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत. काय म्हणाले मुख्यमंत्री  - जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ज्या ठिकाणी गायींची संख्या कमी झाली आहे त...