मुख्य सामग्रीवर वगळा

लोकशाही जिंकली आणि मोदी हारले

देशात लोकशाही आहे हे आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या माध्यमातून सिद्ध झाले आले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देशाचे भाषणबाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षाच्या सदस्यांना अनेक टोमणे मारले आणि तुम्हाला 'ऐकावेच लागेल' हे एक नव्हे तर तीन वेळा म्हटले. तेव्हा त्यांचा बोलण्याचा टोन हा स्वतःच्या नावाचा सुट घालणार्‍या एका देशाच्या राजासारखा होता. त्यामुळेच विरोधीपक्षातील सदस्य नाराज झाले आणि त्यांनी सरकारला जमीनीवर आणले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी यांनी काळ्या धनावर सरकार अपयशी झाल्याचे राष्ट्रपतींच्या भाषणात संशोधन करावे हा प्रस्ताव आणला होता. पंतप्रधानांच्या भाषणानंतर तो मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यावर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांना परत-परत विचारले, तुम्हाला प्रस्ताव मतविभाजनासाठी ठेवायचा आहे??? त्यावर येचूरी यांनी होय असे सांगितले आणि सरकारचा राज्यसभेत धन्यवाद प्रस्तावावर 118 विरुद्ध 57 असा लाजीरवाणा पराभव झाला. वास्तविक वरिष्ठ सभागृहात सरकारचे 72 सदस्य आहेत. मात्र गुड गव्हर्नंन्सचा दावा करणार्‍या मोदींचे 15 खासदार कुठे गेले होते याचा त्यांनी शोध घेतला पाहिजे.

पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात विरोधकांना शालजोडे दिले होते. त्याचा परतावा विरोधकांनी  राष्ट्रपतींच्या अभिभाषणात संशोधन करुन तत्काळ केला. राज्यसभेची परंपरा राहिली आहे की, पंतप्रधान किंवा सभागृह नेत्याच्या भाषणानंतर त्यावर विरोधक प्रश्न विचारू शकतात. मात्र, एककलमी कार्यक्रम राबवणारे मोदी आपले भपकेबाज भाषण ठोकून तत्काळ सभागृहातून बाहेर पडले. मी बोलल्यानंतर बाकीचे कोणी बोलायची गरजच नाही असाच काहीसा त्यांचा समज असावा. पण आपण हुकूमशाही नाही तर लोकशाही देशात राहातो आणि लोकशाही राष्ट्राचे पंतप्रधान आहोत याचा त्यांना कदाचित भाषणानंतर विसर पडला असावा.  परंतू त्यांच्या मंत्रिमंडळातील फ्लोअर मॅनेजमेंट करणारे व्यंकय्या नायडू यांना हे चांगले ज्ञात होते की येथे आपण कमजोर आहोत. त्यामुळे काँग्रेस सदस्य गुलामनबी आझाद यांच्याजवळ जाऊन त्यांनी मतविभाजनाची गरज नसल्याचे सांगितल्याचे सर्वांनी पाहिले. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांची तेव्हा धावपळ झाली, पण पंतप्रधान कुठे गेले होते हे काही कळले नाही.

पंतप्रधान जर स्वतःच्या भाषणानंतर सभागृहात थांबले असते आणि त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांचा सामना केला असता तर लोकसभेत बहुमतात असलेल्या सरकारवर आज ही नामुष्की आली नसती. गुजरात विधानसभेत मोदी दिसतच नव्हते हे ऐकून होतो, मात्र आज त्याची प्रचिती आली आहे. यामुळे एक बरे झाले लोकशाहीत तुम्हाला विरोधकांच्या मतालाही किंमत दिली पाहिजे हे अधोरेखीत झाले. केवळ भाषणातूनच आम्ही सर्वांच्या मतांचा आदर करतो हे बोलून चालत नाही तर तसे वागावे देखील लागते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...