मुख्य सामग्रीवर वगळा

मराठी चुंबन 'तिखट'

जोगवा... 18 सप्टेंबरला प्रदर्शीत होणार आहे. याआधीच हा चित्रपट गाजतोय तो मराठी चित्रपटांमध्ये पहिला "किस" सिन असल्यामुळे. या चित्रपटाला 60 नामांकनं मिळालीत तर 37 पारितोषिकं प्रदर्शनाआधिच या चित्रपटाने पटकावली आहेत. मराठी चित्रपट बदलतोय हे श्वास पासून आपण पहात आलोय. गंध, गाभ्रीचा पाऊस,हरिश्चंद्रांची फॅक्टरी, नुकताच प्रदर्शित झालेला रिटा आणि आता जोगवा... या सगळ्या चित्रपटांनी मराठी चित्रसृष्टीला आऊट ऑफ फ्रेम केलं आहे. एका चौकटीत अडकलेला मराठी सिनेमा या चित्रपटांमुळे जगाच्या पटलावर गेला. असं असतांना केवळ एका किसचं दृष्य आहे म्हणून मराठी माध्यमांनी मराठी चित्रपट बोल्ड झालाय म्हणनं कितीसं सोईस्कर आहे. जोगवा तून मांडलेला विषय आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणा-यांना खरतर एक चपराक आहे. ज्याचा जन्म पुरुष म्हणून झालाय त्याला स्त्रीचा पेहराव करून त्याच्या मनाविरुध्द बायकांचं जिनं जगावं लागतं. त्याच्या भाव, भावनांचा विचार इथल्या समाजाने कधीच केला नाही. केवळ यल्लमाला वाहिला म्हणून त्यानं जोगत्याचंच जिनं जगावं, हे या समाजाला मान्य होतं? त्याविरोधात कधी कोणी बोलायला पुढे सरसावत नाही? कोणी त्याविषयी बोलायचा - ही कोंडी फोडायचा प्रयत्न केला तर संस्कृतीच्या फे-यात हा विषय अडकवण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे.
चित्रपट हे माध्यम मानवाच्या भाव-भावना, संस्कृती-विकृतींना जगासमोर आणणारं आहे. हिंदी चित्रपटांमध्ये चुंबन दृष्य दाखवली जाऊ लागली तेव्हा कोणी एवढा संस्कृती बुडाल्याचा आव आणला नाही. राजा हिंदूस्थानी सुपर-डूपर हिट झाला. मर्डरला नाकं मुरडली गेली, मात्र त्याच्यावर बंदी आणण्याइतपत कृत्य देशभर कुठेच घडलं नाही. हॉलिवूडचे चुंबन आणि त्याही पुढच्या प्रणय दृष्यांने भरलेले चित्रपट हेच प्रेक्षक मिटक्या मारत बघतातचना ? मग एखाद्या मराठी चित्रपटात चुंबनदृष्यं आलं तर त्या चित्रपटाचा विषय बाजूला ठेवून तेवढ्या एकाच दृष्याबद्दल वादंग का माजावा ?
आपल्याच मातीतल्या - रंग,रुप, भाषेने आपल्यासारखे असल्यामुळे कदाचित आपल्याला जोगवातील त्या दृष्याबद्दल आक्षेप असू शकतो, की आपल्या माणसांनी असं काही चव्हाट्यावर येवून करायला नको. मान्य आहे. आजही आपल्या समाजात सार्वजनिक ठिकाणांवर मुला मुलीने जास्त वेळ एकत्र बसनं , एकमेकांच्या अंगचटीला जाणं अशोभनीय वाटतं. याला समाजमान्यता नाही. मात्र चित्रपटांमध्ये आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब उमटलेलं असतं हे आपण का विसरतो? आजच्या समाजाची जीवनशैली, व्यक्त होण्याच्या पध्दती या चित्रपटांमध्ये येणारच. हे आपण का विसरतो. दोन प्रेमी जीव एकत्र आल्यानंतर - त्यांच्या भावनांचे बांध फुटल्यानंतर, ते निशब्द होतात... त्यावेळेस स्पर्षाची भाषाच हजार गोष्टी बालून जाते. हे समजायला आणि स्वाकारायला आपल्याला अजून किती वर्ष आणि किती शतकं जाऊद्यावी लागणार आहे.

टिप्पण्या

  1. भाई.....तुषार दळवी आणि रेश्म टिपणीस यांचा जीवलगा चित्रपटातील चुंबनदृश्य तुम्ही कसे काय विसरलेयत.....तुमच्याच काळातील चित्रपट तुम्ही विसरले की काय.......याला काय म्हणावं भाई....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...