अशोक विजयादशमी आणि ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आज ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा !
सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. याच विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १४ अक्टोंबर १९५६ रोजी नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या पाच लाख अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी !
आजही देशाच्या काना कोप-याहून "जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो" चे नारे लावत आंबेडकरी जनसमुदाय दीक्षाभूमिला येतो. जयभीम आणि बाबासाहेबांच्या जयघोषांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीची गाणी आणि बुद्ध वंदना तसेच बुद्ध-भीम गीतांनी पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.मंगलमय होतो. स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते ... बाबासाहेबांच्या पदस्पर्षाने पुणित झालेली माती श्रध्देने भाळी लावून घेतात. बाबासाहेबांचा जयजयकार करीत आणि बुद्ध वंदनेचा उच्चार करीत स्तुपाचे दर्शन घेतात आणि त्या महामानवास म्हणतात की "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या आसवांची वंदना!"
पञ्चशिलाचे पठन करतात आणि म्हणतात "तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगा वरी."
बुद्धं शरणम गच्छामी!
धम्मम शरणम गच्छामी!
संघम शरणम गच्छामी!
पञ्चशील या प्रकारे आहेत :
१) मी जीवहींसे पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
२) मी चोरी करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
३) मी कामवासना आणि व्यभिचारा पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
४) मी खोट बोलणे आणि निंदा नालस्ती करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
५) मी मद्य आणि इतर मादक पदार्थांच्यासेवना पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
..................................................
बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांचे जीवन बदलून टाकलं. या समाजाचे शेणाचे हात पेणाला लावले आणि या समाजाने एक अनोखं अनुभव विश्व जगासमोर आणलं. हजारो वर्ष खितपतपडलेला समाजात बाबासाहेबांनी रक्तहिन क्रांती घडविली. हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हि प्रतिज्ञा 21 वर्ष जगातील सर्व धर्मांचा आभ्यास करुन पुर्ण केली. माणसाला माणूस म्हणून जगवणारा धर्म स्विकारला.बाबासाहेबांनी केलेल्या धर्मोल्लंघनाला आज 53 वर्ष पुर्ण होत आहेत . हा धम्मचक्र प्रवर्तन दिन चुरायु होवो. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.
आज ५3 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन दिवशी सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा !
सम्राट अशोकाने विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साठी आपले जीवन समर्पित केले. याच विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १४ अक्टोंबर १९५६ रोजी नागपुर च्या पवित्र दीक्षाभूमिला आपल्या पाच लाख अनुयायी सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. म्हणून या दिवसाला दुहेरी महत्व प्राप्त झाले आहे. किती पावन दिवस तो आणि किती पावन ती भूमी, दीक्षाभूमी !
आजही देशाच्या काना कोप-याहून "जय भीम बोलो और दीक्षाभूमी चलो" चे नारे लावत आंबेडकरी जनसमुदाय दीक्षाभूमिला येतो. जयभीम आणि बाबासाहेबांच्या जयघोषांनी सर्व परिसर दुमदुमून जातो. जिकडे तिकडे सभा, भीमस्तुतीची गाणी आणि बुद्ध वंदना तसेच बुद्ध-भीम गीतांनी पूर्ण परिसर पवित्र होऊन जातो.मंगलमय होतो. स्तुपाच्या दर्शनासाठी जनतेची खुप लांब रांग असते ... बाबासाहेबांच्या पदस्पर्षाने पुणित झालेली माती श्रध्देने भाळी लावून घेतात. बाबासाहेबांचा जयजयकार करीत आणि बुद्ध वंदनेचा उच्चार करीत स्तुपाचे दर्शन घेतात आणि त्या महामानवास म्हणतात की "भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या आसवांची वंदना!"
पञ्चशिलाचे पठन करतात आणि म्हणतात "तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी, तुझेच धम्मचक्र हे फिरे जगा वरी."
बुद्धं शरणम गच्छामी!
धम्मम शरणम गच्छामी!
संघम शरणम गच्छामी!
पञ्चशील या प्रकारे आहेत :
१) मी जीवहींसे पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
२) मी चोरी करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
३) मी कामवासना आणि व्यभिचारा पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
४) मी खोट बोलणे आणि निंदा नालस्ती करण्या पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
५) मी मद्य आणि इतर मादक पदार्थांच्यासेवना पासून अलिप्त राहण्याचा प्रण करतो.
..................................................
बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांचे जीवन बदलून टाकलं. या समाजाचे शेणाचे हात पेणाला लावले आणि या समाजाने एक अनोखं अनुभव विश्व जगासमोर आणलं. हजारो वर्ष खितपतपडलेला समाजात बाबासाहेबांनी रक्तहिन क्रांती घडविली. हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हि प्रतिज्ञा 21 वर्ष जगातील सर्व धर्मांचा आभ्यास करुन पुर्ण केली. माणसाला माणूस म्हणून जगवणारा धर्म स्विकारला.बाबासाहेबांनी केलेल्या धर्मोल्लंघनाला आज 53 वर्ष पुर्ण होत आहेत . हा धम्मचक्र प्रवर्तन दिन चुरायु होवो. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा