मुख्य सामग्रीवर वगळा

तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी...

अशोक विजयादशमी आणि ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!

आज ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा !

सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. याच विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १४ अक्टोंबर १९५६ रोजी नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या पाच लाख अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी !

आजही देशाच्या काना कोप-याहून "जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो" चे नारे लावत आंबेडकरी जनसमुदाय दीक्षाभूमिला येतो. जयभीम आणि बाबासाहेबांच्या जयघोषांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीची गाणी आणि बुद्ध वंदना तसेच बुद्ध-भीम गीतांनी पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.मंगलमय होतो. स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते ... बाबासाहेबांच्या पदस्पर्षाने पुणित झालेली माती श्रध्देने भाळी लावून घेतात. बाबासाहेबांचा जयजयकार करीत आणि बुद्ध वंदनेचा उच्चार करीत स्तुपाचे दर्शन घेतात आणि त्या महामानवास म्हणतात की "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या आसवांची वंदना!"
पञ्चशिलाचे पठन करतात आणि म्हणतात "तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगा वरी."
बुद्धं शरणम गच्छामी!
धम्मम शरणम गच्छामी!
संघम शरणम गच्छामी!

पञ्चशील या प्रकारे आहेत :
१) मी जीवहींसे पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
२) मी चोरी करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
३) मी कामवासना आणि व्यभिचारा पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
४) मी खोट बोलणे आणि निंदा नालस्ती करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
५) मी मद्य आणि इतर मादक पदार्थांच्यासेवना पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.

..................................................

बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांचे जीवन बदलून टाकलं. या समाजाचे शेणाचे हात पेणाला लावले आणि या समाजाने एक अनोखं अनुभव विश्व जगासमोर आणलं. हजारो वर्ष खितपतपडलेला समाजात बाबासाहेबांनी रक्तहिन क्रांती घडविली. हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हि प्रतिज्ञा 21 वर्ष जगातील सर्व धर्मांचा आभ्यास करुन पुर्ण केली. माणसाला माणूस म्हणून जगवणारा धर्म स्विकारला.बाबासाहेबांनी केलेल्या धर्मोल्लंघनाला आज 53 वर्ष पुर्ण होत आहेत . हा धम्मचक्र प्रवर्तन दिन चुरायु होवो. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...