आसपास एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात की, त्यातून काय सत्य काय असत्य, खरेच कोणाचा दोष की, त्याच्यावर उगाच आरोप केले जात आहेत. घडलेल्या घटनेतील नेमकेपणा माध्यमातून जो समोर येत आहे तो आहे की, ती व्यक्ती सांगते ते खरं आहे. हे ओळखण्याची रेषा एकदम अंधूक झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले अण्णांचे आंदोलन हे खरच देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरु आहे की, केंद्रातून काँग्रेस? की त्यांचा आणखी काही वेगळाच हेतू आहे.
हे लिहित असतानाच राजद्रोहाच्या आरोपात बंदिस्त असलेला व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची जामीनावर सुटका झाली. त्याआधी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत असीमने केवळ घटनात्मक प्रतिकांचा अपमान केला नसून त्याने अशोकस्तंभाचाही अपमान केला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी देखील दुखावल्याचे बोलले गेले. मात्र, जामीनावर सुटलेल्या असीमने प्रथम काही केले असेल तर तो बौद्धविहारात गेला आणि त्याने तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, मी त्यांच्या (बाबासाहेबांच्या) सामाजीक चळवळीला सॅल्यूट करतो. त्यांनी समानतेसाठी काम केले आणि आमचाही आग्रह तोच आहे. तर माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की, त्याच्यावर आरोप करणारे हे वरपांगी विचार करणारे आहेत की, असीम सारखे हे ढोंग करतात. नेमके काय सत्य आहे. आपण जी विचारधारा घेऊन जगत असतो त्याच्या सोबत जायचे की, अशांना योग्य म्हणायेच जे, कलेच्या आणि अभिव्यक्तिच्या नावाखाली, सामाजीक समानतेच्या नावाखाली विरोधच चुकीचा आहे असे म्हणतात.
या देशाची काही राष्ट्रीयता आहे. त्याची काही मापदंड आहेत. मानचिन्ह आहेत. प्रतिकं आहेत. त्यांच्यी कोणी टिंगल-टवाळी करत असेल, त्यांचा अपमान होत असताना राष्ट्राने पर्यायाने या राष्ट्रचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या सरकारने काहीच बोलायचे नाही का? पण, असे म्हणावे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच घटनेने दिले आहे. त्याचे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नेमके काय बरोबर आणि काय चूक हेच कळेनासे झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले अण्णांचे आंदोलन हे खरच देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरु आहे की, केंद्रातून काँग्रेस? की त्यांचा आणखी काही वेगळाच हेतू आहे.
हे लिहित असतानाच राजद्रोहाच्या आरोपात बंदिस्त असलेला व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची जामीनावर सुटका झाली. त्याआधी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत असीमने केवळ घटनात्मक प्रतिकांचा अपमान केला नसून त्याने अशोकस्तंभाचाही अपमान केला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी देखील दुखावल्याचे बोलले गेले. मात्र, जामीनावर सुटलेल्या असीमने प्रथम काही केले असेल तर तो बौद्धविहारात गेला आणि त्याने तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, मी त्यांच्या (बाबासाहेबांच्या) सामाजीक चळवळीला सॅल्यूट करतो. त्यांनी समानतेसाठी काम केले आणि आमचाही आग्रह तोच आहे. तर माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की, त्याच्यावर आरोप करणारे हे वरपांगी विचार करणारे आहेत की, असीम सारखे हे ढोंग करतात. नेमके काय सत्य आहे. आपण जी विचारधारा घेऊन जगत असतो त्याच्या सोबत जायचे की, अशांना योग्य म्हणायेच जे, कलेच्या आणि अभिव्यक्तिच्या नावाखाली, सामाजीक समानतेच्या नावाखाली विरोधच चुकीचा आहे असे म्हणतात.
या देशाची काही राष्ट्रीयता आहे. त्याची काही मापदंड आहेत. मानचिन्ह आहेत. प्रतिकं आहेत. त्यांच्यी कोणी टिंगल-टवाळी करत असेल, त्यांचा अपमान होत असताना राष्ट्राने पर्यायाने या राष्ट्रचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या सरकारने काहीच बोलायचे नाही का? पण, असे म्हणावे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच घटनेने दिले आहे. त्याचे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नेमके काय बरोबर आणि काय चूक हेच कळेनासे झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा