मुख्य सामग्रीवर वगळा

कळेनासे झाले आहे

आसपास एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात की, त्यातून काय सत्य काय असत्य, खरेच कोणाचा दोष की, त्याच्यावर उगाच आरोप केले जात आहेत. घडलेल्या घटनेतील नेमकेपणा माध्यमातून जो समोर येत आहे तो आहे की, ती व्यक्ती सांगते ते खरं आहे. हे ओळखण्याची रेषा एकदम अंधूक झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले अण्णांचे आंदोलन हे खरच देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरु आहे की, केंद्रातून काँग्रेस? की त्यांचा आणखी काही वेगळाच हेतू आहे.
हे लिहित असतानाच राजद्रोहाच्या आरोपात बंदिस्त असलेला व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची जामीनावर सुटका झाली. त्याआधी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत असीमने केवळ घटनात्मक प्रतिकांचा अपमान केला नसून त्याने अशोकस्तंभाचाही अपमान केला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी देखील दुखावल्याचे बोलले गेले. मात्र, जामीनावर सुटलेल्या असीमने प्रथम काही केले असेल तर तो बौद्धविहारात गेला आणि त्याने तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, मी त्यांच्या (बाबासाहेबांच्या) सामाजीक चळवळीला सॅल्यूट करतो. त्यांनी समानतेसाठी काम केले आणि आमचाही आग्रह तोच आहे. तर माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की, त्याच्यावर आरोप करणारे हे वरपांगी विचार करणारे आहेत की, असीम सारखे हे ढोंग करतात. नेमके काय सत्य आहे. आपण जी विचारधारा घेऊन जगत असतो त्याच्या सोबत जायचे की, अशांना योग्य म्हणायेच जे, कलेच्या आणि अभिव्यक्तिच्या नावाखाली, सामाजीक समानतेच्या नावाखाली विरोधच चुकीचा आहे असे म्हणतात.
या देशाची काही राष्ट्रीयता आहे. त्याची काही मापदंड आहेत. मानचिन्ह आहेत. प्रतिकं आहेत. त्यांच्यी कोणी टिंगल-टवाळी करत असेल, त्यांचा अपमान होत असताना राष्ट्राने पर्यायाने या राष्ट्रचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या सरकारने काहीच बोलायचे नाही का? पण, असे म्हणावे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच घटनेने दिले आहे. त्याचे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नेमके काय बरोबर आणि काय चूक हेच कळेनासे झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...