मुख्य सामग्रीवर वगळा

जयभीम : तुझी माझी अस्मिता आणि अस्तित्वाची ओळख


आज रात्री मस्त पैकी घरावर जाऊन थंडीत - गार हवेत सिगरेट ओढत कोक प्यावा वाटत आहे... घरी जाई पर्यंत दुकानं उघडी राहीली तर मनातला बेत नक्की पूर्ण करणार... वर्ष संपायला एकच दिवस उरला आहे आणि मला सुटी देखील आहे, त्यामुळे रात्री कितीही वेळ जागरण केले तरी उद्या वेळेवर उठण्याचे कंपल्शन नाही.  हे काय सांगत बसलो असे जर वाटत असेल तर,  मनातलं सांगण्यासाठीच तर ब्लॉग असतो. इथं नाही व्यक्त व्हायचं तर मग काय तयखाण्यात...

आज 'जयभीम' या घोषणेला 75 वर्ष पूर्ण झाली. मराठवाड्याचे सुपूत्र भाऊसाहेब मोरे यांनी ३० डिसेंबर १९३८ साली तत्कालिन निजाम राजवटीच्या सीमेवरील गावात - कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित केली होती. ही सभा निजाम राजवटीविरोधात आणि दलित, शोषित, शेतमजुरांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्या काळात मराठवाड्यातील दलितांचे जोरजबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्यांना मुसलमान केले जात होते. या सर्वांच्या विरोधात सुशिक्षीत भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन केले होते. भाऊसाहेब तेव्हा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे मराठवाडा प्रांताध्यक्ष होते. याच परिषदेत भाऊसाहेबांनी जोहार मायबाप हे गुलामीचे प्रतिक असलेले अभिवादन नाकारण्याचे आणि फक्त आणि फक्त जयभीमचाच नारा देण्याचे - घोषणा देण्याचे - एकमेकांना भेटताना अभिवादनासाठी उच्चारला जाणारा शब्द फक्त जयभीमच असले असे आवाहन केले. ते आजतागायत अव्याहत सुरु आहे. बाबासाहेबांनी गुलामीत खितपत पडलेल्या माणसाला स्वाभिमानाने जगण्याचे धाडस दिले - मग याच महामानवाचा जयजयकार का नाही करायचा, असाही कदाचित भाऊसाहेबांचा व्होरा असले, नव्हे तो तसाच असला पाहिजे.

जयभीमने महाराष्ट्रात बौद्धांना वेगळी ओळख दिली. केवळ बौद्धांनाच नाही तर परिवर्तनवादी चळवळीचा हा अभिवादनाचा संस्कार बनला. जयभीम के नारे पे खून बहा तो बहने दो, हा बाबासाहेबांच्या नावासाठी मर-मिटण्याचा आतल्या आणि बाहेरच्या आवाजाचे उत्कट प्रतिबिंब जयभीम आहे. भर रस्त्यात उभे राहून - गल्लीच्या कोप-यावर  किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये दोघांनी एकमेकांना कडक जयभीम ठोकला तर चार-सहा माना वळल्याच पाहिजे. ही आपल्या अस्मितेची - अस्तित्वाची आज ओळख झाली आहे. पण 75 वर्षानंतरही माना का वळतात हा खरा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी जर फक्त एका समाजासाठी काम केलेल नाही, त्यांनी संपूर्ण सर्वहारा वर्ग, ऐकूणच मागासलेला समाज, या देशात गुलामांपेक्षाही हिन वागणूक मिळत असलेल्या महिलांसाठी, त्यांच्या आत्मसन्मान आणि उत्थानासाठी जीवन वेचले आहे. असे असतानाही कपाळावर आढी न येवू देता सर्वांनीच बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात इतरांची जीभ का अडखळते... केव्हा बदलणार हा तुझ्या माझ्यातील फरक. माझे काही मित्र आहेत, जे बौद्ध नाही, मागासलेल्या समाजातील नाही आणि त्यांना जयभीम म्हणण्यातही कोणतीही अडचण नाही. आणि मलाही त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे अभिवादन करण्यात गैर वाटत नाही.. पण मेंदू - मन - जिव्हेला सवय लागली आहे कोणीही भेटल्यावर जयभीम म्हणण्याची...

जयभीम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...