मुख्य सामग्रीवर वगळा

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

6 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम दलित जनता कधीच विसरू शकणारी नाही. याच दिवशी सर्व दलित, पिडित, तळागळातील समाजाचे उध्दारकर्ते भारतरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. या घटनेला उद्या 53 वर्ष होतील. या 53 वर्षात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दलित चळवळ ही आंबेडकरी चळवळ म्हणून नावारुपास आली. बाबासाहेबांनतर कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी चळवळीला एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन ठेवले. मात्र त्यांच्यानंतरच्या पिढीने रिपब्लिकन पक्ष आणि दलित चळवळ बौध्दांपूरती मर्यादीत करुन टाकली. आजच्या रिपब्लिकन नेत्यांनीतर आपापल्या वाट्याहिश्याला येईल तेवढे काखोटीला मारण्याचा एकमेव कार्यक्रम केलेला आहे. त्यात कोणी खासदारकी तर कोणी राज्यपालपदाची येस्करकी मिळवण्यातच धन्यता मानलेली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत प्रमुख रिपाई नेते रामदास आठवले, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, टी.एम. कांबळे, यांचे संसदीय राजकारण संपुष्टात आल्यातच जमा आहे. यातील एकही जण खासदार होऊन देशाच्या संसदेत तर गेलेच नाही मात्र बाळासाहेब आंबेडकर वगळता महाराष्ट्रातही एक आमदार देखील कुणाकडे नाही. नवा मतदार यानेत्यांनी तोडला आहे. त्याला हे नेते जोडूच शकलेले दिसत नाही. 80 नंतरची तरुणपिढी ही कुठेच रिपब्लिकन पक्षासोबत जोडली गेलीय असं चित्र नाही. प्रामुख्याने उच्चशिक्षीत तरुण. मग तो तरुण डॉक्टर,वकिल, इंजिनियर, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा, हा तरुण कुठेच चळवळीशी जोडलेला नाही. याचे कारणे शोधण्याचीही तसदी ही तथाकथीत नेतेमंडळी घेतांना दिसत नाही.

आजची सामाजीक मानसीकता बदलली आहे. रोजगाराच्या संधी बदलल्या आहेत. तरीही नेते पारंपरिक प्रश्नांवरच आपले लढे उभारत आहे. आज गायरान जमीन किंवा शिष्यवृत्ती वाढीचा मुद्दा महत्त्वाचा नाही तर नव्याने निर्माण झालेल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीत आपले अस्तित्व कुठे आहे , उद्या आपण कुठे असणार आहोत, याचा ताळेबंद यांच्याकडे नाही. ग्रामीण भागातील शेतक-यांच्या समस्या काय, कारखाने बंद पडल्यामुळे बेरोजगार झालेल्या दलित बहुजन माणसाचे काय आणि खासगी विद्यापीठांमधील महागडे शिक्षण, व्यवसायीक शिक्षण, तंत्र शिक्षण दलित - बहुजन तरुणांना कसे उपलब्ध होईल यासाठी आंदोलन उभारण्याची गरज आहे. नव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, त्यासाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे. याची माहिती या तरुणांना तथाकथीत आंबेडकरी विचारवंत, नेत्यांकडून मिळायला हवी. जर या नव्या पिढीच्या रोजीरोटीच्या प्रश्नांना या नेत्यांकडे प्राधान्य नसेल तर त्यांनाही यानेत्यांचे अस्तित्व नकोशे झाले तर आश्चर्य वाटायला नको.

सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवता येईल एवढे संख्याबळ असूनही आज तुकड्या तुकड्यांमधे आपण विभागलो गेलो आहोत. त्यामुळे सत्तेच्या दारात उभेराहण्याचीही आपली लायकी उरलेली नाही. अशी सध्याची अवस्था आहे. यासर्वांनी एकत्र लढा उभारावा असाही आग्रह नाही. मात्र जे काही करणार असतील त्यात त्यांनी नव्याचा शोध घ्यावा एवढी आपेक्षा आहे. बाबासाहेबांच्या 53 व्या महापरिनिर्वाणदिनी मागील पन्नासवर्षातील चुका सुधारण्याचा आणि we can... चा जोरदार नारा देण्याची गरज आहे.

जयभीम.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...