२०१३ हे अजून एक नवे वर्ष सुरु झाले. कित्येकांनी अनेक संकल्प केले असतील. (त्याला काहीजण 'संकल्प सोडला' असेही म्हणतात! संकल्प सोडला म्हटल्यावर पुढे त्याचा पाठपुरावा करण्याची गरजच काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असो. ) कॉलेजात असताना अनेक वेळेस सकाळीच उठून व्यायाम करण्याचा संकल्प कित्येक वर्ष नित्यनियमाने केला होता, आणि नित्यनियमाने त्यात विसरही पडत आला आहे. आताही काही त्रास जाणवला की, व्यायाम करण्याचा संकल्प केला जातो आणि जेवढ्या तत्परतेने संकल्प केला जातो तेवढ्याच तत्परतेने तो विसरला देखील जातो. असे नव वर्षाच्या संकल्पांचे आणि माझे आतापर्यंतचे नाते राहीलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकल्प न करण्याचाच संकल्प केला आहे. मात्र, वरील सवयीप्रमाणे हा संकल्पही मोडीत निघतोच. असो. हे संकल्पाचे प्रवचन कितीही लांबवले तरी लांबतच राहील.
मी स्वतःला बौद्ध धम्माचा अनुयायी समजतो. तसा जन्मानेच बौद्ध असल्यामुळे त्यात मी काही समजण्याचा प्रश्न उरतच नाही. पण, मी बौद्ध आहे म्हणजे नेमका कोण आहे? भगवान बुद्धांचा जयघोष आणि बाबासाहेबांचा विजय असो किंवा उठता-बसता जयभीम. सालाबादाप्रमाणे येणारे १४ एप्रिल(डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध जयंती, नामांतर वर्धापन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ६ डिसेंबर-बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण, एक जानेवारीला भीमा कोरेगावचा विजय दिन... असे अनेक दिवस मोठ्या थाटात साजरे करणे किंवा यानिमीत्त अभिवादन, श्रद्धांजली निमीत्त या महामानवांसमोर फुल-अगरबत्ती लावून त्यांच्यासमोर नतमस्तक होणे, म्हणजेच मी बौद्ध का ? आता यात महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहु महाराज, शिवाजी महाराज यांचाही समावेश करुन त्यांच्याही पुढे नतमस्तक होतो. कारण मी स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो. पण, मी बौद्ध आहे, आंबेडकरांचा अनुयायी आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवतो तर या सगळ्यांचा माझा काय अभ्यास आहे ? कुठल्याही चर्चेत बोलायला लागल्यावर मी छातीठोकपणे काही मुद्दे मांडेल. पण, त्यांचे विश्लेषण करायचे झाले तर मग उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यातही वेळ कशी मारून नेली याची फुशारकी असते. वास्तविक, त्या क्षणी वेळेने माझ्या कानखाली सनसनीत चपराक दिलेली असते, हे मी सोईस्करपणे विसरतो.
आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण आणि पंचशील स्विकारुन करतो. पण, किती जणांना याचा अर्थ माहित असतो, हा खरा प्रश्न आहे. आता-आता तर असेही वाटायला लागले आहे की, अर्थ माहित असणे ही तर फार पुढची पायरी आहे, आम्हाला पूर्ण त्रिशरण-पंचशील तरी कुठे पाठ असते. जर, या प्राथमिक गोष्टीच मुखोदगद नसतील तर त्यांचा अर्थ आणि आचरण आमच्याकडून केव्हा घडेल. बाबासाहेबांनी हा धम्म जेव्हा आम्हाला दिला, तेव्हाच त्यांनी "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा सहज सोप्या भाषेतील ग्रंथ देखील आम्हाला दिला. माझ्याही घरात हा ग्रंथ आहे. अनेकांच्या असेल. (कालच एक बौद्ध आणि आंबेडकरी साहित्याचे प्रकाशक आणि विक्रेते सांगत होते की, 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची रंगीत छायाचित्र आणि काही नवीन मजकूर असलेले काही हजार ग्रंथ ६ डिसेंबरला मुंबईला विक्रीसाठी नेण्यापूर्वीच संपले.) पण, त्याचे वाचन - मनन अजून माझ्याकडून झालेले नाही. हा ग्रंथ वाचण्याचा संकल्पही मी अनेकदा केला. सुरुवातीची काही पाने वाचून हा संकल्पही पूर्णत्वास गेलेला नाही. मी स्वतःला आंबेडकरवादी तसेच आंबेडकर अनुयायी म्हणवून घेत असताना माझी जबाबदारी आहे की, मी बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा वाचली पाहिजे. धनंजय किर आणि खैरमोडे लिखीत त्यांच्या चरित्राची पारायणे नाही, पण किमान एक-दोनदा ते वाचून झाले पाहिजे. मला माहित असलेले बाबासाहेब हे फक्त इतरांनी केलेल्या भाषणातील आणि गीतांमधील किंवा वृत्तपत्रातील संपादित लेखातील असतात. ही माझ्यासाठी शरमेची गोष्ट आहे. जर मी बाबासाहेब वाचलेच नसतील तर, मी स्वतःला त्यांचा अनुयायी तरी कसा म्हणवून घेऊ शकतो. बाबासाहेबांचे अभ्यासक जेव्हा त्यांच्या विविध पुस्तकातील दाखले देऊन काही सांगतात तेव्हा मला कोणी विचरले की, तु हे वाचले का, तर आमचे उत्तर असते, बाबासाहेब आमच्या रक्तातच आहेत! ते इतरांकडून समजून घेण्याची आणि वाचण्याची काय गरज. यामुळे मी वेळ निभावून नेतो, मात्र माझ्यातील अज्ञान मात्र कायम राहाते. ही बोचणी मला काही दिवसांपासून बोचत आहे. नववर्षाच्या निमीत्ताने आजपर्यंतची उजळणी केली तर या गोष्टी राहून गेल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. आता पुढच्या काही दिवसांत किंवा महिन्यात या महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण केल्याच पाहिजे. हा नववर्षाचा संकल्प नाही तर, स्वतःच स्वतःशी केलेला करार आहे.
मी स्वतःला बौद्ध धम्माचा अनुयायी समजतो. तसा जन्मानेच बौद्ध असल्यामुळे त्यात मी काही समजण्याचा प्रश्न उरतच नाही. पण, मी बौद्ध आहे म्हणजे नेमका कोण आहे? भगवान बुद्धांचा जयघोष आणि बाबासाहेबांचा विजय असो किंवा उठता-बसता जयभीम. सालाबादाप्रमाणे येणारे १४ एप्रिल(डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), बुद्ध जयंती, नामांतर वर्धापन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ६ डिसेंबर-बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण, एक जानेवारीला भीमा कोरेगावचा विजय दिन... असे अनेक दिवस मोठ्या थाटात साजरे करणे किंवा यानिमीत्त अभिवादन, श्रद्धांजली निमीत्त या महामानवांसमोर फुल-अगरबत्ती लावून त्यांच्यासमोर नतमस्तक होणे, म्हणजेच मी बौद्ध का ? आता यात महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहु महाराज, शिवाजी महाराज यांचाही समावेश करुन त्यांच्याही पुढे नतमस्तक होतो. कारण मी स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतो. पण, मी बौद्ध आहे, आंबेडकरांचा अनुयायी आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवतो तर या सगळ्यांचा माझा काय अभ्यास आहे ? कुठल्याही चर्चेत बोलायला लागल्यावर मी छातीठोकपणे काही मुद्दे मांडेल. पण, त्यांचे विश्लेषण करायचे झाले तर मग उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारुन नेण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यातही वेळ कशी मारून नेली याची फुशारकी असते. वास्तविक, त्या क्षणी वेळेने माझ्या कानखाली सनसनीत चपराक दिलेली असते, हे मी सोईस्करपणे विसरतो.
आम्ही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिशरण आणि पंचशील स्विकारुन करतो. पण, किती जणांना याचा अर्थ माहित असतो, हा खरा प्रश्न आहे. आता-आता तर असेही वाटायला लागले आहे की, अर्थ माहित असणे ही तर फार पुढची पायरी आहे, आम्हाला पूर्ण त्रिशरण-पंचशील तरी कुठे पाठ असते. जर, या प्राथमिक गोष्टीच मुखोदगद नसतील तर त्यांचा अर्थ आणि आचरण आमच्याकडून केव्हा घडेल. बाबासाहेबांनी हा धम्म जेव्हा आम्हाला दिला, तेव्हाच त्यांनी "भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" हा सहज सोप्या भाषेतील ग्रंथ देखील आम्हाला दिला. माझ्याही घरात हा ग्रंथ आहे. अनेकांच्या असेल. (कालच एक बौद्ध आणि आंबेडकरी साहित्याचे प्रकाशक आणि विक्रेते सांगत होते की, 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकाची रंगीत छायाचित्र आणि काही नवीन मजकूर असलेले काही हजार ग्रंथ ६ डिसेंबरला मुंबईला विक्रीसाठी नेण्यापूर्वीच संपले.) पण, त्याचे वाचन - मनन अजून माझ्याकडून झालेले नाही. हा ग्रंथ वाचण्याचा संकल्पही मी अनेकदा केला. सुरुवातीची काही पाने वाचून हा संकल्पही पूर्णत्वास गेलेला नाही. मी स्वतःला आंबेडकरवादी तसेच आंबेडकर अनुयायी म्हणवून घेत असताना माझी जबाबदारी आहे की, मी बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा वाचली पाहिजे. धनंजय किर आणि खैरमोडे लिखीत त्यांच्या चरित्राची पारायणे नाही, पण किमान एक-दोनदा ते वाचून झाले पाहिजे. मला माहित असलेले बाबासाहेब हे फक्त इतरांनी केलेल्या भाषणातील आणि गीतांमधील किंवा वृत्तपत्रातील संपादित लेखातील असतात. ही माझ्यासाठी शरमेची गोष्ट आहे. जर मी बाबासाहेब वाचलेच नसतील तर, मी स्वतःला त्यांचा अनुयायी तरी कसा म्हणवून घेऊ शकतो. बाबासाहेबांचे अभ्यासक जेव्हा त्यांच्या विविध पुस्तकातील दाखले देऊन काही सांगतात तेव्हा मला कोणी विचरले की, तु हे वाचले का, तर आमचे उत्तर असते, बाबासाहेब आमच्या रक्तातच आहेत! ते इतरांकडून समजून घेण्याची आणि वाचण्याची काय गरज. यामुळे मी वेळ निभावून नेतो, मात्र माझ्यातील अज्ञान मात्र कायम राहाते. ही बोचणी मला काही दिवसांपासून बोचत आहे. नववर्षाच्या निमीत्ताने आजपर्यंतची उजळणी केली तर या गोष्टी राहून गेल्याची प्रकर्षाने जाणीव झाली. आता पुढच्या काही दिवसांत किंवा महिन्यात या महत्त्वपूर्ण गोष्टी पूर्ण केल्याच पाहिजे. हा नववर्षाचा संकल्प नाही तर, स्वतःच स्वतःशी केलेला करार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा