मुख्य सामग्रीवर वगळा

ओढ...

ओढ...
माणसाला कित्येक गोष्टींची ओढ असते... त्यात घराची ओढ ही काही औरच! माणूस कोणत्याही परिस्थितीत असला, कोणत्याही संकटात सापडला किंवा त्याला काही आनंद झाला तरी त्याला ओढ असते ती घराची. कधी एकदा घरी जातो असं होवून जातं.
कोणतीही व्यक्ति घरी आल्यावर घराची दारं त्याचं किंवा तिचं आगत-स्वागत करणार नसतात. घराच्या विटा-मतीच्या किंवा संगमरवरी भिंती आपली विचारपूस करणार नसतात. दारा-खिडक्यांचे पडदे आंगाखांद्यावरुन हात फिरवणार नसतात, की मखमली बिछाना मायेची उब देणार नसतो. खिडक्या कितीही सत्ताड उघड्या करुन ठेवल्यातरी त्या आपल्याशी कोणताच संवाद साधणार नसतात. मनातली घालमेल शेअर करणार नसतात. तरीही माणसाला दगड-विटा-मातीच्या घराची कायम ओढ असते. घरातील वस्तूही आपल्याला जासत वेळ सुखावणा-या नसतात, तरीही घराची ओढ कुणाचीच संपत नाही. कारण या सर्व निर्जीव वस्तूमध्ये आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. या निर्जीव वस्तूंमध्ये जान येते, जेव्हा त्यांना सजीव हलचालींचा स्पर्ष होतो. मग जिन्याची प्रत्येक पायरीही बोलकी होते. जेव्हा तिथे बसून आपल्या प्रियजनांशी केलेल्या सुख दु:खाच्या गप्पा आठवतात...
घरात आल्यावर आई-वडिलांचा आंगा-खांद्यावरुन फिरणारा मायेचा हात प्रत्येक संकटाशी झुंज देण्याचं बळ देतो. आम्ही तुझ्या सोबत आहोत हे शब्द बळ देतात जगण्याचं. घरातल्या बोबड्या बोलाने आपण विसरून जातो सगळं टेन्शन-सगळं फस्ट्रेशन.
घर असं माणसांनी बनलेलं असतं . त्यांच्यातील नात्यानं सांधलेलं असतं. दगड विटांची केवळ इमारत उभी राहू शकते, घर नाही. हे प्रत्येकानेच कधीना कधी अनुभवलेलं असतं. हा अनुभव मला मुंबैत आल्यापासून रोज येत आहे. राहिले घर दूर माझे... अशीच माझी अवस्था असते. म्हणूनच प्रत्येक सुटीत मी, चलचले अपने घर ओ मेरे हमसफर... म्हणत घरी जात असतो... घराच्या ओढीने.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरातील गाळ आणि चिखल

महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...