गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, असा सल्ला काही दिवसांपूर्वी राजस्थान हायकोर्टातून निवृत्त होणाऱ्या न्यायाधिशांनी दिला होता. त्यावर राष्ट्रीय स्तरावर बरीच चर्चा झाली. गुजरातमध्ये गोरक्षणाच्या नावावर वाढत चाललेला हिंसाचारही चिंतेचा विषय बनला आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी गुजरात दौऱ्यावर असताना गायीच्या नावाखाली माणसांना मारणे योग्य नसल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यापासून 'गाय' हा विषय अधिक संवेदनशील झाला आहे. नुकताच एक अहवाल आला होता त्यात महाराष्ट्रात गोरक्षणाच्या नावाने गुजरात आणि उत्तर प्रदेश एवढा हिंसाचार नसल्याचे म्हटले होते. हे कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोचले की काय? आपण कसे काय मागे राहिलो याचे त्यांना दुःख झाले असावे म्हणूनच फडणवीसांच्या वाणीतूनही आता गायीचे गोडवे निघाले आहेत. तेही गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या उपस्थितीत.
काय म्हणाले मुख्यमंत्री
- जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ज्या ठिकाणी गायींची संख्या कमी झाली आहे तिथेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.'
- मुख्यमंत्री फडणवीस एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे म्हणाले, की गाईंची संख्या घटल्याने शेती उत्पादन घटले आहे. शेतकरी गायींचा कसा सांभाळ करतात याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण गाय असेल तर उद्याचे जग असेल.
भूमिका
- मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे निरुपण ऐकणाऱ्या जैन समुदायाला भरुन पावले असेल. परंतू मुख्यमंत्री हे विसरले की ते ज्या विदर्भातून आले आहेत, त्याच प्रदेशात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक आहे.
- मुख्यमंत्री म्हणाल्या प्रमाणे मग विदर्भात गायींची संख्या कमी झाल्यामुळेच कदाचित विदर्भात आत्महत्या वाढल्या असल्या पाहिजे. यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांनी विदर्भात प्रत्येक शेतकऱ्याला खंडीभर गायी अनुदानात दिल्या पाहिजे. कारण गायींची संख्या वाढली तर शेतकरी आत्महत्या आपोआप कमी होतील आणि उद्याचे बुडणारे जग आपण वाचवल्याचे पुण्यही त्यांच्या पदरी पडेल.
काय म्हणाले मुख्यमंत्री
- जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ज्या ठिकाणी गायींची संख्या कमी झाली आहे तिथेच शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.'
- मुख्यमंत्री फडणवीस एवढ्यावरच थांबले नाही तर पुढे म्हणाले, की गाईंची संख्या घटल्याने शेती उत्पादन घटले आहे. शेतकरी गायींचा कसा सांभाळ करतात याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण गाय असेल तर उद्याचे जग असेल.
भूमिका
- मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे निरुपण ऐकणाऱ्या जैन समुदायाला भरुन पावले असेल. परंतू मुख्यमंत्री हे विसरले की ते ज्या विदर्भातून आले आहेत, त्याच प्रदेशात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक आहे.
- मुख्यमंत्री म्हणाल्या प्रमाणे मग विदर्भात गायींची संख्या कमी झाल्यामुळेच कदाचित विदर्भात आत्महत्या वाढल्या असल्या पाहिजे. यासाठी आता मुख्यमंत्री साहेबांनी विदर्भात प्रत्येक शेतकऱ्याला खंडीभर गायी अनुदानात दिल्या पाहिजे. कारण गायींची संख्या वाढली तर शेतकरी आत्महत्या आपोआप कमी होतील आणि उद्याचे बुडणारे जग आपण वाचवल्याचे पुण्यही त्यांच्या पदरी पडेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा