भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी ;
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे ?
असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडेत असेल ना. पण हा प्रश्न आपल्याला वारंवार का पडतो, आपल्या संवेदना इतक्या बोथट का झाल्या आहेत. आपल्या आसपास काही तरी वाईट घडतं आहे. काही माणूसकीला काळीमा फासणारं घडत आहे. काही अनैसर्गिक घडत आहे. या सर्व अघटीतांचे आपण केवळ मुक साक्षीदार का होत आहोत. गांधींची तीन माकडं आपण बनलो आहोत का ?
....
एक प्रसंग
एका शहरातील एक गजबजलेला चौक. सायंकाळची वेळ. एक वेडी बाई रस्त्यावर मरणप्राय वेदनेने ओरडते आहे. ती गर्भवती आहे. तिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे. तिच्या बाळांतकळा आणि तिच्या मरणकळा यात कोणतीच भेदरेषा उरलेली नाही. तिचा आक्रोश क्षणा क्षणाला वाढतच जात आहे. तिच्या आसपास बघ्यांची गर्दी जमते. विरते. पुन्हा नवे लोक येऊन बघतात. निघून जातात. सुर्याचीही जाण्याची वेळ झालीय. तोही कधी कुणासाठी थांबत नाही. त्या वेडीचा टाहो आता अधिकच व्याकूळ झालेला. भर रस्तावर ती एका बाळाला जन्म देते. रस्त्यावर पैदा झालेलं ते पोर सर्वांची सहानुभूती मिळवतं. मदत मात्र नाही. पुढचे दोन तीन तास ते नवजात बालक आणि वेडी बाळांतीण त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून. काय म्हणत असेल त्या वेड्या आईची वेडी माया , ''मी जन्मत:च तुला रस्त्यावर आणलं. मला विचारु नकोस तुझा बाप कोण." की, ती काहीच म्हटली नसेल. काही म्हणण्याचे त्राण तरी कुठे होते तिच्यात. पुढच्या दोन तीन तासानंतर कुणाच्यातरी काळजात माणूसकीचा पाझर फूटला आणि त्या बाळ-बाळांतिणीला तिथनं दवाखाण्यात हलवण्यात आलं.
......
हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील , नाटकातील नाही तर, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेला आहे. तुम्ही पेपर मधे वाचलं असेल. टीव्हीवर बघीतलही असेल. बीड शहराच्या एका नाक्यावर रस्त्याकडेला हे सगळं घडत होतं तेव्हा कोणीच त्या वेडीच्या मदतीला धावलं नाही. एक साधा फोनही कोणी सरकारी दवाखाण्याला लावला नाही. अँबुलन्स बोलावली नाही. खिशातला / पर्समधला मोबाईल काय केवळ खयाली खुशाली विचारण्यासाठीच बाळगतो का आपण. ( मी कायम आपण - आपण म्हणतो आहे, ते जाणीव पुर्वक. कारण हा एक प्रसंग आहे, जिथे आपण नव्हतो. पण बसस्टॉपवर, रेल्वेस्टेशनवर एखादा कुली - म्हातारा - एखादी स्त्री एक मोठं गाठोडं पुढ्यात घेऊन ओशाळल्या नजरेने उभे असतात, कोणीतरी या गाठोड्याला टेकु देईल म्हणून, पण आपण कधीच त्या गाठोड्याला हात लावण्यासाठी वाकलेलो नसतो. का शर्टची इस्त्री मोडेल म्हणून - की हात मळतील म्हणून. म्हणून हा आपण. )
ग्रामीण भागात अजून माणूसकी शिल्लक आहे असे वाटत होते. पण या प्रसंगाने हा भ्रम दुर झाला. मुंबई - पुणे या महानगरांमध्ये कुणालाच दुस-यांसाठी वेळ नसतो. त्यांच्या वेळेचं - वागण्याचं कौतूक मुळीच नाही, पण मराठवाड्यातल्या एका ग्रामीण जिल्ह्यातही आता माणसला माणसासाठी वेळ उरलेला नाही.
या घटनेतून आपण 'प्रेतांपरी' झालोय हे जसे सिध्द झाले तसेच ज्या वेड्या स्त्रीला केवळ ती वेडी आहे म्हणून तिचा यथेच्छ उपभोग घेवून तिला मरण्यासाठी रस्त्यावर सोडून देणा-या नराधमाला जितकी दुषणं द्यावी तितकी कमीच आहेत.
आज जर एक वेडी स्त्री वासणेची शिकार होत असेल तर, धड धाकट लेकी - बाळी , आया - बहिणींच्या सुरक्षेचे काय ?
त्या वेड्या आईच्या बाळाच्या भविष्याचे काय? त्या बिचा-याच्या आयुष्यात काय वाढून ठेवलय कोण जाणे? प्रश्न प्रश्न आणि प्रश्नांचे वेटोळे तेवढे दिसत आहे?
तुमच्याही आयुष्यात प्रश्न आहेत . कांद्याचे भाव वाढलेत. पेट्रोल परवडेनसे झाले. महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. मल्टीप्लेक्सेसची तिकटं नेमकी सुटीच्या दिवशीच का वाढतात. तुमचे आमचे हे प्रश्न जीवन सुखकर करण्यासाठीचे आहेत. मात्र त्या दोन जीवांच्या जगण्याचाच प्रश्न आहे.
हे सगळं आपल्या आसपास घडत असतांना आपण गप्प असतो. गप्प गप्प असतो. आपला आणि 'त्यांचा' काहीच संबंध नाही, ही भावना आपली बळावत चालली आहे. ही दरी सांधली पाहिजे. या सुस्थित आयुष्यापासून त्या विस्थापित जगण्यापर्यंत एक सेतू बांधला पाहिजे. थोड्या थंड जरुर झाल्यात पण आपल्या संवेदना मेलेल्या नाहित, नसता या शेवटापर्यंत तुम्ही आलाच नसता.
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे ?
असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडेत असेल ना. पण हा प्रश्न आपल्याला वारंवार का पडतो, आपल्या संवेदना इतक्या बोथट का झाल्या आहेत. आपल्या आसपास काही तरी वाईट घडतं आहे. काही माणूसकीला काळीमा फासणारं घडत आहे. काही अनैसर्गिक घडत आहे. या सर्व अघटीतांचे आपण केवळ मुक साक्षीदार का होत आहोत. गांधींची तीन माकडं आपण बनलो आहोत का ?
....
एक प्रसंग
एका शहरातील एक गजबजलेला चौक. सायंकाळची वेळ. एक वेडी बाई रस्त्यावर मरणप्राय वेदनेने ओरडते आहे. ती गर्भवती आहे. तिच्या प्रसुतीची वेळ जवळ आली आहे. तिच्या बाळांतकळा आणि तिच्या मरणकळा यात कोणतीच भेदरेषा उरलेली नाही. तिचा आक्रोश क्षणा क्षणाला वाढतच जात आहे. तिच्या आसपास बघ्यांची गर्दी जमते. विरते. पुन्हा नवे लोक येऊन बघतात. निघून जातात. सुर्याचीही जाण्याची वेळ झालीय. तोही कधी कुणासाठी थांबत नाही. त्या वेडीचा टाहो आता अधिकच व्याकूळ झालेला. भर रस्तावर ती एका बाळाला जन्म देते. रस्त्यावर पैदा झालेलं ते पोर सर्वांची सहानुभूती मिळवतं. मदत मात्र नाही. पुढचे दोन तीन तास ते नवजात बालक आणि वेडी बाळांतीण त्याच अवस्थेत रस्त्यावर पडून. काय म्हणत असेल त्या वेड्या आईची वेडी माया , ''मी जन्मत:च तुला रस्त्यावर आणलं. मला विचारु नकोस तुझा बाप कोण." की, ती काहीच म्हटली नसेल. काही म्हणण्याचे त्राण तरी कुठे होते तिच्यात. पुढच्या दोन तीन तासानंतर कुणाच्यातरी काळजात माणूसकीचा पाझर फूटला आणि त्या बाळ-बाळांतिणीला तिथनं दवाखाण्यात हलवण्यात आलं.
......
हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील , नाटकातील नाही तर, काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात घडलेला आहे. तुम्ही पेपर मधे वाचलं असेल. टीव्हीवर बघीतलही असेल. बीड शहराच्या एका नाक्यावर रस्त्याकडेला हे सगळं घडत होतं तेव्हा कोणीच त्या वेडीच्या मदतीला धावलं नाही. एक साधा फोनही कोणी सरकारी दवाखाण्याला लावला नाही. अँबुलन्स बोलावली नाही. खिशातला / पर्समधला मोबाईल काय केवळ खयाली खुशाली विचारण्यासाठीच बाळगतो का आपण. ( मी कायम आपण - आपण म्हणतो आहे, ते जाणीव पुर्वक. कारण हा एक प्रसंग आहे, जिथे आपण नव्हतो. पण बसस्टॉपवर, रेल्वेस्टेशनवर एखादा कुली - म्हातारा - एखादी स्त्री एक मोठं गाठोडं पुढ्यात घेऊन ओशाळल्या नजरेने उभे असतात, कोणीतरी या गाठोड्याला टेकु देईल म्हणून, पण आपण कधीच त्या गाठोड्याला हात लावण्यासाठी वाकलेलो नसतो. का शर्टची इस्त्री मोडेल म्हणून - की हात मळतील म्हणून. म्हणून हा आपण. )
ग्रामीण भागात अजून माणूसकी शिल्लक आहे असे वाटत होते. पण या प्रसंगाने हा भ्रम दुर झाला. मुंबई - पुणे या महानगरांमध्ये कुणालाच दुस-यांसाठी वेळ नसतो. त्यांच्या वेळेचं - वागण्याचं कौतूक मुळीच नाही, पण मराठवाड्यातल्या एका ग्रामीण जिल्ह्यातही आता माणसला माणसासाठी वेळ उरलेला नाही.
या घटनेतून आपण 'प्रेतांपरी' झालोय हे जसे सिध्द झाले तसेच ज्या वेड्या स्त्रीला केवळ ती वेडी आहे म्हणून तिचा यथेच्छ उपभोग घेवून तिला मरण्यासाठी रस्त्यावर सोडून देणा-या नराधमाला जितकी दुषणं द्यावी तितकी कमीच आहेत.
आज जर एक वेडी स्त्री वासणेची शिकार होत असेल तर, धड धाकट लेकी - बाळी , आया - बहिणींच्या सुरक्षेचे काय ?
त्या वेड्या आईच्या बाळाच्या भविष्याचे काय? त्या बिचा-याच्या आयुष्यात काय वाढून ठेवलय कोण जाणे? प्रश्न प्रश्न आणि प्रश्नांचे वेटोळे तेवढे दिसत आहे?
तुमच्याही आयुष्यात प्रश्न आहेत . कांद्याचे भाव वाढलेत. पेट्रोल परवडेनसे झाले. महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. मल्टीप्लेक्सेसची तिकटं नेमकी सुटीच्या दिवशीच का वाढतात. तुमचे आमचे हे प्रश्न जीवन सुखकर करण्यासाठीचे आहेत. मात्र त्या दोन जीवांच्या जगण्याचाच प्रश्न आहे.
हे सगळं आपल्या आसपास घडत असतांना आपण गप्प असतो. गप्प गप्प असतो. आपला आणि 'त्यांचा' काहीच संबंध नाही, ही भावना आपली बळावत चालली आहे. ही दरी सांधली पाहिजे. या सुस्थित आयुष्यापासून त्या विस्थापित जगण्यापर्यंत एक सेतू बांधला पाहिजे. थोड्या थंड जरुर झाल्यात पण आपल्या संवेदना मेलेल्या नाहित, नसता या शेवटापर्यंत तुम्ही आलाच नसता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा