मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दस-याच्या निमीत्ताने...

विजयादशमी. दसरा. हे शब्द कानावर येताच आठवतात. सोनं म्हणून एकमेकांनी दिली जाणारी आपट्याची पानं. आप्त नातेवाईकांचे घेतलेलं दर्शन. संध्याकाळी रामलीला मैदानावर भरगच्च गर्दीत बघीतलेलं रावण दहन. यासगळ्या माझ्या औरंगाबादच्या बालपणीच्या आठवणी. यंदाचा माझा दसरा... विजयादशमी... धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मुंबईत असणार आहे. उद्यावर येवून ठेपलेल्या या सणाचं मला इथं जराही अप्रुप नाही. हिंदू मायथालॉजीत दसरा किंवा दशहरा , विजयादशमीला वेगवेगळे अर्थ आहेत. आणि त्या अर्थानं यंदाचा दसरा राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. शस्त्रास्त्रांची पुजा करुन नवीन भूमी जिंकण्यासाठी पुर्वी सीमोल्लंघन या दिवशी केलं जात होतं. समाजातील आसुरी प्रवृत्तींवर शौर्यानं विजय मिळवून हा विजय साजरा करणं हे ह्या दिवसाचं महत्वं. याच दसरा दिवाळीच्या काळात यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि राजकीय पटलावरचं सीमोल्लंघन उभा महाराष्ट्र देश पाहणार आहे. आज म्हणजे दस-याच्या पुर्वसंध्येला राज ठाकरेंनी विधानसेभेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील भांडूप येथून केला. तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी सुशी...

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी...

अशोक विजयादशमी आणि ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा! आज ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा ! सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. याच विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १४ अक्टोंबर १९५६ रोजी नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या पाच लाख अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी ! आजही देशाच्या काना कोप-याहून "जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो" चे नारे लावत आंबेडकरी जनसमुदाय दीक्षाभूमिला येतो. जयभीम आणि बाबासाहेबांच्या जयघोषांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीची गाणी आणि बुद्ध वंदना तसेच बुद्ध-भीम गीतांनी पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.मंगलमय होतो. स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते ... बाबासाहेबांच्या पदस्पर्षाने पुणित झालेली माती श्रध्देने भाळी लावू...

आठवलेंचं बि-हाड रस्त्यावर

रामदास आठवले, 8-ए, लोधी रोड, खान मार्केट समोर, दिल्ली. मागील अकरा वर्षांपासून असलेला रामदास आठवलेंचा हा पत्ता आता बेपत्ता झाला आहे. शुक्रवार, 18 सप्टेंबरला त्यांच्या दिल्लीतील सरकारी घराचा ताबा सरकारनं निष्ठूरपणे घेतला. आठवलेंच्या घरातील चीज-वस्तू या बेवारश्यासारख्या घराबाहेर ठेवून देण्यात आल्या.(की फेकून देण्यात आल्या). गौतम बुध्दांची मुर्ती, बाबासाहेबांचे छायाचित्र, पुस्तकांचे गठ्ठे, फुलदाण्या, टेबल-खुर्च्या, हे सर्व आठवलेंच्या मालकीचं सामान केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचा-यांनी घराबाहेर काढलं. एका बाबागडीवर आठवलेंचा रुबाबदार फोटो ठेवून देण्यात आला होता. जणू काही आत्ताच तुम्ही या गाडीने आपला रस्ता पकडा असच काहीसं या सरकारी कर्मचा-यांना सांगायचं होतं. हे सरकारी कर्मचारी म्हणजे हुकमाचे ताबेदार. कोणीतरी 'बड्या' सरकारी बाबूने त्यांना आदेशदिला आणि त्या आदेशाची तामील करायला ते सरसावले. नसता सरकारी कर्मचारी एवढ्या तत्परतेने कामाला लागलेले कोणी पाहिलेत का ? माजी खासदार रामदास आठवलेंना घर खाली करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 10 वेळा नोटीस बजावण्यात आली...

मराठी चुंबन 'तिखट'

जोगवा... 18 सप्टेंबरला प्रदर्शीत होणार आहे. याआधीच हा चित्रपट गाजतोय तो मराठी चित्रपटांमध्ये पहिला "किस" सिन असल्यामुळे. या चित्रपटाला 60 नामांकनं मिळालीत तर 37 पारितोषिकं प्रदर्शनाआधिच या चित्रपटाने पटकावली आहेत. मराठी चित्रपट बदलतोय हे श्वास पासून आपण पहात आलोय. गंध, गाभ्रीचा पाऊस,हरिश्चंद्रांची फॅक्टरी, नुकताच प्रदर्शित झालेला रिटा आणि आता जोगवा... या सगळ्या चित्रपटांनी मराठी चित्रसृष्टीला आऊट ऑफ फ्रेम केलं आहे. एका चौकटीत अडकलेला मराठी सिनेमा या चित्रपटांमुळे जगाच्या पटलावर गेला. असं असतांना केवळ एका किसचं दृष्य आहे म्हणून मराठी माध्यमांनी मराठी चित्रपट बोल्ड झालाय म्हणनं कितीसं सोईस्कर आहे. जोगवा तून मांडलेला विषय आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणा-यांना खरतर एक चपराक आहे. ज्याचा जन्म पुरुष म्हणून झालाय त्याला स्त्रीचा पेहराव करून त्याच्या मनाविरुध्द बायकांचं जिनं जगावं लागतं. त्याच्या भाव, भावनांचा विचार इथल्या समाजाने कधीच केला नाही. केवळ यल्लमाला वाहिला म्हणून त्यानं जोगत्याचंच जिनं जगावं, हे या समाजाला मान्य होतं? त्याविरोधात कधी कोणी बोलायला पुढे सरसावत नाही? कोणी त्यावि...