मुख्य सामग्रीवर वगळा

संमातर सेन्सॉर

2010 या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगलीच नटरंगी झाली. 1 जानेवारीला नटरंग प्रदर्शित झाला, त्याला सबंध महाराष्ट्रदेशातून उत्तम प्रतिसाद लाभलाय. नंटरंगच्या मागोमाग झेंडा हा ठाकरे घराण्याचा राजकीयपट मांडणारा चित्रपट मराठी रसिक मायबापाच्या भेटीस उत्सुक होता. यानंतर मी शिवाजी राजे भोसले बोलतोय म्हणणारे महेश मांजरेकर शिक्षणाच्या आयचा घो... म्हणत येणार होते. या दोन्ही चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने मान्यताही दिलेली आहे. मात्र झेंडा मुळे कुणाचा तरी स्वाभिमान दुखावलाय तर, मांजरेकरांच्या चित्रपटाचे नाव शिवराळ असल्यामुळे त्याच्या नामांतरासाठी शिवबाचे मराठे बाह्या सरसावून पुढे आलेत.


शासनाचे सेन्सॉर बोर्ड, न्यायालय या व्यवस्था असतांना तिथे दाद मागण्याची कुणाचीच तयारी नाही. जनतेच्या दरबारातही या चित्रपटांचे भवितव्य ठरुदेत असं कोणीही म्हणायला तयार नाही.


सेन्सॉर बोर्डला समांतर सेन्सॉरशिप ही काही आजचीच बाब नाही. अनेक चित्रपट - नाटके हे या सेन्सॉरशिपच्या जाळ्यात अडकलेले आहेत. तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे नाटक , दिपा मेहतांचा वॉटर यासह अनेक कलाकृतींना या मुठभर अस्मिता, धर्मिक भावना, स्वाभिमान दुखावल्याच्या कारणावरुन आपल्या प्रदर्शनावर बंदी आणावी लागली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही अशी गळचेपी होवूनही कलाकार एकत्र येवून याविरोधात आवाज का उठवत नाही. या प्रश्नाचेही उत्तर अजून मिळालेले नाही.


सिने-नाट्य कलाकारांबाबतच असं घडतं असंही काही नाही, चित्रकार, साहित्यीक यांनाही या समांतर सेन्सॉर बोर्डाचा तेवढाच त्रास होतो. मात्र आजपर्यंत हे साहित्यीकही या विरोधात एकत्र आलेले नाही. मागील वर्षी आनंद यादवांना त्यांच्या पुस्तकातील भाग वगळूनही साहित्यासंमेलनाचे अध्यक्षपद भुषविता आले नाही. अध्यक्षाविना संमेलन पार पडले.


आता वळुयात आपल्या मुळ मुद्याकडे, झेंडा आणि शिक्षणाच्या आयचा घो...


नटरंगच्या झगमगीत यशानंतर झेंडा हा बहुचर्चीत चित्रपट प्रदर्शित होता होता राहिलाय. झेंडा ठाकरे घराण्यावर आधारीत चित्रपट. त्यामुळे ठाकरे घराण्यातील राजकारण, त्यांच्यातील फुट आणि त्यांच्या सावलीत मोठे झालेल्या प्रत्येकाचा उल्लेख यात झालेला असणार हे सहाजिक आहे. राज्याचे वसुलीमंत्री नारायण राणे यांचे शेंडेफळाचा स्वाभिमान या चित्रपटातील सदा मालवणकर या व्यक्तीरेखेमुळे दुखावलाय. आता हा स्वाभिमान राणेंच्या सांगण्यावरुनच दुखावलाय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नितेश राणेची स्वाभिमान संघटना चित्रपटाचे दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांना सदा मालवणकरची व्यक्तीरेखा बदला अन्यथा चित्रपट बंद पाडला जाईल अशा धमक्या देत आहेत. या धमक्यांना घाबरुन , सरकारी व्यवस्थेकडे दाद न मागता गुप्ते साहेबांनी मालवणकर हे नाव बदलण्याचं कबुल केलयं. नुसतच नाव बदलण्याचं कबुल केलं नाही तर ती व्यक्तीरेखाही काढुन टाकण्याचंही मान्य केलं.


यासर्व प्रकारावरुन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे हे कोणीही नाकारणार नाही. मात्र अवधुत गुप्तेंही सरकारकडे दाद नमागता या बदलास का तयार झाले हे कोडेच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...