मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २००९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समितीचे पाय मातीचे हवे

महाराष्ट्रात तिसरी आघाडी एकदाची झाली.तिचं बारसंही काल झालं. "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती". या समितीतील सगळ्यांनी हातात हात धरून हात उंचावले...आम्ही एकत्र असल्याचे दाखवण्यासाठी... प्रेसवाल्यांना, टिव्हीवाल्यांना फोटो दिले. या तिस-या आघाडीत आहेत, 1)शेतकरी कामगार पक्ष,(त्यांच्याच ऑफिसमधे बसून प्रेस घेतली म्हणून त्यांचे नाव प्रथम) 2)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकत्रीत), अजूनही रिपाईच्या पुढे कंस घालावाच लागतो. त्याशिवाय कळत नाही आपण कोणत्या रिपाई विषयी बोलत आहोत ते. अशीच अवस्था कमी जास्त प्रमाणात या आघाडीत सामील झालेल्या पक्ष - संघटनांची आहे. 3)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, 4)भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 5)स्वाभिमानी शेतकरी संघटना. 6)समाजवादी पार्टी, 7)जनता दल सेक्युलर, 8)परिवर्तन आघाडी 9)सोशालिस्ट फ्रंट 10)लोक जनशक्ती पार्टी 11)राष्ट्रीय समाज पक्ष 12)समाजवादी जनपरिषद 13)सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 14)लोक राजनिती मंच 15) लोकभारती आणि 16)लोकसंघर्ष मोर्चा या सोळा पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. आणखी बरेच पक्ष येवून मिळण्याचे संकेत या समितीने काल दिले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या वसई व...

ओढ...

ओढ... माणसाला कित्येक गोष्टींची ओढ असते... त्यात घराची ओढ ही काही औरच! माणूस कोणत्याही परिस्थितीत असला, कोणत्याही संकटात सापडला किंवा त्याला काही आनंद झाला तरी त्याला ओढ असते ती घराची. कधी एकदा घरी जातो असं होवून जातं. कोणतीही व्यक्ति घरी आल्यावर घराची दारं त्याचं किंवा तिचं आगत-स्वागत करणार नसतात. घराच्या विटा-मतीच्या किंवा संगमरवरी भिंती आपली विचारपूस करणार नसतात. दारा-खिडक्यांचे पडदे आंगाखांद्यावरुन हात फिरवणार नसतात, की मखमली बिछाना मायेची उब देणार नसतो. खिडक्या कितीही सत्ताड उघड्या करुन ठेवल्यातरी त्या आपल्याशी कोणताच संवाद साधणार नसतात. मनातली घालमेल शेअर करणार नसतात. तरीही माणसाला दगड-विटा-मातीच्या घराची कायम ओढ असते. घरातील वस्तूही आपल्याला जासत वेळ सुखावणा-या नसतात, तरीही घराची ओढ कुणाचीच संपत नाही. कारण या सर्व निर्जीव वस्तूमध्ये आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. या निर्जीव वस्तूंमध्ये जान येते, जेव्हा त्यांना सजीव हलचालींचा स्पर्ष होतो. मग जिन्याची प्रत्येक पायरीही बोलकी होते. जेव्हा तिथे बसून आपल्या प्रियजनांशी केलेल्या सुख दु:खाच्या गप्पा आठवतात... घरात आल्यावर आई-वडिला...

स्वाईन महाराष्ट्र

किती गेले... आज किती... पुण्याचे किती गेले... ससुन मधलाच पेशंट होता का ? या सारख्या प्रश्नांच्या सरबत्तीने सध्या प्रत्येकाच्या ऑफिसचा रोजचा दिवस सुरु होत आहे. न्यूज चॅनल्सवरतीतर मतदानाची आकडेवारी दाखवावी तशी मृतांची आकडेवारी दाखवत आहेत. वृत्तपत्रांचीही स्थिती वेगळी नाही. एव्हाना आता तुम्हाला कळलेच असेल की कोणत्या रोगाबद्दल मी बोलत आहे. स्वाईन फ्लू... H1N1 विषाणू असलेला हा स्वाईन फ्लू आता महाराष्ट्रात आणि खास करुन पुण्यात चांगलाच घुसला आहे, नव्हे धुमाकूळ घालत आहे. या रोगाच्या भयंकर व्याप्तीमुळे पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची नकोशी आठवण पुन्हा जागी झाली आहे. हा ब्लॉग लिहण्यास सुरवात केली तेव्हा पुण्यातला 12 वा स्वाईन बळी गेला होता. रिदा शेखच्या मृत्यूने सुरु झालेली ही मालिका थांबयचे नाव घेत नाहीए. पहिला मृत्यू रिदाचा झाल्यामुळे तिचे नाव लक्षात राहिले आहे, आता तर देशभरात 20 पर्यंत मृतांचा आकडा पोहचलाय त्यामुळे बालक, शाळकरी मुले, मध्यमवयीन स्त्री, पुरुष, पुण्यातील , राज्यातील आणि देशातील अशी मृतांची विभागणी केली जात आहे. स्वाईन फ्ल्यू या रोगाने महाराष्ट्रात मात्र दहशतीचे वाताव...

रिपाई ऐक्य...

रिपब्लिकन ऐक्य ! राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वांच्या उत्सूकतेचा विषय. दलित दलितेतर या सर्वांना रिपाईचे ऐक्य केव्हा होणार या विषयीची उत्सूकता राहिला आहे. सर्व रिपाई नेते एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात ते नक्कीच काही तरी बदल करु शकतील असा सर्वांना विश्वास वाटतो. खाजगीत बोलतांना इतर पक्षातील मंडळीही कबूल करतात की रिपाई चे सर्व गट एकत्र आले तर भक्कम आशी तिसरी आघाडी उभी राहील. मात्र या शक्यता रिपाईच्या स्थापने पासून आतापर्यंत सत्यात आल्या नाहित. रिपाई ऐक्य हे मृगजळाप्रमाणेच दलित जनतेला भासत आले आहे. मात्र 6 ऑगस्ट रोजी मुंबईच्या बैठकीत जवळपास अर्धशतक दलित नेत्यांनी आपापले गट विसर्जीत करुन रिपब्लिकन ऐक्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. रिपब्लिकन ऐक्याचा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या ह्यातीत अस्थित्वात येवू शकला नाही. हे या पक्षाचं सर्वात मोठं दुर्देवं. बाबासाहेबांच्या मजूर पक्षानंतर राज्याच्या राजकारणात रिपाईला आलेले सर्वात मोठे यश हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दादासाहेबांच्या नेतृत्वाख...

कभी ना बिते ये चमकिले दिन...

True friends are like mornings, u cant have them the whole day, but u can be sure, they will be there when u wakeup tomorrow, next year and forever किंवा सगळ्या मित्रांच्या वेगवेगळ्या रंगांच्या अस्तीत्वामुळे माझ्या जीवनात अनेक रंग भरले गेले. त्या माझ्या जवळच्या सगळ्या मित्रांसाठी Hapqy Friendship Day. या आणि या सारख्या मेसेजेसनी आज मोबाईलचा ईनबॉक्स भरत होता. ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणेजे Friendship Day. (हे कोणी सांगितले, कोणी लिहून ठेवले, कोण म्हणालंय या पैकी काहीच माहित नाही.) जेव्हा मी 11 वी - 12 वीत असेल तेव्हा हा 'FD' (संक्षीप्त नामाभीधानच सर्वांना जास्त आवडतात म्हणून आणि लांबलचक लिहायचा मलाही कंटाळा आलाय म्हणून) मला माहित झाला बहूतेक. व्हेलेंटाईन डे प्रमाणे मुलींना प्रपोज करण्याचा आणखी एक बहाण्याचा दिवस. एवढच काय ते या दिवसाचं मला तेव्हा अप्रूप. मात्र जेव्हा हातात मोबाईल खेळू लागला तेव्हा आज जसे एसएसएस येतायेत तसे रोज येऊ लागले, आणि मैत्रीचा दिवस साजरा करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहण्याची वेळ उरली नाही. मात्र या मैत्र दिनामुळे सगळ्या मित्रांची आठवण ताजी होत...