विजयादशमी. दसरा. हे शब्द कानावर येताच आठवतात. सोनं म्हणून एकमेकांनी दिली जाणारी आपट्याची पानं. आप्त नातेवाईकांचे घेतलेलं दर्शन. संध्याकाळी रामलीला मैदानावर भरगच्च गर्दीत बघीतलेलं रावण दहन. यासगळ्या माझ्या औरंगाबादच्या बालपणीच्या आठवणी.
यंदाचा माझा दसरा... विजयादशमी... धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मुंबईत असणार आहे. उद्यावर येवून ठेपलेल्या या सणाचं मला इथं जराही अप्रुप नाही.
हिंदू मायथालॉजीत दसरा किंवा दशहरा , विजयादशमीला वेगवेगळे अर्थ आहेत. आणि त्या अर्थानं यंदाचा दसरा राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
शस्त्रास्त्रांची पुजा करुन नवीन भूमी जिंकण्यासाठी पुर्वी सीमोल्लंघन या दिवशी केलं जात होतं. समाजातील आसुरी प्रवृत्तींवर शौर्यानं विजय मिळवून हा विजय साजरा करणं हे ह्या दिवसाचं महत्वं.
याच दसरा दिवाळीच्या काळात यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि राजकीय पटलावरचं सीमोल्लंघन उभा महाराष्ट्र देश पाहणार आहे.
आज म्हणजे दस-याच्या पुर्वसंध्येला राज ठाकरेंनी विधानसेभेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील भांडूप येथून केला. तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी सुशीलकुमार आणि दोघांच्याही कन्या सुप्रिया - प्रणिती (आता या दोघी केवळ यांच्या कन्यका नाहीत तर एक खासदार सुप्रिया सुळे तर दुसरी आमदार होण्यासाठी मध्य सोलापूर मधून रिंगणात उतरलीय.) यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथे फोडला.
पुर्वी समारंगणावर जाण्यासाठी दस-याचा मुहुर्त निवडला जात होता. आता या नेत्यांना जनतेवर आणि महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठीही दस-याचा आयता मुहुर्त सापडला आहे. आता ही सर्व नेतेमंडळी महाराष्ट्रतील महानगरांपासून शहर, वाड्या वस्त्यांवर आपल्या एसी गाड्यांची धूळ झाडणार आहेत.
आचारसंहितेच्या बडग्यामुळे पुर्वीसारखे निवडणूकीचे वातावरण आता दिसत नाही. सामान्यमाणूस निवडणूकीपासून अलिप्त असल्यासारखा दिसत असला तरी तो या निवडणूकीने भारवून गेलेला काही दिवसांमधे दिसेल. कारण या एका निमीत्तानेच जनतेचे सेवक असणारे हे तथाकथीत नेते आपल्या दारांचे उंबरे झिजवतात. अन्यथा काय देणं घेणं असतं हो यांना सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी. लोकलमधल्या जिवघेण्या गर्दीत हे कधीच नसतात. किराणामालाचे भाव वाढले म्हणून महिन्याचा ताळेबंद बसवण्याच्या चिंतेने यांना कधी ग्रासलेले नसते. की मुलांच्या अँडमिशनसाठी शाळा - कॉलेजांच्या खेट्या यांना माराव्या लागत नाही. दवाखाण्यातल्या खाटा भरल्या म्हणून वरांड्यात, कॅनॉपि मध्ये हे नेते किंवा यांचे सगेसोयरे कधीच डॉक्टरच्या प्रतिक्षेत पडलेले नसतात. या समस्या यांना माहित नाहीत असंही काही नाही. मात्र सगळं कळूनही आम्ही त्या गावचे नाही असाच यांचा कायम पवित्रा असतो.
या विधानसभा निवडणूकीच्या निमीत्ताने बीजली-सडक-पाणी , स्वस्त धान्य पुरविण्याचे आश्वासन हे मागील पाच वर्षात पैशाने गब्बर झालेले नेते आपट्याच्या पानांप्रमाणे जनतेला देतील. आणि आपापल्या रंगमहालात शानदार फराळासह विजयाचे फटाके उडवतिल. तुर्तास आपणही निवडणूकीचा रंगलेला फड बघत राहू.
यंदाचा माझा दसरा... विजयादशमी... धम्मचक्र प्रवर्तन दिन हा मुंबईत असणार आहे. उद्यावर येवून ठेपलेल्या या सणाचं मला इथं जराही अप्रुप नाही.
हिंदू मायथालॉजीत दसरा किंवा दशहरा , विजयादशमीला वेगवेगळे अर्थ आहेत. आणि त्या अर्थानं यंदाचा दसरा राजकीयदृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.
शस्त्रास्त्रांची पुजा करुन नवीन भूमी जिंकण्यासाठी पुर्वी सीमोल्लंघन या दिवशी केलं जात होतं. समाजातील आसुरी प्रवृत्तींवर शौर्यानं विजय मिळवून हा विजय साजरा करणं हे ह्या दिवसाचं महत्वं.
याच दसरा दिवाळीच्या काळात यंदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका आल्या आणि राजकीय पटलावरचं सीमोल्लंघन उभा महाराष्ट्र देश पाहणार आहे.
आज म्हणजे दस-याच्या पुर्वसंध्येला राज ठाकरेंनी विधानसेभेच्या प्रचाराचा शुभारंभ मुंबईतील भांडूप येथून केला. तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांच्या प्रचाराचा नारळ शरद पवारांनी सुशीलकुमार आणि दोघांच्याही कन्या सुप्रिया - प्रणिती (आता या दोघी केवळ यांच्या कन्यका नाहीत तर एक खासदार सुप्रिया सुळे तर दुसरी आमदार होण्यासाठी मध्य सोलापूर मधून रिंगणात उतरलीय.) यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ येथे फोडला.
पुर्वी समारंगणावर जाण्यासाठी दस-याचा मुहुर्त निवडला जात होता. आता या नेत्यांना जनतेवर आणि महाराष्ट्रावर राज्य करण्यासाठीही दस-याचा आयता मुहुर्त सापडला आहे. आता ही सर्व नेतेमंडळी महाराष्ट्रतील महानगरांपासून शहर, वाड्या वस्त्यांवर आपल्या एसी गाड्यांची धूळ झाडणार आहेत.
आचारसंहितेच्या बडग्यामुळे पुर्वीसारखे निवडणूकीचे वातावरण आता दिसत नाही. सामान्यमाणूस निवडणूकीपासून अलिप्त असल्यासारखा दिसत असला तरी तो या निवडणूकीने भारवून गेलेला काही दिवसांमधे दिसेल. कारण या एका निमीत्तानेच जनतेचे सेवक असणारे हे तथाकथीत नेते आपल्या दारांचे उंबरे झिजवतात. अन्यथा काय देणं घेणं असतं हो यांना सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी. लोकलमधल्या जिवघेण्या गर्दीत हे कधीच नसतात. किराणामालाचे भाव वाढले म्हणून महिन्याचा ताळेबंद बसवण्याच्या चिंतेने यांना कधी ग्रासलेले नसते. की मुलांच्या अँडमिशनसाठी शाळा - कॉलेजांच्या खेट्या यांना माराव्या लागत नाही. दवाखाण्यातल्या खाटा भरल्या म्हणून वरांड्यात, कॅनॉपि मध्ये हे नेते किंवा यांचे सगेसोयरे कधीच डॉक्टरच्या प्रतिक्षेत पडलेले नसतात. या समस्या यांना माहित नाहीत असंही काही नाही. मात्र सगळं कळूनही आम्ही त्या गावचे नाही असाच यांचा कायम पवित्रा असतो.
या विधानसभा निवडणूकीच्या निमीत्ताने बीजली-सडक-पाणी , स्वस्त धान्य पुरविण्याचे आश्वासन हे मागील पाच वर्षात पैशाने गब्बर झालेले नेते आपट्याच्या पानांप्रमाणे जनतेला देतील. आणि आपापल्या रंगमहालात शानदार फराळासह विजयाचे फटाके उडवतिल. तुर्तास आपणही निवडणूकीचा रंगलेला फड बघत राहू.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा