मुख्य सामग्रीवर वगळा

दुष्काळाच्या झळा... आधी गाव झाले परके, नंतर मुले झाली पोरकी

शहरातील बंद दारा आड टीव्ही समोर बसून नळाला पाणी कधी येईल याची चिंता करणारे 'नागरिक' आणि एसी ऑफिसमध्ये बसून बिस्लरी कॅनचे पाणीही फिल्टर करून पिणारे 'कर्मचारी', दोन दिवस झाले नळाला पाणी आले नाही म्हणून पालिकेला शिव्या घालतात... मात्र, आभाळातून पाणी पडलं नाही म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यांच्या हवाली कच्ची-बच्ची टाकून त्यांच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शहराचा रस्ता धरणार्‍यांची कथा फार वेगळी आहे.
मात्र, कोट्यवधींचा कोळसा घोटाळा... त्यात कोणाचे हात काळे झाले होते आणि इकडे पावसाचा टिपूस नसताना राज्याच्या उपमुख्यंमत्र्याचे नाव सिंचन घोटाळ्यात येते... नैतिकतेच्या मुद्यावर ते राजीनामा देतात आणि त्यानंतरच्या राजकीय नाट्यावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे रकानेच्या रकाने भरतात आणि तासंतास चर्चा करतात... या चर्चेच्या गुर्हाळात दुष्काळाचे कुणाला घेणे देणे ? पण, दुर्लक्ष्य केले म्हणून दुष्काळाची दाहकता कमी होत नाही.
या दुष्काळाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भोजेवाडीच्या दोन जणांचा बळी घेतला. भोजेवाडीत गेल्या दोन वर्षात पावसाचा थेंब पडला नाही.  कोरडवाहू जमीनीतून शेतकरी पोटापूरते ज्वारी, बाजरी पिकवतो मात्र, निसर्गाच्या दोन वर्षांच्या अवकृपेने यंदा तेही शक्य झाले नाही. येथील शेतकरी मग पोटाची खळगी भरण्यासाठी साखर कारखान्यांवर ऊसतोडीला जातात. मात्र, कारखान्याचा बॉयलर पेटायलाही अजून बराच काळ बाकी आहे. म्हणून शहराकडे जाऊन मोल-मजूरीचा पर्याय अनेकांनी स्विकारला. अण्णासाहेब देवकातेंनीही इतरांप्रमाणे शहराचा रस्ता धराला..  पण, त्यांना काय माहिती त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले होते...   
 अण्णासाहेब देवकाते यांची भोजेवाडीत दहा एकर शेती. पण पावसाचा थेंब नाही म्हणून ओसाड पडलेली. म्हणून अण्णासाहेब कामाच्या शोधात पुण्यनगरीत गेले. पुण्यातील तळजाई टेकडीवरील इमारतीत ते, त्यांची पत्नी दिपाली आणि वहिनी मिता काम करीत होते. अचानक इमारत कोसळली आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. अण्णासाहेब आणि त्यांची वहिनी मिताचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांची पत्नी दिपाली गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. ही घटना भोजेवाडीत कळाली आणि तिथे स्मशान शांतता पसरली. म्हातारी आई डोक्याला हात लावून बसली, तर आपलं आभाळ फाटलयं - डोक्यावरचं छत्र हरपलं याची पूसटशीही कल्पना नसलेले निरागस चिमुरडे आजी समोर बसले होते...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...

मोदी-शहा जोडींने का निवडले रामनाथ कोविंद यांना

मोदी-शहा जोडीचा खेळ खरच अगम्य आहे. कोणाच्याही ध्यानी मनी नसलेले नाव त्यांनी राष्ट्रपती पदासाठी पुढे केले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि शिवसेनेने पुढे केलेले मोहन भागवत, डॉ. एम.एस स्वामिनाथन या सर्वांना बाजूला करत शहांनी पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेशचे दलित व्यक्ती, एकेकाळी आएएएस परीक्षा उत्तीर्ण परंतू वकिलीचाच पेशा कायम ठेवणारे भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दोनवेळा राज्यसभा सदस्य आणि सध्या बिहारचे राज्यपाल असलेल्या कोविंद यांचे नाव पुढे करुन मोदी-शहा जोडीने सर्वांचीच (विरोधकांची) पंचायत करुन टाकली आहे. मोदी आणि शहा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात 2020, 2022 मध्ये हे साध्य होईल किंवा हे ध्येय गाठले जाईल असे सांगतात तेव्हा विरोधक त्यांची खिल्ली उडवतात. अजून 2019 बाकी आहे. मात्र या जोडीने 2019 ची तयारी ही किती आधीपासून केली याची प्रचिती त्यांच्या प्रत्येक निर्णयातून विरोधकांना यायला हवी. 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितांची मते ही भाजपच्या पारड्यात पडण्यास...