मुख्य सामग्रीवर वगळा

संमातर सेन्सॉर

2010 या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगलीच नटरंगी झाली. 1 जानेवारीला नटरंग प्रदर्शित झाला, त्याला सबंध महाराष्ट्रदेशातून उत्तम प्रतिसाद लाभलाय. नंटरंगच्या मागोमाग झेंडा हा ठाकरे घराण्याचा राजकीयपट मांडणारा चित्रपट मराठी रसिक मायबापाच्या भेटीस उत्सुक होता. यानंतर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय म्हणणारे महेश मांजरेकर शिक्षणाच्या आयचा घो... म्हणत येणार होते. या दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने मान्यताही दिलेली आहे. मात्र झेंडा मुळे कुणाचा तरी स्वाभिमान दुखावलाय तर, मांजरेकरांच्या चित्रपटाचे नाव शिवराळ असल्यामुळे त्याच्या नामांतरासाठी शिवबाचे मराठे बाह्या सरसावून पुढे आलेत.


शासनाचे सेन्सॉर बोर्ड, न्यायालय या व्यवस्था असतांना तिथे दाद मागण्याची कुणाचीच तयारी नाही. जनतेच्या दरबारातही या चित्रपटांचे भवितव्य ठरुदेत असं कोणीही म्हणायला तयार नाही.


सेन्सॉर बोर्डला समांतर सेन्सॉरशिप ही काही आजचीच बाब नाही. अनेक चित्रपट - नाटके हे या सेन्सॉरशिपच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक , दिपा मेहतांचा वॉटर यासह अनेक कलाकृतींना या मुठभर अस्मिता, धर्मिक भावना, स्वाभिमान दुखावल्याच्या कारणावरुन आपल्या प्रदर्शनावर बंदी आणावी लागली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही अशी गळचेपी होवूनही कलाकार एकत्र येवून याविरोधात आवाज का उठवत नाही. या प्रश्नाचेही उत्तर अजून मिळालेले नाही.


सिने-नाट्य कलाकारांबाबतच असं घडतं असंही काही नाही, चित्रकार, साहित्यीक यांनाही या समांतर सेन्सॉर बोर्डाचा तेवढाच त्रास होतो. मात्र आजपर्यंत हे साहित्यीकही या विरोधात एकत्र आलेले नाही. मागील वर्षी आनंद यादवांना त्यांच्या पुस्तकातील भाग वगळूनही साहित्यासंमेलनाचे अध्यक्षपद भुषविता आले नाही. अध्यक्षाविना संमेलन पार पडले.


आता वळुयात आपल्या मुळ मुद्याकडे, झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा घो...


नटरंगच्या झगमगीत यशानंतर झेंडा हा बहुचर्चीत चित्रपट प्रदर्शित होता होता राहिलाय. झेंडा ठाकरे घराण्यावर आधारीत चित्रपट. त्यामुळे ठाकरे घराण्यातील राजकारण, त्यांच्यातील फुट आणि त्यांच्या सावलीत मोठे झालेल्या प्रत्येकाचा उल्लेख यात झालेला असणार हे सहाजिक आहे. राज्याचे वसुलीमंत्री नारायण राणे यांचे शेंडेफळाचा स्वाभिमान या चित्रपटातील सदा मालवणकर या व्यक्तीरेखेमुळे दुखावलाय. आता हा स्वाभिमान राणेंच्या सांगण्यावरुनच दुखावलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नितेश राणेची स्वाभिमान संघटना चित्रपटाचे दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांना सदा मालवणकरची व्यक्तीरेखा बदला अन्यथा चित्रपट बंद पाडला जाईल अशा धमक्या देत आहेत. या धमक्यांना घाबरुन , सरकारी व्यवस्थेकडे दाद न मागता गुप्ते साहेबांनी मालवणकर हे नाव बदलण्याचं कबुल केलयं. नुसतच नाव बदलण्याचं कबुल केलं नाही तर ती व्यक्तीरेखाही काढुन टाकण्याचंही मान्य केलं.


यासर्व प्रकारावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे हे कोणीही नाकारणार नाही. मात्र अवधुत गुप्तेंही सरकारकडे दाद नमागता या बदलास का तयार झाले हे कोडेच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...