मुख्य सामग्रीवर वगळा

(अ)सत्यबाबाची पूजा

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक संपली. काँग्रेस - राष्ट्रवादीला अनपेक्षित बहूमत मिळले. आणि पुन्हा एकदा शंकरराव चव्हाण पुत्र अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. अशोक चव्हाण विक्रमी मताधिक्याने निवडून आले. हे सगळं यश मुख्यमंत्र्यांना लोकशाहीतील मतदारराजा आणि काँग्रेसश्रेष्ठींच्या कृपादृष्टीमुळे मिळालेले आहे, हे महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान न केलेला एखादा पोरही सांगू शकेल. मात्र चव्हाणांचा विश्वास लोकशाहीतील 'देवा' पेक्षा देव-देव करणा-या बाबावरच जास्त असल्याचे रविवारी महाराष्ट्रदेशाने पाहिले.

राजकारणी कुडमुड्या जोतिषा पासून 'जागृत' देवस्थानाचे निस्सीम भक्त असतात. हे ही सर्वश्रुत आहे. डाव्या चळवळीतील - पुरोगामी म्हणविणारेही बरेच जण चोरुन लपून देवदर्शन घेऊन येतात. मुलाबाळांच्या लग्न पत्रिकांवर याच्या त्याच्या कृपेनं छापतात. वेगवेगळ्या नावाने भंडारा, कंदूरी, न्याज च्या पंगती उठवतात. मात्र काल मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शासकीय निवासस्थानी , शासकीय खर्चाने , सुटीच्या दिवशी शासनाचे कर्मचारी राबवले ते सत्यसाईबाबाची पाद्यपूजा करण्यासाठी.

उठता बसता पुरोगामीत्वाची टिमकी मिरवणारे काँग्रेसीही यावेळी चव्हाणांची पाठराखण करतांनाच दिसत होते. शाहु-फुले-आंबेडकरांचे उठता बसता नाव घ्यायचे आणि त्यांच्याच महाराष्ट्रात भोंदू बाबाची शासकीय पूजा करुन घ्यायची . हे फक्त या काँग्रेसींनाच जमु शकतं.

ह्या सत्यसाईबाबाचा इतिहास आणि भक्तगण पाहिलातर त्याचीही या राजकारण्यांमधे बरीच उठबस दिसून येते. काँग्रेसचे हेडमास्तर तथा मुख्यमंत्र्यांचे पिताश्रीही या बाबाचे कट्टर भक्त होते. तसेच तासा तासाला कपडे बदलणारे शिवराज पाटील चाकूरकरांपासून, डोईवरील एकही केस न विस्कटू देणारे विलासराव देशमुखांपर्यत सर्वजण या (अ)सत्यबाबाचे पट्टशिष्य. यासोबतच आंध्र- कर्नाटकातही या बाबाच भक्तगण मोठ्याप्रमाणात आहे. आपल्या भक्तांना हा बाबा हवेतून सोन्याची साखळी काढून देतो. कायम आपल्याच धुंदीत असल्यासारखा वेडेवाकडे हातवारे काय करत असतो. आणि मह्त्वाचं म्हणजे या बाबाचे भक्त हे कोट्याधीश, सत्ताधारी , पुंजीपतीच कसे काय. या बाबाच्या सत्याचा भास- आभास काय फक्त पैशांच्या जोरावरच होतो की काय ? मुख्यमंत्र्यांनी किंवा इतरांनीही कोणाची पूजा करावी , कुठे करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . हे आम्हालाही मान्य. परंतू आमच्या कर रुपी पैशातून ज्या बंगल्याचा खर्च चालतो. तेथील कर्मचा-यांचे पगार दिले जातात. तिथे ही सवंग भक्ती करायची यांची हिम्मत तरी कशी होते. तुम्हाला पाद्यपूजा की काय ते करायचे तर तुमच्या मालकीच्या घरात जावून करा. मात्र त्यानंतर आमच्या शाहू - फुल्यांचे नाव घेवू नका. महाराष्ट्राने तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. आमच्या जीवावर तुमचे चोचले पूरवण्याचे लायसन्स नाही. हा (अ)सत्यसाईबाबा स्वत:ला देवाचा अवतार समजतो. आणि महाराष्ट्रदेशाचे मुख्यमंत्री , राष्ट्रवादीचे जयंत पाटील महाराष्ट्रच्या पुरोगामीत्वाचे श्राध्द घातल्यासारखे या बाबाची साग्रसंगीत पूजा करतात. यांच्या या अशा वागण्याने देऊळा- राऊळात जावून दगडात देव शोधणा-या सामान्य माणसाचाही देवावरचा विश्वास उडायचा...

'वर्षा'वर भूत-प्रेतांचा वावर आहे. अशाही बातम्या काल दिवसभर मिडियात होत्या. या भुतांचे शांतवन करण्यासाठीतर अशोकराव तुम्ही हा पूजेचा घाट घातला नव्हाताना. मात्र तुम्हाला सळो की पळो करणारं भूत पूढील पाच वर्ष तुमच्या आजू बाजूलाच राहणार आहे. हे तुम्ही कसं विसरता. त्यासाठी कोणत्या पूजा करणार हे ही सांगून टाका.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...