फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे देशाचं बजेट ''बघण्याचा'' आठवडा. 24 फेब्रुवारीला ममतादीदींनी रेल्वे बजट सादर केलं. युपीए सरकारमध्ये मागीलवेळी लालु यादवांकडे असलेलं हे नफ्यातलं खातं, यंदाच्या युपीए हंगामात ममतादीदींकडे आलं. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आहेत त्यामुळे बंगालला रेल्वे बजेट मधे झुकतं माप असणार हे मिडियाने सर्वसामान्यांच्या मनावर चांगलच ठसवलं होतं, मात्र मी देशाची रेल्वे मंत्री आहे हे ममतादीदींनी त्यांच्या बजेटमधून दाखवून दिलं. महाराष्ट्राच्या वाट्यालातर ममतादीदींनी बंगाली मिठाई भरभरून दिली. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना कुठलीही भाडेवाढ नकरता फार मोठा दिलासा दिलाय. तसच नेट सेव्ही झालेल्या प्रवाशांनाही ई-टिकीट बुकींगमध्ये 10 रुपयांची बचत दिली आहे. आणि मालवाहतूक भाडेवाढ ही नाही. असं एकंदर काही वाढीव न देता काही काढून घेतलं नाही हे समाधान मात्र दीदींनी भारतीयांना दिलयं. मराठवाड्याच्या तोंडाला नेहमीप्रमाणे पाने पुसली गेलीय. हे घीसंपीटं वाक्य मराठवाड्यातील नागरिकांसाठी यंदा पुन्हा कामी आलय. एकही नवी गाडी नाही. नवा रेल्वे मार्ग नाही. इलेक्ट्रीक लाईनचं स्वप्न केव्हा पुर्ण होणार हे रेल्वे मंत्रीच जाणो. तर असं हे एकंदर बजेट सगळ्या इलेक्ट्रॉनिक मिडियात वाजत असतांना क्रिकेट मधील विक्रमादित्य सचिन तेंडुलकर रन्सची रेल्वे सुसाट वेगाने पळवत होता. बजेटवरुन मिडिया सर्ररकन उतरलं आणि सचिनच्या विक्रमी द्विशतकाच्या खेळीकडे डोळे लावून बसलं. सर्वसामान्यांच्या जीवनात काडीचाही बदल न घडूनयेणा-या या घटनेकडे मिडियाने आपली सर्व शक्ती वळवली. सचिनचं द्विशतक ही क्रीडा - क्रिकेट जगतातील मोठी घटना हे कोणीही नाकारत नाही. मात्र हिंदी मराठी मिडियासाठी इंदूरच्या मॅच शिवाय आणि त्यातही सचिनच्या खेळी शिवाय जगात दुसरं काहीच घडत नाही असं का वाटावं ? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. केवळ टी आर पी आहे म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न बाजूला ठेवून एका खेळाच्या बातमीवरच खेळत बसायचं. हे सहन होण्यापलीकडचं आहे. यावेळी मला मकरंद अनासपूरेच्या गोष्ट छोटी डोंगरा एवढी सिनेमातला एक डायलॉग आठवतो, ''तो सचिन तिकडं आऊट झाला की तुमची तोंडं इथं बाप मेल्या सारखी पडतात, आणि बाप कामानं मरतोय त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही.'' हीच अवस्था शहर आणि ग्रामीण भागात झाली आहे. सचिनची खेळी , त्याचे तंत्रशुद्ध फटके, याही वयात टिकून असलेला स्टामिना , या सगळ्यांचे कौतूक व्हायलाच हवे. त्याला भारतरत्नही मिळावा. याबद्दल कुठलच दुमत नाही. मात्र मिडियाने खेळ आणि इतर बातम्यात कशाला किती महत्त्व द्यायचे हे ठरवायला हवे.
महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा शब्दशः पाण्याखाली गेला आहे. फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानही पावसाने धो-धो धुतले आहे. कोल्हापूरच्या पावसाच्या आणि पुराच्या बातम्या टीव्ही मीडियाने जरा बऱ्यापैकी दाखवण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातून महाजनादेश यात्रेवर निघाले होते. त्यांचा सहकारी पक्ष शिवसेनेची धाकटी पाती आदित्य ठाकरेची जनआशीर्वाद यात्रा सुरुच होती. या दोन्हीही यात्रा मीडिया पुराच्या पाण्यासोबत दाखवत होते. या दोन्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या यात्रांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसही शिवाजी महाराजांचे नाव घेऊन टीव्हीतील संभाजी महाराजांना घेऊन शिवस्वराज्य यात्रेवर निघाली होती. या सर्व राजकीय यात्रा सुरु झाल्याबरोबरच मुंबई आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस अमरावतीहून गडचिरोलीला जाईपर्यंत पाऊस कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे वळला होता. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस धो-धो बरसत होता. दिवसागणिक नाही तर तासातासाला पाणीपातळीत वाढ होत होती. राधानग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा