6 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम दलित जनता कधीच विसरू शकणारी नाही. याच दिवशी सर्व दलित, पिडित, तळागळातील समाजाचे उध्दारकर्ते भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेला उद्या 53 वर्ष होतील. या 53 वर्षात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलित चळवळ ही आंबेडकरी चळवळ म्हणून नावारुपास आली. बाबासाहेबांनतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी चळवळीला एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवले. मात्र त्यांच्यानंतरच्या पिढीने रिपब्लिकन पक्ष आणि दलित चळवळ बौध्दांपूरती मर्यादीत करुन टाकली. आजच्या रिपब्लिकन नेत्यांनीतर आपापल्या वाट्याहिश्याला येईल तेवढे काखोटीला मारण्याचा एकमेव कार्यक्रम केलेला आहे. त्यात कोणी खासदारकी तर कोणी राज्यपालपदाची येस्करकी मिळवण्यातच धन्यता मानलेली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रमुख रिपाई नेते रामदास आठवले, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी.एम. कांबळे, यांचे संसदीय राजकारण संपुष्टात आल्यातच जमा आहे. यातील एकही जण खासदार होऊन देशाच्या संसदेत तर गेलेच नाही मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता महाराष्ट्रातही एक आमदार देखील कुणाकडे नाही. नवा मतदार यानेत्यांनी तोडला आहे. त्याला हे नेते जोडूच शकलेले दिसत नाही. 80 नंतरची तरुणपिढी ही कुठेच रिपब्लिकन पक्षासोबत जोडली गेलीय असं चित्र नाही. प्रामुख्याने उच्चशिक्षीत तरुण. मग तो तरुण डॉक्टर,वकिल, इंजिनियर, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा, हा तरुण कुठेच चळवळीशी जोडलेला नाही. याचे कारणे शोधण्याचीही तसदी ही तथाकथीत नेतेमंडळी घेतांना दिसत नाही.
आजची सामाजीक मानसीकता बदलली आहे. रोजगाराच्या संधी बदलल्या आहेत. तरीही नेते पारंपरिक प्रश्नांवरच आपले लढे उभारत आहे. आज गायरान जमीन किंवा शिष्यवृत्ती वाढीचा मुद्दा महत्त्वाचा नाही तर नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आपले अस्तित्व कुठे आहे , उद्या आपण कुठे असणार आहोत, याचा ताळेबंद यांच्याकडे नाही. ग्रामीण भागातील शेतक-यांच्या समस्या काय, कारखाने बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्या दलित बहुजन माणसाचे काय आणि खासगी विद्यापीठांमधील महागडे शिक्षण, व्यवसायीक शिक्षण, तंत्र शिक्षण दलित - बहुजन तरुणांना कसे उपलब्ध होईल यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे. नव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे. याची माहिती या तरुणांना तथाकथीत आंबेडकरी विचारवंत, नेत्यांकडून मिळायला हवी. जर या नव्या पिढीच्या रोजीरोटीच्या प्रश्नांना या नेत्यांकडे प्राधान्य नसेल तर त्यांनाही यानेत्यांचे अस्तित्व नकोशे झाले तर आश्चर्य वाटायला नको.
सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवता येईल एवढे संख्याबळ असूनही आज तुकड्या तुकड्यांमधे आपण विभागलो गेलो आहोत. त्यामुळे सत्तेच्या दारात उभेराहण्याचीही आपली लायकी उरलेली नाही. अशी सध्याची अवस्था आहे. यासर्वांनी एकत्र लढा उभारावा असाही आग्रह नाही. मात्र जे काही करणार असतील त्यात त्यांनी नव्याचा शोध घ्यावा एवढी आपेक्षा आहे. बाबासाहेबांच्या 53 व्या महापरिनिर्वाणदिनी मागील पन्नासवर्षातील चुका सुधारण्याचा आणि we can... चा जोरदार नारा देण्याची गरज आहे.
जयभीम.
नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रमुख रिपाई नेते रामदास आठवले, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी.एम. कांबळे, यांचे संसदीय राजकारण संपुष्टात आल्यातच जमा आहे. यातील एकही जण खासदार होऊन देशाच्या संसदेत तर गेलेच नाही मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता महाराष्ट्रातही एक आमदार देखील कुणाकडे नाही. नवा मतदार यानेत्यांनी तोडला आहे. त्याला हे नेते जोडूच शकलेले दिसत नाही. 80 नंतरची तरुणपिढी ही कुठेच रिपब्लिकन पक्षासोबत जोडली गेलीय असं चित्र नाही. प्रामुख्याने उच्चशिक्षीत तरुण. मग तो तरुण डॉक्टर,वकिल, इंजिनियर, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा, हा तरुण कुठेच चळवळीशी जोडलेला नाही. याचे कारणे शोधण्याचीही तसदी ही तथाकथीत नेतेमंडळी घेतांना दिसत नाही.
आजची सामाजीक मानसीकता बदलली आहे. रोजगाराच्या संधी बदलल्या आहेत. तरीही नेते पारंपरिक प्रश्नांवरच आपले लढे उभारत आहे. आज गायरान जमीन किंवा शिष्यवृत्ती वाढीचा मुद्दा महत्त्वाचा नाही तर नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आपले अस्तित्व कुठे आहे , उद्या आपण कुठे असणार आहोत, याचा ताळेबंद यांच्याकडे नाही. ग्रामीण भागातील शेतक-यांच्या समस्या काय, कारखाने बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्या दलित बहुजन माणसाचे काय आणि खासगी विद्यापीठांमधील महागडे शिक्षण, व्यवसायीक शिक्षण, तंत्र शिक्षण दलित - बहुजन तरुणांना कसे उपलब्ध होईल यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे. नव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे. याची माहिती या तरुणांना तथाकथीत आंबेडकरी विचारवंत, नेत्यांकडून मिळायला हवी. जर या नव्या पिढीच्या रोजीरोटीच्या प्रश्नांना या नेत्यांकडे प्राधान्य नसेल तर त्यांनाही यानेत्यांचे अस्तित्व नकोशे झाले तर आश्चर्य वाटायला नको.
सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवता येईल एवढे संख्याबळ असूनही आज तुकड्या तुकड्यांमधे आपण विभागलो गेलो आहोत. त्यामुळे सत्तेच्या दारात उभेराहण्याचीही आपली लायकी उरलेली नाही. अशी सध्याची अवस्था आहे. यासर्वांनी एकत्र लढा उभारावा असाही आग्रह नाही. मात्र जे काही करणार असतील त्यात त्यांनी नव्याचा शोध घ्यावा एवढी आपेक्षा आहे. बाबासाहेबांच्या 53 व्या महापरिनिर्वाणदिनी मागील पन्नासवर्षातील चुका सुधारण्याचा आणि we can... चा जोरदार नारा देण्याची गरज आहे.
जयभीम.
bhai unmesh tumche likhan prabhavi ahe.. tumhi dalit chalvali lihit chala... adnyani samajala apan sadnyan kele pahije... jai bhim!
उत्तर द्याहटवाgajanan jogdadnd
dainik lokprabodhan, aurangabad, maharashtra.
जोगदंडजी धन्यवाद.
हटवा