बिहार ही देशासाठी 2014 च्या लोकसभेनंतरची सर्वात मोठी निवडणूक होती. मोदींच्या पंतप्रधानपदाला विरोध करणारे नितीशकुमार येथे लढणार होते. मागील विधानसभेत सुपडा साफ झालेल्या लालू प्रसाद यादवांच्या अस्तित्वाची ही लढाई होती तर काँग्रेसला अजून आपण जिंवत आहोत हे दाखवायेचे होते. (काँग्रेसबद्दल बोललो नसतो तरी हे वाक्य पूर्ण झाले असते.) हे झाले मोदी आणि भाजप विरोधकांचे. पण गेल्या 18 महिन्यात आपण काय दिवे लावेल, हे सांगत नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद पणाला लावायला लावणारी ही निवडणूक होती. निवडणूक व्यवस्थापनाचे चाणक्य ज्यांना भाजपने म्हणण्यास सुरुवात केली होती, आणि त्यांच्या सूरात सूर मिसळत भारतीय माध्यमांनीही तशीच री ओढली होती, त्या दाढीवाल्या चाणक्याची बिहारच्या जनतेने बिनपाण्याची केली. या निकालानंतर मला एकदा तरी बिहार पाहून यावा असे मनोमन वाटत आहे.
पाच टप्प्यात बिहारची निवडणूक झाली आणि प्रत्येक टप्प्यात निवडणूक प्रचाराचा मुद्दा बदलेला होता. महाराष्ट्रात जसे विदर्भात गेले की कास्तकरी, शेतकरी आत्महत्या. पश्चिम महाराष्ट्रात उसाला भाव, साखर कारखाने, उद्योग, सहकार. कोकणात रेल्वे, आंबा-काजू निर्यात, प्रक्रिया उद्योग. नाशिक खानदेशात जाऊन द्राक्ष शेती, कांद्याला भाव, केळी-साठवणूक प्रक्रिया उद्योग. आणि मराठवाड्यात प्रचाराचा जोर किती दिवस हा भाग दुष्काळग्रस्त ठेवायचा, युवकांसाठी रोजगार, सिंचनाला पाणी असे विविध मुद्दे प्रचारात प्रामुख्याने असतात. तसे काही बिहारच्या निवडणुकीत झाले नाही. देशात जे-जे घडत होते ते-ते दुसऱ्या दिवशी बिहारच्या प्रचारसभांमधून गाजत होते. त्यातही भाजपच्या प्रचारसभांना प्रत्येक माध्यमात ठळक प्रसिद्धी मिळताना दिसत होती. किते केले तरी प्रचाराचे सर्व साधनसामुग्री या पक्षाकडे जास्त होती.
सोशल मीडियापासून टीव्ही-रेडिओ-वृत्तपत्र सर्वकाही यांच्या ताब्यात. त्यामुळे हे होणारच. त्या तुलनेत नितीशकुमारांच्या (खरं पाहिले तर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव आहेत) जनता दल संयुक्त-जेडीयू आणि राष्ट्रीय जनता दलाचे-आरजेडी सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याकडे प्रचाराची साधने कमी होती. असे म्हटले जाते की 243 मतदारसंघात फिरण्यासाठी भाजपकडे दोन डझन हेलिकॉप्टर्स होते. तर लालू यादव यांच्याकडे एकच हेलिकॉप्टर होते. यावरुनच प्रचाराच्या साधनसामुग्रीचा अंदाज येईल. (मी भरकटत चाललो, हे आता पर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल. कारण शेवटची ओळ टाइप करताना आमच्या 'मॅडम'चा फोन आला होता आणि त्यांचा नेहमीचा प्रश्न - कधी येता. मलाही ऑफिस संपता-संपता लिहण्याची हुक्की येते आणि त्यांच्या फोनने माझी लिहिण्याची तंद्री तुटते हे नेहमीचे आहे. असो.)
तर मला सांगायचे हे होते की, बिहारमधील निवडणुकीत चार प्रबळ पक्षांमध्ये लढत झाली आणि त्यात जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महागठबंधनचा विजय झाला. हा विजय माध्यमांच्या चर्चेचा विषय झालेला नाही तर इंग्रजी दैनिक-टीव्ही चॅनल्स (हिंदी-इंग्रजी-मराठी) आणि सर्वच वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या पराभवाचेच विश्लेषण होत आहे. कोणीच फारसे या तिन्ही पक्षांचा विजय कसा झाला याबद्दल बोलताना दिसत नाही. हाही एकप्रकारे मोदी मॅनियाचा विजय आहे. पराभवानंतरही लोक मोदी-शहांबद्दलच बोलत आहेत. एकप्रकारे माध्यमतज्ज्ञांना हा धक्का तर नाही ना, असा प्रश्न मला पडला आहे. कारण सर्वच लोक भाजपच्या पराभवावरच बोलत आहेत. कोणीच नितीशकुमार विजयी कसे झाले. त्यांच्या जागा 115 वरुन कमी होऊन 71 कशा झाल्या. लालूंनी 22 वरुन 80 वर मारलेली हनुमान उडी आणि जो पक्ष मृतावस्थेकडे जात आहे असे सोकॉल्ड विश्लेषक म्हणत होते, त्या काँग्रेसला 4 वरुन 27 वर कसे जाता आले ? याबद्दल कोणीच का बोलत नाही. येथे मला अजून मोदी हरले असे वाटत नाही.
भलेही लोकांनी मुरलीमनोहर-लालकृष्ण-अटलबिहारी वाजपेयी यांचा संयुक्त हसरा फोटो वारंवार शेअर केला असेल किंवा गायीने मी दुध-दही देते मत देत नाही म्हणत मोदी-शहांना उडवून लावल्याचे कार्टून्स शेअर केले असले, तरी फार कमी लोकांनी लिहिले आहे की 'जब तक रहे गा समोसे में आलू, बिहार में रहेगा लालू' असे विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रात जसे आज राज ठाकरेंना लोक सिर्यसली घेत नाही, तसे ज्या दिवशी मोदी-शहांच्या पराभवाची कारणमीमांसाही करावी वाटणार नाही, त्या दिवशी खऱ्या अर्थाने मोदींचा पराभव झालेला असेल. त्यामुळे दिल्ली गेले, बिहार गमावले म्हणून कोणी हुरुळून जाऊ नये. मोदींचा प्रभाव अजून येथील माध्यमांवर शाबूत आहे. टीव्ही चॅनल्स दिवसदिवसभर त्या बिचाऱ्या शत्रुघ्न सिन्हांचे सोमवारचे फुटेज 24 तासानंतरही दाखवत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न विचारत आहेत. याचाच अर्थ माध्यमांना वाटत आहे की सिन्हांनी काही तरी चूक केले आहे, त्यांच्या पक्षाला काय वाटते हे जाणून घेण्यात माध्यमांना काहीही स्वारस्य नाही.
दुसरीकडे, बिहारमध्ये विकासकुमारांना स्ट्रॅटिजिक मदत करणारा प्रशांत किशोर- याने याआधी मोदींना कशी साथ दिली होती, याच्याच सुरस कथा रंगवल्या जात आहेत. आणि आता तो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना साथ देणार असल्याच्याही बातम्या दिल्या जात आहे. यातून भाजपला सावधान व्हा ! असाच अप्रत्यक्ष सल्ला माध्यमे देत आहे. मीडियाने काँग्रेसच्या पराभवानंतर असे कधी केल्याचे दिसले नाही. त्यामुळे जोपर्यंत मोदी मॅनिया संपत नाही तोपर्यंत मोदींचा पराभव झाला असे म्हणणे म्हणजे आपणच आपल्याला शाबसकी देण्यासारखे आहे. हा फक्त वटवृक्षावर झालेला आघात आहे. एकदोन फांद्या तेवढ्या तुटल्या आहेत. बाकी फारकाही नुकसान झालेले नाही. त्यामुळे जास्त आनंद साजरा करण्याला अर्थ नाही.
पाच टप्प्यात बिहारची निवडणूक झाली आणि प्रत्येक टप्प्यात निवडणूक प्रचाराचा मुद्दा बदलेला होता. महाराष्ट्रात जसे विदर्भात गेले की कास्तकरी, शेतकरी आत्महत्या. पश्चिम महाराष्ट्रात उसाला भाव, साखर कारखाने, उद्योग, सहकार. कोकणात रेल्वे, आंबा-काजू निर्यात, प्रक्रिया उद्योग. नाशिक खानदेशात जाऊन द्राक्ष शेती, कांद्याला भाव, केळी-साठवणूक प्रक्रिया उद्योग. आणि मराठवाड्यात प्रचाराचा जोर किती दिवस हा भाग दुष्काळग्रस्त ठेवायचा, युवकांसाठी रोजगार, सिंचनाला पाणी असे विविध मुद्दे प्रचारात प्रामुख्याने असतात. तसे काही बिहारच्या निवडणुकीत झाले नाही. देशात जे-जे घडत होते ते-ते दुसऱ्या दिवशी बिहारच्या प्रचारसभांमधून गाजत होते. त्यातही भाजपच्या प्रचारसभांना प्रत्येक माध्यमात ठळक प्रसिद्धी मिळताना दिसत होती. किते केले तरी प्रचाराचे सर्व साधनसामुग्री या पक्षाकडे जास्त होती.
सोशल मीडियापासून टीव्ही-रेडिओ-वृत्तपत्र सर्वकाही यांच्या ताब्यात. त्यामुळे हे होणारच. त्या तुलनेत नितीशकुमारांच्या (खरं पाहिले तर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव आहेत) जनता दल संयुक्त-जेडीयू आणि राष्ट्रीय जनता दलाचे-आरजेडी सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्याकडे प्रचाराची साधने कमी होती. असे म्हटले जाते की 243 मतदारसंघात फिरण्यासाठी भाजपकडे दोन डझन हेलिकॉप्टर्स होते. तर लालू यादव यांच्याकडे एकच हेलिकॉप्टर होते. यावरुनच प्रचाराच्या साधनसामुग्रीचा अंदाज येईल. (मी भरकटत चाललो, हे आता पर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल. कारण शेवटची ओळ टाइप करताना आमच्या 'मॅडम'चा फोन आला होता आणि त्यांचा नेहमीचा प्रश्न - कधी येता. मलाही ऑफिस संपता-संपता लिहण्याची हुक्की येते आणि त्यांच्या फोनने माझी लिहिण्याची तंद्री तुटते हे नेहमीचे आहे. असो.)
तर मला सांगायचे हे होते की, बिहारमधील निवडणुकीत चार प्रबळ पक्षांमध्ये लढत झाली आणि त्यात जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महागठबंधनचा विजय झाला. हा विजय माध्यमांच्या चर्चेचा विषय झालेला नाही तर इंग्रजी दैनिक-टीव्ही चॅनल्स (हिंदी-इंग्रजी-मराठी) आणि सर्वच वृत्तपत्रांमध्ये भाजपच्या पराभवाचेच विश्लेषण होत आहे. कोणीच फारसे या तिन्ही पक्षांचा विजय कसा झाला याबद्दल बोलताना दिसत नाही. हाही एकप्रकारे मोदी मॅनियाचा विजय आहे. पराभवानंतरही लोक मोदी-शहांबद्दलच बोलत आहेत. एकप्रकारे माध्यमतज्ज्ञांना हा धक्का तर नाही ना, असा प्रश्न मला पडला आहे. कारण सर्वच लोक भाजपच्या पराभवावरच बोलत आहेत. कोणीच नितीशकुमार विजयी कसे झाले. त्यांच्या जागा 115 वरुन कमी होऊन 71 कशा झाल्या. लालूंनी 22 वरुन 80 वर मारलेली हनुमान उडी आणि जो पक्ष मृतावस्थेकडे जात आहे असे सोकॉल्ड विश्लेषक म्हणत होते, त्या काँग्रेसला 4 वरुन 27 वर कसे जाता आले ? याबद्दल कोणीच का बोलत नाही. येथे मला अजून मोदी हरले असे वाटत नाही.
भलेही लोकांनी मुरलीमनोहर-लालकृष्ण-अटलबिहारी वाजपेयी यांचा संयुक्त हसरा फोटो वारंवार शेअर केला असेल किंवा गायीने मी दुध-दही देते मत देत नाही म्हणत मोदी-शहांना उडवून लावल्याचे कार्टून्स शेअर केले असले, तरी फार कमी लोकांनी लिहिले आहे की 'जब तक रहे गा समोसे में आलू, बिहार में रहेगा लालू' असे विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रात जसे आज राज ठाकरेंना लोक सिर्यसली घेत नाही, तसे ज्या दिवशी मोदी-शहांच्या पराभवाची कारणमीमांसाही करावी वाटणार नाही, त्या दिवशी खऱ्या अर्थाने मोदींचा पराभव झालेला असेल. त्यामुळे दिल्ली गेले, बिहार गमावले म्हणून कोणी हुरुळून जाऊ नये. मोदींचा प्रभाव अजून येथील माध्यमांवर शाबूत आहे. टीव्ही चॅनल्स दिवसदिवसभर त्या बिचाऱ्या शत्रुघ्न सिन्हांचे सोमवारचे फुटेज 24 तासानंतरही दाखवत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न विचारत आहेत. याचाच अर्थ माध्यमांना वाटत आहे की सिन्हांनी काही तरी चूक केले आहे, त्यांच्या पक्षाला काय वाटते हे जाणून घेण्यात माध्यमांना काहीही स्वारस्य नाही.
दुसरीकडे, बिहारमध्ये विकासकुमारांना स्ट्रॅटिजिक मदत करणारा प्रशांत किशोर- याने याआधी मोदींना कशी साथ दिली होती, याच्याच सुरस कथा रंगवल्या जात आहेत. आणि आता तो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना साथ देणार असल्याच्याही बातम्या दिल्या जात आहे. यातून भाजपला सावधान व्हा ! असाच अप्रत्यक्ष सल्ला माध्यमे देत आहे. मीडियाने काँग्रेसच्या पराभवानंतर असे कधी केल्याचे दिसले नाही. त्यामुळे जोपर्यंत मोदी मॅनिया संपत नाही तोपर्यंत मोदींचा पराभव झाला असे म्हणणे म्हणजे आपणच आपल्याला शाबसकी देण्यासारखे आहे. हा फक्त वटवृक्षावर झालेला आघात आहे. एकदोन फांद्या तेवढ्या तुटल्या आहेत. बाकी फारकाही नुकसान झालेले नाही. त्यामुळे जास्त आनंद साजरा करण्याला अर्थ नाही.
chaan vishleshan.
उत्तर द्याहटवाcong, jdu, rjd he paksh vegvegale ladhale asate tar kay sthiti zaali asti... yachehi whawe vishleshan.