मुख्य सामग्रीवर वगळा

मनसेतून 'श्वेतप्रकाश' बाहेर

मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लोकसभेच्या निवडणूकी नंतर सामान्य मतदाराने जरी या पक्षाचा गांभीर्य़ाने विचार करयाला सुरुवात केली नसली तरी, राज्यातील शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपला नवा - तरुण मतदार या पक्षाकडे आकृष्ट होणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतांना दिसले. मात्र मागील काही दिवसात मनसेतील प्रमुख पदावरील दोन व्यक्तींची पक्षातून झालेली हकालपट्टी पुढील काळात या पक्षाचा चेहरा कोणता राहणार हे स्पष्ट करणारी ठरली आहे. श्वेता परुळकर यांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात आलं. तेव्हा मिडीया शिवाय कोणीच ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. कारण श्वेता या काही मास लिडर नव्हत्या. त्यांच्या जाण्याने मनसेला देखील फार मोठा धक्का बसला नाही की त्या शिवसेनेत गेल्यामुळे सेनेचाही एखादा गड मजबूत झाला असंही काही नाही. शिवसेनेला त्यातल्यात्यात एकच जमेची बाजू की मनसेने चेहरा दिलेली माणसेच आता मनसेच्या विरोधात बोलायला त्यांना मिळाली. त्यामुळे सेनेला आता त्यासाठी जास्त शक्ती खर्च करण्याची गरज उरलेली नाही. काल (21 जूलै) रोजी औरंगाबादच्या प्रकाश महाजनांनी मनसेतून अपमानीत झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. मुळचे बीडचे आणि दुसरी महत्त्वाची ओळख म्हणजे दिवंगत प्रमोद महाजनांचे धाकटे बंधू (प्रविण महाजन पेक्षा मोठे) असलेले प्रकाश यांची मनसेने पक्षविरोधी कारवया केल्याच्या कारणाने हकालपट्टी केली. मात्र या हकालपट्टी मागे बीडच्या संपर्कप्रमुखांशी (कर्णबाळा) त्यांचा झालेला राडा हे प्रमुख कारण आहे. प्रकाश महाजनांच्या जाण्यानेही मनसेला काडीमात्र फरक पडणार नाही हे राज ठाकरे आणि इतर 'सरचिटणीसां'ना माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्या राड्या नंतर तिस-याच दिवशी प्रकाश यांची हकालपट्टीची नोटीस पक्षाच्या नोटीस बोर्डवर टांगण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रकाश हे अतिशय हळवे झाले. त्यांना मनस्वी दु:ख झालं. 'मोतोश्री' वरील सेना प्रवेश सोहळ्यात ते पत्रकारांशी वार्तालाप करतांना त्यांना अश्रु अनावर झाल्यांचही महाराष्ट्रानं पाहिलं. कोणतीही आशा , आपेक्षा न बाळगता प्रकाश राज यांच्या मागे उभे राहीले होते. मराठवड्यात एक चांगलं नेतृत्व प्रकाश महाजनांच्या निमीत्तानं राज ठाकरेंना उभं करता आंलं आसतं . मात्र तसं काहीही न होता, प्रकाश यांना स्वत:च्या कर्मभुमीतच मनसेच्या 'राडा' संस्कृतीला सामोरं जावं लागलं . आणि राज यांनी त्यांची कैफियत एकून न घेताच त्यांची हकालपट्टी केली.
आता प्रश्न निर्माण होतो की श्वेता आणि प्रकाश या 'पांढरपेश्या' व्यक्तींची हकालपट्टी करुन राज ठाकरे हे पक्षात केवळ राडा करु शकणा-यांनाच स्थान देणार आहेत का ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...