मुख्य सामग्रीवर वगळा

आई असल्यावर जाणवत नाही


आई असल्यावर जाणवत नाही


एकटाच असलो की, मनावर अनाहूत काजळी पसरते. मग चार भिंतीचं सुरक्षा कवच असलेल्या घरात, जर्नालिझमच्या हॉलमध्ये, बुद्धलेणीच्या पायथ्याशी, पिंपळाच्या जाळीदार सावलीत मी कुठेही असलो तरी, माझ्या एकटेपणाला सोबत करायला 'आई' हळुवार पावलाने येते. कधी-कधी माणसांच्या मेळ्यात, नात्यांच्या गोतावळ्यात, माझ्या एकाकी मनाची आई सोबती होते. एकटेपणाच्या गर्तेतून आई माझा उजवा हात हाती धरून, डावा हात पाठीवर फिरवून येणा-या प्रत्येक संकटाशी धैर्याने सामोरे जाणाचे बळ देते. त्यावेळी ती खूप काही सांगते. तिला लाभलेल्या छोट्याशा आयुष्यातील ब-या-वाईट अनुभवाचं संचित आई माझ्या पुढयात ठेवेत...

कोजागिरीच्या पिठूर चांदण्यात आईची गोरी कांती अधिकच उजळून निघायची. सर्वांसाठी द्रवणारं तिचं ह्रदय, आजही कळत नाही तिच्या ह्रदयाचा थांग. कुठून साठवलं होतं तिनं एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं तिच्याशी आपलेपणाचं नातं.

'उपाशीपोटी पाण्याच्या घोटी सपान पडतं
आभाळ झडतं ग आभाळ झडतं'


अशी मनाची अवस्था झाली की, मनाच्याही नकळत मनभर व्यापून राहाते आई; आणि म्हणूनच प्रत्येक सुख-दुःखात मनाला उभारी देणारी असते तिची सोबत, तिची आठवण. आईचा तिच्या लेकरांसाठी असलेला वात्सल्याचा झरा कधीच अटत नाही. दिसामाजी बाळासाठी आईचं प्रेमाचं सिंचन अधिकाधिक वाढतच असतं.

मला आठवतं, एक शेजारीण आईला म्हणाली, 'किती दिवस तुम्ही मुलाला बाळाच म्हणणार आहात?' तेव्हा आईचं उत्तर होतं, 'तो कितीही मोठा झाला तरी माझ्यासाठी बाळच राहाणार आहे.' आज या शब्दातील गहिरेपणा, मार्दव, सच्चाई कळायला लागते व मन मनोमन कबूल करतं की, आईचा बाळ होऊनच आयुष्यभर राहावं. पण नियतीला ते कदाचित मान्य नसावं. म्हणूनच...

पण आईच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. आजही एकांतात रुतलेल्या माझ्या मनाला, मला तिचाच हात धरुन वर आणतो. प्रकाशाच्या वाटेवर नेतो.

'आई असल्यावर जाणवत नाही
नसल्यावर नाही म्हणवत नाही'


कारण, आई असते मनात मन भरून राहिलेली आणि घर भरून सुद्धा.

आई नसल्यावर नाही म्हणवत नाही.
साभार- दैनिक लोकमत युवामंच

(आज माझ्या आईचा - आशाबाई रमेश खंडागळे १६ वा स्मृतीदिवस आहे. त्यानिमीत्त हा मीच माझ्याशी साधलेला संवाद. हे स्फूट की, ललित माहित नाही, पण जेव्हा मी हे लिहिले(२००४ किंवा २००५ मध्ये), तेव्हा मी पत्रकारितेचा विद्यार्थी  आणि लोकमत युवामंचचा विद्यापीठ प्रतिनिधी होतो. त्याकाळातील माझ्या लिखाणाला युवामंच हे हक्काचे व्यासपीठ होते. त्यांचे विशेष आभार, त्या प्रोत्साहनामुळेच मला माझ्या मनातील भावना कागदावर उतरविण्याचे धाडस आले. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...