रिमझिम पावसात दोघं शांत चाललेले असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांनी धरलेला अडोसा एका वळणावर थांबतो. रिमझिम पावसांच्या सरीने दोघेही नक्षिकांत चिंब झालेले. तो हातातील वह्या पुस्तकं डोक्यावर धरून तर ती ओढणी डोक्यावर व्यवस्थीत करत हातात असलेलं 'एनहिलेशन ऑफ कास्ट' डोक्यावर धरून झपझप पावलं उचलायला लागते. रिमझिम पावसात एकमेकांसोबत चालून आता 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघालेला नाही. आता त्याच्या तगमग अधिकच वाढलेली... ही का बोलत नसेल. कशाचा राग.. की कोणासोबत बिनसलं आज... की आपल्याकडूनच एखादा वेडावाकडा शब्द निघाला असेल... एक ना दोन तो दिवसभरातील सगळ्या घटना आठवायला लागतो... अखेर पाऊस थांबतो आणि त्याच्या ओठांना शब्द फुटतात...
सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला जरा आवसान आलं. मग त्याच्या विचारण्यात जरा जोर आला... अगं मग झाल तरी काय का एवढी शांत झाली...
अरे, तो माधव म्हणाला दलितांनो अभिनंदन... काय राष्ट्रपती पदावरही आता यांना पिढीजात आरक्षण हवं आहे का? सोशल मीडियावर तर जणू यांच्यातील मळमळ त्या गंगेसारखी दुथडी भरून वाहात आहे. तरी, बरे एका संघीय दलिताची यांनी निवड केली. पण दलित म्हटले की स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतरही एवढी मळमळ अजूनही यांच्या मनात आहे? मला तर वाटतं 2022 मध्ये येणारा राष्ट्रपती त्या राष्ट्रपती भवनाची शुद्धी करुनच प्रवेश करेल !
सखे, असं कसं म्हणते... सगळेच सारखे नसतात. अरे, नाही यांची भावना राष्ट्रपती भवन बाटल्याचीच आहे. यांच्या मनातील जळमटं अजूनही गेलेली नाहीत. आजही मी दलितांच्या घरी जेवतो, हे सांगण्यात यांना काय भूषणावह वाटतं माहित नाही तुला. पेपरात फोटो छापून आणले जातात. ट्विटर-फेसबुकवर जेवणात काय-काय मेनू होता याचे रसभरीत वर्णनं लिहिली जातात. म्हणजे माणूस म्हणून अजूनही दलितांना हे मान्य करायलाच तयार नाहीत का? बरे तरी ते कोविंद संघीय दलित आहेत.. आंबेडकरवादी दलित नाहीत. पण एखादी व्यक्ती दलित म्हटलं की त्याचे काही कतृत्व मान्यच करायचे नाही का?
सखे... काय झाले काय नेमके. का एवढी शांत आहे. वाटलं होत पावसामुळं थिजले असतील तुझे शब्द... पण जरा वेगळच प्रकरण दिसतयं... कोणासोबत काही बिनसलं का? की माझचं... काही चुकलयं... नाही रे... तुझं काही नाही चुकलं आणि तुझं चुकलं असतं तर एवढं शांत राहून सोडलं असत का तुला! आपलं काही चुकलं नाही हे कळाल्यावर त्या भोळ्या सांबाला जरा आवसान आलं. मग त्याच्या विचारण्यात जरा जोर आला... अगं मग झाल तरी काय का एवढी शांत झाली...
अरे, तो माधव म्हणाला दलितांनो अभिनंदन... काय राष्ट्रपती पदावरही आता यांना पिढीजात आरक्षण हवं आहे का? सोशल मीडियावर तर जणू यांच्यातील मळमळ त्या गंगेसारखी दुथडी भरून वाहात आहे. तरी, बरे एका संघीय दलिताची यांनी निवड केली. पण दलित म्हटले की स्वातंत्र्यांच्या इतक्या वर्षानंतरही एवढी मळमळ अजूनही यांच्या मनात आहे? मला तर वाटतं 2022 मध्ये येणारा राष्ट्रपती त्या राष्ट्रपती भवनाची शुद्धी करुनच प्रवेश करेल !
सखे, असं कसं म्हणते... सगळेच सारखे नसतात. अरे, नाही यांची भावना राष्ट्रपती भवन बाटल्याचीच आहे. यांच्या मनातील जळमटं अजूनही गेलेली नाहीत. आजही मी दलितांच्या घरी जेवतो, हे सांगण्यात यांना काय भूषणावह वाटतं माहित नाही तुला. पेपरात फोटो छापून आणले जातात. ट्विटर-फेसबुकवर जेवणात काय-काय मेनू होता याचे रसभरीत वर्णनं लिहिली जातात. म्हणजे माणूस म्हणून अजूनही दलितांना हे मान्य करायलाच तयार नाहीत का? बरे तरी ते कोविंद संघीय दलित आहेत.. आंबेडकरवादी दलित नाहीत. पण एखादी व्यक्ती दलित म्हटलं की त्याचे काही कतृत्व मान्यच करायचे नाही का?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा