पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियोजन आयोग, यीपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेतील राष्ट्रीय सल्लागार परिषद यांसारख्या भारत सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर आणि रिझर्व्ह बँकेसह देश-विदेशातील अविकसीत भागांच्या विकासासाठीच्या कामाचा अनुभव असलेले डॉ. नरेंद्र जाधव यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. अर्थशास्त्र आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांना गुरु मानणा-या डॉ. जाधवांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज औरंगाबाद भेटीत त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्यत्व संपल्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेतही मागे आहे. येथील समतोल विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर येथील मातीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता आणि माणसांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, येथील सर्वांगिण विकासासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असलो तरी विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
रिझर्व्ह बँकेतील कामाचा अनुभव, अविकसीत इथिओपिया आणि अफगाणिस्तानातील युद्धानंतर तेथील अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी डॉ. जाधवांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम केले. याशिवाय नियोजन आयोगातील चार वर्षांचा केंद्रीय पातळीवरील काम करण्याचा आणि योजना कशा पद्धतीने राबवाव्या याचा कृतिशिल अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा मराठवाड्याला नक्की होईल. निवडणूक लढलो किंवा नाही तरीही मराठवाड्यासाठी पुढील काही वर्ष काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी औरंगाबादमध्ये संशोधन संस्था स्थापन करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.
मराठवाड्याचा विकास कसा होईल यासाठी 1984 मध्ये वि.म.दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसी अद्यापही लागू झालेल्या नाहीत काळाच्या ओघात आता त्या गैरलागू होण्याचीही शक्यता आहे. याचीच जाणीव सरकारला झाली असावी म्हणून डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अविकसीत जिल्ह्यांच्या समतोल विकासासाठी कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. डॉ. केळकर समितीने अहवाल सरकार दरबारी दिला आहे. अजून तो सर्वसामान्यांसाठी खुला झालेला नाही. मात्र दांडेकर समितीने मराठवाड्याचा अनुशेष भरण्याची जी शिफारस केली होती. ती अद्यापही तशीच आहे. त्यासाठी येथील राजकीय नेतृत्वही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. मराठवाड्याचा सर्वांगिण विकास होईल असा कार्यक्रम घेऊन लढणारा एकही नेता मिळालेला नाही. गटागटाने आणि आपापल्या पक्ष-संघटनांच्या पातळीवर लढणारे अनेक आहेत मात्र त्यांची संघटीत शक्ती उभी राहिलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या मागास भागाची किती चिंता होती याची प्रचिती त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाच्या रुपाने उभी केलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येते. निजामाच्या राजवटीतील मराठवाडा महाराष्ट्रात आला मात्र या भागाच्या विकासासाठी कोणत्याही नेत्याने काम केलेले दिसत नाही.
विलासराव देशमुखांच्या रुपाने राजकीय नेतृत्व मराठावाड्याला मिळाले होते. मात्र त्यांनी लातूरपलिकडे फारसे कधी लक्ष दिले नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा सीमित आणि संकूचित विकास झालेला आहे. डॉ. नरेंद्र जाधव मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी यापुढे काम करणार असल्याचे म्हणत आहेत. मात्र आगामी लोकसभेत जर त्यांना तिकीट नाकारले गेले किंवा तिकीट मिळूनही ते पराभूत झाले तरीही ते येथे एक संशोधक आणि कार्यकर्ता म्हणून काम करतील का ? आणि ते जर असे करणार असतील तर त्यांच्या अनुभवाचा येथील मातीला नक्कीच फायदा होणार आहे.
बाबासाहेबांचे विचार घराघरांत पोहचावे आणि प्रत्येकाला समजावे या उद्देशाने त्यांनी ''बोल महामानवाचे'' या बाबासाहेबांच्या 537 भाषणांचा तीन खंडात संग्रह केला आहे. त्यानंतर ''प्रज्ञा महामानवाची'' हे बाबासाहेबांचे समग्र लेखन दोन खंडात समोर आणले आहे. यातील पहिल्या खंडात डॉ. बाबासाहेबांचे राजकीय लेखन आहे तर दुस-या खंडात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा, संविधान आणि धर्मशास्त्र यावर केलेले लेखन आहे. पुणे विद्यापिठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. जाधव यांच्याकडे आजही केंद्रीय पातळीवरील अनेक जबाबद-या आहेत. त्या सांभाळून त्यांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने भारलेला आणि नियोजनाला कृतिची जोड असलेला अर्थतज्ज्ञ जर मराठवाड्यासाठी झटणार असेल तर (त्यांनी काम सुरू केले आणि लागलीच मागास मराठवाड्याचा कायापालट झाला असे होणार नाही.) मराठवाड्याची समतोल विकासाकडे वाटचाल होणार हे नक्की आहे. त्यांच्या या कार्यास शुभेच्छा..
रिझर्व्ह बँकेतील कामाचा अनुभव, अविकसीत इथिओपिया आणि अफगाणिस्तानातील युद्धानंतर तेथील अर्थव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी डॉ. जाधवांच्या अध्यक्षतेखालील समितीने काम केले. याशिवाय नियोजन आयोगातील चार वर्षांचा केंद्रीय पातळीवरील काम करण्याचा आणि योजना कशा पद्धतीने राबवाव्या याचा कृतिशिल अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा मराठवाड्याला नक्की होईल. निवडणूक लढलो किंवा नाही तरीही मराठवाड्यासाठी पुढील काही वर्ष काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी औरंगाबादमध्ये संशोधन संस्था स्थापन करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.
मराठवाड्याचा विकास कसा होईल यासाठी 1984 मध्ये वि.म.दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसी अद्यापही लागू झालेल्या नाहीत काळाच्या ओघात आता त्या गैरलागू होण्याचीही शक्यता आहे. याचीच जाणीव सरकारला झाली असावी म्हणून डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अविकसीत जिल्ह्यांच्या समतोल विकासासाठी कार्यक्रम निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. डॉ. केळकर समितीने अहवाल सरकार दरबारी दिला आहे. अजून तो सर्वसामान्यांसाठी खुला झालेला नाही. मात्र दांडेकर समितीने मराठवाड्याचा अनुशेष भरण्याची जी शिफारस केली होती. ती अद्यापही तशीच आहे. त्यासाठी येथील राजकीय नेतृत्वही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. मराठवाड्याचा सर्वांगिण विकास होईल असा कार्यक्रम घेऊन लढणारा एकही नेता मिळालेला नाही. गटागटाने आणि आपापल्या पक्ष-संघटनांच्या पातळीवर लढणारे अनेक आहेत मात्र त्यांची संघटीत शक्ती उभी राहिलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या मागास भागाची किती चिंता होती याची प्रचिती त्यांनी येथे मिलिंद महाविद्यालयाच्या रुपाने उभी केलेल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येते. निजामाच्या राजवटीतील मराठवाडा महाराष्ट्रात आला मात्र या भागाच्या विकासासाठी कोणत्याही नेत्याने काम केलेले दिसत नाही.
विलासराव देशमुखांच्या रुपाने राजकीय नेतृत्व मराठावाड्याला मिळाले होते. मात्र त्यांनी लातूरपलिकडे फारसे कधी लक्ष दिले नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा सीमित आणि संकूचित विकास झालेला आहे. डॉ. नरेंद्र जाधव मराठवाड्याच्या समतोल विकासासाठी यापुढे काम करणार असल्याचे म्हणत आहेत. मात्र आगामी लोकसभेत जर त्यांना तिकीट नाकारले गेले किंवा तिकीट मिळूनही ते पराभूत झाले तरीही ते येथे एक संशोधक आणि कार्यकर्ता म्हणून काम करतील का ? आणि ते जर असे करणार असतील तर त्यांच्या अनुभवाचा येथील मातीला नक्कीच फायदा होणार आहे.
बाबासाहेबांचे विचार घराघरांत पोहचावे आणि प्रत्येकाला समजावे या उद्देशाने त्यांनी ''बोल महामानवाचे'' या बाबासाहेबांच्या 537 भाषणांचा तीन खंडात संग्रह केला आहे. त्यानंतर ''प्रज्ञा महामानवाची'' हे बाबासाहेबांचे समग्र लेखन दोन खंडात समोर आणले आहे. यातील पहिल्या खंडात डॉ. बाबासाहेबांचे राजकीय लेखन आहे तर दुस-या खंडात अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कायदा, संविधान आणि धर्मशास्त्र यावर केलेले लेखन आहे. पुणे विद्यापिठाचे कुलगुरू राहिलेले डॉ. जाधव यांच्याकडे आजही केंद्रीय पातळीवरील अनेक जबाबद-या आहेत. त्या सांभाळून त्यांनी केलेले हे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या विचाराने भारलेला आणि नियोजनाला कृतिची जोड असलेला अर्थतज्ज्ञ जर मराठवाड्यासाठी झटणार असेल तर (त्यांनी काम सुरू केले आणि लागलीच मागास मराठवाड्याचा कायापालट झाला असे होणार नाही.) मराठवाड्याची समतोल विकासाकडे वाटचाल होणार हे नक्की आहे. त्यांच्या या कार्यास शुभेच्छा..
Bhai aapan lihilya pramane Jadhav sirancha anubhav , kamachi paddhat nakkich marathwadyachya vikisat ek mahtwacha MILESTONE tharu shakte.
उत्तर द्याहटवाAani congress ne Jadhav siranchi upyogita lakshat gheun tyanchya hushrich tyanchya pakshachya tasech deshacha vikasati upyog karun ghyava.
जाधव सर, आपल्या बहुमोल प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. आपल्या सारख्या वाचकांच्या सुचना आणि प्रतिक्रीयाच माझ्या लेखनाचे बळ आहे. पुनश्च एकदा धन्यवाद..
हटवा