आज महाराष्ट्र दिन. (हो दिनच ''दीन'' नाही. ) आज नुसताच महाराष्ट्र दिन नाही तर कामगार दिन देखील आहे. (हे तुम्हाला माहित नाही असं गृहित धरून मी मुळीच लिहीत नाही. तर तुम्हाला हे माहित आहे म्हणूनच लिहित आहे. ) तसच आज महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव. म्हणजेच 1 मे 2010 हा दिवस असा सुवर्ण त्रिकोणाने सजला आहे.
या महाराष्ट्राचा इतिहास वगैरे मी सांगत बसणार नाही. काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे, मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वखुशीने सामिल झालेला मराठवाडा, काहि अटींनीशी महाराष्ट्रात आलेला विदर्भ. हे सगळं तुम्हाला रोजच्या पेपरातून, टिव्ही वरुन वाचायला पहायला मिळत आहेच. काहींना या इतिहासाबद्दल जास्तच जाणून घ्यायचे असेल तर बरीच पुस्तकंही छापली गेली आहेत. त्यामुळे त्यात मी आणखी काय वेगळं सांगणार. असो.
हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र शासन धुमधडाक्यात साजरा करत आहे. (शासनाने तसं त्यांच्या फाईलींवर, डाय-यांवर , जाहिरातीत 50चा आकडा आणि तुतारीचे चित्र दाखवायला कधीपस्नचं सुरुवात केलीय. ) महाराष्ट्र शासन साजरा करत आहे म्हणजे कांग्रेस, राष्ट्रवादी. मग शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मराठी आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि मुद्यावर वाढलेल्या पक्षांनी काय फक्त सरकारी खेळच पहात रहायचा का ? तर बिलकूल नाही आणि भाजपाचे म्हणाल तर हा राष्ट्रीय पक्ष. या पक्षाचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा . कदाचित भाजपा 1 मे काळा दिवसही साजरा करतील. त्यामुळे या सेलिब्रेशनच्या युगात, दिखाव्याच्या जगात शासन, सेना आणि मनसे यांच्यासाठी महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव हा ''महा इव्हेंट''.
हा महाइव्हेंट मनसेने पुरेपुर कॅश केलाय. हे सुवर्ण महोत्सवी दिनाच्या पुर्वसंध्येला मराठी न्यूज चॅनलाला डोळे लावून बसलेल्या प्रत्येक मराठी आणि गैर मराठी माणसाने बघीतले असेल. शिवसेनेने केलेल्या रक्तदान महायज्ञाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याचाही मोठा गाजावाजा झाला. पण हे सामाजिकदृष्टया फार मोठे काम झाले हे देखील महाराष्ट्राने मान्य केले. मात्र सुवर्ण महोत्सवाच्या पुर्वसंध्येला पुतण्याने काकावर मात केली.
शिवसेनेने आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शिवराज्याभिषेक शिल्पाचं अनावरण आणि कलादालनाचं उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते केलं. शिवाजी पार्कात उभारलेल्या कलादालनात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास साकारला. मात्र न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये या बातमीला आज काहिसं कमी महत्त्व होतं तर मनसेच्या "महाराष्ट्र माझा'' या रंगारंग कार्यक्रमाने जास्त फुटेज घेतलेलं दिसलं. एकूणच पुतण्याने काकाला पुन्हा एकदा मात दिली. हिंदी चॅनलवरतर चाचा-भतिजा का "रण" . अशाच काहिशा मथळ्याखाली बातम्या दाखविल्या जात होत्या. एकंदर या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या सोहळ्याचे जेवढे आप्रुप या दोन ठाकरेंना झाले तेवढे खचितच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयन जनतेला झाले असेल, असे वाटत राहते. आज महाराष्ट्र माझा कार्यक्रमात मराठमोळी लावणी थिरकली, शास्त्रीय संगीताने हा सोहळा सजला, मालवणी वस्त्रहरणने सगळ्यांना हसायला लावलं, त्याआधी महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील चव खवय्यांनी चाखली, आणि समारोप झाला तो महाराष्ट्राच्या आधुनिक शिल्पकारांच्या सन्मानाने. आता उद्याचा दिवस , खरं तर संध्याकाळ नव्हे रात्र गाजेल ती शिवसेनेच्या गर्जा महाराष्ट्राने. मात्र एक दिवस आधी मनसेनं बाजी मारलीय. मात्र या सेना आणि मनसेच्या रंगारंग कार्यक्रमात अंधारात असलेल्या अर्ध्या महाराष्ट्राचा कोणाला विसर पडू नये. विदर्भातील कास्तकारांच्या आत्महत्या - त्यांच्या विधवांचे प्रश्न या लक्ष दिपांच्या-आतिषबाजीच्या झगमगाटात झाकोळून जाऊ नयेत, मराठवाड्यातील खेड्यात-तांड्यावर पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाहीए, शहरांची अवस्थाही या पेक्षा वेगळी नाही. इथं या मुंबापुरीत सुवर्णमहोत्सवाचे पेग रिचवतांना कुठेतरी आपल्याच बांधवांच्या घशाला कोरड पडली असेल हे देखील लक्षात असुद्यावे.
एवढीच या महाराष्ट्राची 50 वर्षांपासूनची विनंती पुन्हाएकदा आहे.
या महाराष्ट्राचा इतिहास वगैरे मी सांगत बसणार नाही. काय पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायचे, मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी 105 हुतात्म्यांचे बलिदान, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, स्वखुशीने सामिल झालेला मराठवाडा, काहि अटींनीशी महाराष्ट्रात आलेला विदर्भ. हे सगळं तुम्हाला रोजच्या पेपरातून, टिव्ही वरुन वाचायला पहायला मिळत आहेच. काहींना या इतिहासाबद्दल जास्तच जाणून घ्यायचे असेल तर बरीच पुस्तकंही छापली गेली आहेत. त्यामुळे त्यात मी आणखी काय वेगळं सांगणार. असो.
हा महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव महाराष्ट्र शासन धुमधडाक्यात साजरा करत आहे. (शासनाने तसं त्यांच्या फाईलींवर, डाय-यांवर , जाहिरातीत 50चा आकडा आणि तुतारीचे चित्र दाखवायला कधीपस्नचं सुरुवात केलीय. ) महाराष्ट्र शासन साजरा करत आहे म्हणजे कांग्रेस, राष्ट्रवादी. मग शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मराठी आणि महाराष्ट्राच्या मातीत आणि मुद्यावर वाढलेल्या पक्षांनी काय फक्त सरकारी खेळच पहात रहायचा का ? तर बिलकूल नाही आणि भाजपाचे म्हणाल तर हा राष्ट्रीय पक्ष. या पक्षाचा वेगळ्या विदर्भाला पाठिंबा . कदाचित भाजपा 1 मे काळा दिवसही साजरा करतील. त्यामुळे या सेलिब्रेशनच्या युगात, दिखाव्याच्या जगात शासन, सेना आणि मनसे यांच्यासाठी महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव हा ''महा इव्हेंट''.
हा महाइव्हेंट मनसेने पुरेपुर कॅश केलाय. हे सुवर्ण महोत्सवी दिनाच्या पुर्वसंध्येला मराठी न्यूज चॅनलाला डोळे लावून बसलेल्या प्रत्येक मराठी आणि गैर मराठी माणसाने बघीतले असेल. शिवसेनेने केलेल्या रक्तदान महायज्ञाने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याचाही मोठा गाजावाजा झाला. पण हे सामाजिकदृष्टया फार मोठे काम झाले हे देखील महाराष्ट्राने मान्य केले. मात्र सुवर्ण महोत्सवाच्या पुर्वसंध्येला पुतण्याने काकावर मात केली.
शिवसेनेने आज मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये शिवराज्याभिषेक शिल्पाचं अनावरण आणि कलादालनाचं उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते केलं. शिवाजी पार्कात उभारलेल्या कलादालनात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास साकारला. मात्र न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये या बातमीला आज काहिसं कमी महत्त्व होतं तर मनसेच्या "महाराष्ट्र माझा'' या रंगारंग कार्यक्रमाने जास्त फुटेज घेतलेलं दिसलं. एकूणच पुतण्याने काकाला पुन्हा एकदा मात दिली. हिंदी चॅनलवरतर चाचा-भतिजा का "रण" . अशाच काहिशा मथळ्याखाली बातम्या दाखविल्या जात होत्या. एकंदर या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या सोहळ्याचे जेवढे आप्रुप या दोन ठाकरेंना झाले तेवढे खचितच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयन जनतेला झाले असेल, असे वाटत राहते. आज महाराष्ट्र माझा कार्यक्रमात मराठमोळी लावणी थिरकली, शास्त्रीय संगीताने हा सोहळा सजला, मालवणी वस्त्रहरणने सगळ्यांना हसायला लावलं, त्याआधी महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील चव खवय्यांनी चाखली, आणि समारोप झाला तो महाराष्ट्राच्या आधुनिक शिल्पकारांच्या सन्मानाने. आता उद्याचा दिवस , खरं तर संध्याकाळ नव्हे रात्र गाजेल ती शिवसेनेच्या गर्जा महाराष्ट्राने. मात्र एक दिवस आधी मनसेनं बाजी मारलीय. मात्र या सेना आणि मनसेच्या रंगारंग कार्यक्रमात अंधारात असलेल्या अर्ध्या महाराष्ट्राचा कोणाला विसर पडू नये. विदर्भातील कास्तकारांच्या आत्महत्या - त्यांच्या विधवांचे प्रश्न या लक्ष दिपांच्या-आतिषबाजीच्या झगमगाटात झाकोळून जाऊ नयेत, मराठवाड्यातील खेड्यात-तांड्यावर पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाहीए, शहरांची अवस्थाही या पेक्षा वेगळी नाही. इथं या मुंबापुरीत सुवर्णमहोत्सवाचे पेग रिचवतांना कुठेतरी आपल्याच बांधवांच्या घशाला कोरड पडली असेल हे देखील लक्षात असुद्यावे.
एवढीच या महाराष्ट्राची 50 वर्षांपासूनची विनंती पुन्हाएकदा आहे.
खुपच छान... लिखते रहो....
उत्तर द्याहटवाsundar ahe lekh..
उत्तर द्याहटवाu just write the fact of golden jublee celebration maha aise hi likhte raho
उत्तर द्याहटवा