मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेते हवेत मुद्दे जमीनीवर, बिहारमध्ये पंतप्रधानांपासून सर्वांचेच ताळतंत्र सुटले

बिहार विधानसभा निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १६ महिन्यांच्या कामाची परीक्षा आहे. त्यांनी त्यांची सर्व शक्ती तिथे पणाला लावली आहे. त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत.त्याचमुळे त्यांचे बोलण्याचे ताळतंत्र सुटले आहे. याचे दुषण भाजप समोरच्या महाआघाडीतील जेडीयू-आरजेडी-काँग्रेसला देईलही . पण जनतेला हे कळणार नाही असे केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही मोदींना कसे कळत नाही याचेच नवल वाटते. बस्तरच्या सभेत तर पंतप्रधानांनी थेट नितीशकुमार आणि लालू यादवांना आव्हानच केले की तुमच्याकडे जेवढ्या शिव्या असतील तेवढ्या आता देऊन टाका, शेवटचे सात-आठ दिवसच शिल्लक राहिले आहे. आज बिहार विधानसेभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे.  त्यानिमीत्ताने एक दिवस आधीच मी दिव्य मराठी वेब साईटसाठी (divyamarathi.com) आतापर्यंतच्या प्रचारावर माझे मत मांडले होते. त्यात विकासापासून सुरु झालेली चर्चा आता शिवीगाळीवर आणि तंत्र-मंत्रात अडकल्याचे मांडले आहे. आज बिहारमध्ये ५० जगांसाठी मतदान होत आहे. त्यानिमीत्ताने वेबसाईटसाठीेचे विश्लेषण पुन्हा एकदा माझ्या BLOG वर पुनर्प्रकाशित करीत आहे.   नेते हवेत मुद्दे ...

'पुरस्कार वापसी'

माझे एक गुरुवर्य  म्हणाले, सदानंद मोरे यांनी त्यांचा पुरस्कार 'इंद्रायणीत बुडवला' असता तर सनातन्यांवर किती मोठा सूड उगवला असता...  खरं आहे हे. तुकारामाचे वंशज सांगताना यांचा ऊर फुटेस्तोवर फुलून येतो पण तुकारामासारखे एक पाऊल टाकायचे झाले तर... असो... त्यांचा पुरस्कार-अध्यक्षपद त्यांना लखलाभ. साहित्यिकांनी पुरस्कार परत केल्याने गेंड्याच्या कातडीच्या लोकांना काही फरक पडणार आहे का ? तर नक्कीच नाही, असे याचे उत्तर असू शकत नाही. हा प्रतिकात्मक विरोध आहे. साहित्यिकांनी त्यांचा निषेध कसा नोंदवावा हा त्यांचा अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रुढी-बंधनातून मागास समाजाची मुक्ती करण्यासाठी मनुस्मृती दहन केले होते. हे देखील प्रतिकात्मकच आंदोलन होते. एक मनुस्मृती जाळल्याने सनातन्यांची मानसिकता बदलली का ? पण त्यावर घाव घातला गेला. समजातील बुद्धीवंतांना असे घाव वेळोवेळी घालावे लागत आले आहेत. तेच काम आजच्या केंद्रातील सरकारविरोधात आणि देश पोखरून काढणाऱ्या त्यांच्या भाऊबंदांविरोधात साहित्यिकांनी सुरु केले आहे. त्याचे स्वागत झाले पाहिजे. 'पुरस्कार ...

उजेडाची फुलं कोण जपणार ?

तुम्ही एक दिवस घरी उशिरा जाणार असाल तर बायकोचे नाहीतर आईचे पाच-दहा फोन येऊन गेलेले असतात. केव्हा येशील.  कुठे आहेस. किती वेळ लागले. कोणासोबत आहे. यापेक्षा  काही वेगळे प्रश्न तुमच्या कुटुंबियांच्या मनात येत नसतील. पण तो आता तुरुंगाचाच होऊन गेला आहे. त्याच्या दीड वर्षाच्या मुलाने सात महिन्यापूर्वी आपल्या बापाला पाहिले होते जाळीपलिकडे. त्या पोराला आपल्या बापाच्या खांद्यावर बसून गावभर फिरावं वाटलं नसेल का?  त्याच्या आई-बापाच्या दुखण्यात त्यांना वाटलं  नसेल का, की लेक असता तर दहा ठिकाणी घेऊन गेला असता आपल्याला. त्या क्रांतिकारी भगिनीच्या अंर्तमनाची घालमेल वेगळी  सांगायची काय गरज आहे. तिच्या मनात क्रांतीची आग आहे आणि ओठावर नक्षलवादी असल्याच्या संशयाने तुरुंगात टाकलेला नवरा - जीवनसाथी सचिन माळीचे गीत आहे. शीतल साठे आणि सचिन माळी यांना नक्षलवादी असल्याच्या संशयाने महाराष्ट्राची एटीएस शोधत होते. यांचा गुन्हा काय तर बुद्ध-फुले-शाहू-बाबासाहेबांची गीतं लिहातात आणि म्हणतात.  दोघांनीही 2013 मध्ये मंत्रालयासमोर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. कारण काय तर आम्ही नक्...

BHAi UNMESH: भारत किती स्वच्छ

BHAi UNMESH: भारत किती स्वच्छ : >> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त...

भारत किती स्वच्छ

>> भारत किती स्वच्छ  नुकत्याच झालेल्या गांधी जयंतीला 'स्वच्छ भारत' अभियानाला एक वर्ष पूर्ण झाले.  या दिवशी गांधींऐवजी,  त्यांनी भगवान गौतम बुद्धांपासून घेतलेल्या अहिंसे ऐवजी स्वच्छतेचीच चर्चा जिकडे तिकडे होती. ही चांगली गोष्ट देखील आहे. लोक स्वच्छतेबाबत जागरुक होत आहे यात कोणालाही अडचण असण्याचे काही कारण नाही. महापुरुष हे आंधळ्यांच्या हाती लागलेल्या हत्तीसारखे असतात. ज्यांच्या हाताला जो भाग लागला ते त्याच अनुषंगाने त्यांचे विश्लेषण करतात यात महापुरुषाला दोष देता येणार नाही. केंद्रात भाजपचे सरकार (एनडीएचे सरकार आहे हे एनडीएचे घटक पक्षही विसरले असतील आतापर्यंत) आल्यापासून गांधींच्या अहिंसेऐवजी त्यांची स्वच्छताच अधिक चर्चेत आली आहे. नाही तर काँग्रेसच्या काळात गांधी जयंतीच्या आधीपासून आणि नंतरचे काही दिवस गांधींवर तत्कालिन माध्यमांमध्ये जी चर्चा होत होती त्यात गांधीचा स्वातंत्र्यासाठीचा लढा... हातात शस्त्र न घेता इंग्रजांची सत्ता उलथवून टाकणे... अहिंसेचे पुजारी... अशाच गांधींची चर्चा होत होती. आता वर्ध्यातील आश्रमात गांधींनी कोणाकोणाला संडास साफ करायला लावले. संडा...