किती गेले...
आज किती...
पुण्याचे किती गेले... ससुन मधलाच पेशंट होता का ?
या सारख्या प्रश्नांच्या सरबत्तीने सध्या प्रत्येकाच्या ऑफिसचा रोजचा दिवस सुरु होत आहे.
न्यूज चॅनल्सवरतीतर मतदानाची आकडेवारी दाखवावी तशी मृतांची आकडेवारी दाखवत आहेत. वृत्तपत्रांचीही स्थिती वेगळी नाही.
एव्हाना आता तुम्हाला कळलेच असेल की कोणत्या रोगाबद्दल मी बोलत आहे.
स्वाईन फ्लू... H1N1 विषाणू असलेला हा स्वाईन फ्लू आता महाराष्ट्रात आणि खास करुन पुण्यात चांगलाच घुसला आहे, नव्हे धुमाकूळ घालत आहे. या रोगाच्या भयंकर व्याप्तीमुळे पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची नकोशी आठवण पुन्हा जागी झाली आहे.
हा ब्लॉग लिहण्यास सुरवात केली तेव्हा पुण्यातला 12 वा स्वाईन बळी गेला होता.
रिदा शेखच्या मृत्यूने सुरु झालेली ही मालिका थांबयचे नाव घेत नाहीए. पहिला मृत्यू रिदाचा झाल्यामुळे तिचे नाव लक्षात राहिले आहे, आता तर देशभरात 20 पर्यंत मृतांचा आकडा पोहचलाय त्यामुळे बालक, शाळकरी मुले, मध्यमवयीन स्त्री, पुरुष, पुण्यातील , राज्यातील आणि देशातील अशी मृतांची विभागणी केली जात आहे.
स्वाईन फ्ल्यू या रोगाने महाराष्ट्रात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झालयं एवढं नक्की. शासकीय रुग्णालयांमध्येच या रोगाचे निदान होत असल्यामुळे त्यांच्यावर ताण आलाय, तर ज्यांनी कधीच या रुग्णालयांचे तोंड पाहिले नाही त्यांना तेथे उपचारासाठी, इथून तिथे... तिथून इथे , या सरकारी खाक्याच्या खेट्या घालाव्या लागत आहेत. सुरवातीला या रोगाचे गांभीर्य लक्षात नघेतलेल्या राज्य शासनाचे "रिदा" या शाळकरी मुलीच्या मृत्यूने खाडकन् डोळे उघडले आहेत. स्वाईन फ्ल्यूच्या या पहिल्या कोवळ्या बळी नंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि रुग्णांची तपासणी आणि उपचार यात युध्द पातळीवर यंत्रणा कार्यरत झाली. मात्र याने गेलेला जीव परत येणार नव्हता. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आकलेचे तारे तोडत काही विधाने केल्यामुळे वातावरणात अजूनच विषाणू पसरले आणि वातावरण गढूळ बनले.
राज्य शासन अपयशी ठरत असतांना त्यांच्यावर टिका करण्याची नामी संधी सोडून देईल तो विरोधी पक्ष कसला. शिवसेनेच्या कार्य-अध्यक्षांनी आपले वाक्-बाण शासन यंत्रणेवर सोडायला सुरवात केलीच. 'मॅक्सिकन पॅटर्न' राबवा. हे मुख्यमंत्रीच अपशकूनी आहेत. अशी मल्लीनाथी त्यांनी सुरु केली. मात्र त्यांच्याच ताब्यात असलेल्या मुंबै महापालिकेत त्यांच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला आयुक्तांनी 'फाटक' दाखवलं आणि जनतेचा कौल मागितला. तर इकडे दुस-या साहेबांनी सरळ शाळेत जाऊन शाळा , सिनेमागृहच बंद करण्यास सुरवात केली. अर्थात मॅक्सिकन पॅटर्न राबवला, एकूण काय तर 'यांच्या' निर्णयावर 'त्यांनी' कुरघोडी केली. असो, कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाहीत ते राजकारणी कसले.
आता गोपाळकाला उद्यावर येवून ठेपलाय तर, महाराष्ट्राचं लाडकं दैवत गणपतीचीही चाहूल लागली आहे. अशातच संसर्गजन्य स्वाईन फ्ल्यूने महाराष्ट्राला विळखा घातल्याने राज्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्यानांही हे सण कसे साजरे करायचे असा प्रश्न पडला आहे. एकूण काय तर आपण सगळे नाक मुठीत घेवून जगत आहोत.
जाता जाता...
आत्ताच बातमी आली आहे... एक्यात सामील न होणा-या नेत्यांच्या सभा उधळा - रामदास आठवले.
सत्ते पासून दूर गेलेल्या आठवलेंना एक्याच्या बळावर तरी आगामी विधानसभेत (मानाचे नसलेतरी) स्थान मिळेल, याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांचा एक्याचा आटापिटा चालू दिसतोय. पण प्रकाश आंबेडकरांनी ऐक्यात सामील न होण्याचा घेतलेला निर्णय, आठवलेंच्या विधानसभेतील 'स्थाना'ला खो घालत आहे. असा त्यांचा कयास असावा म्हणूनच लोकशाहीवादी - फुले, आंबेडकर विचारधारा मानणा-या पक्षाचा नेता, हाणा मारा ची भाषा आपल्याच बांधवांविरोधात करत आहे. असं 'हाणून मारुन' खरचं ऐक्य होणार आहे का ? का यांच्याही डोक्यात H1N1 घुसला आहे ?
आज किती...
पुण्याचे किती गेले... ससुन मधलाच पेशंट होता का ?
या सारख्या प्रश्नांच्या सरबत्तीने सध्या प्रत्येकाच्या ऑफिसचा रोजचा दिवस सुरु होत आहे.
न्यूज चॅनल्सवरतीतर मतदानाची आकडेवारी दाखवावी तशी मृतांची आकडेवारी दाखवत आहेत. वृत्तपत्रांचीही स्थिती वेगळी नाही.
एव्हाना आता तुम्हाला कळलेच असेल की कोणत्या रोगाबद्दल मी बोलत आहे.
स्वाईन फ्लू... H1N1 विषाणू असलेला हा स्वाईन फ्लू आता महाराष्ट्रात आणि खास करुन पुण्यात चांगलाच घुसला आहे, नव्हे धुमाकूळ घालत आहे. या रोगाच्या भयंकर व्याप्तीमुळे पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीची नकोशी आठवण पुन्हा जागी झाली आहे.
हा ब्लॉग लिहण्यास सुरवात केली तेव्हा पुण्यातला 12 वा स्वाईन बळी गेला होता.
रिदा शेखच्या मृत्यूने सुरु झालेली ही मालिका थांबयचे नाव घेत नाहीए. पहिला मृत्यू रिदाचा झाल्यामुळे तिचे नाव लक्षात राहिले आहे, आता तर देशभरात 20 पर्यंत मृतांचा आकडा पोहचलाय त्यामुळे बालक, शाळकरी मुले, मध्यमवयीन स्त्री, पुरुष, पुण्यातील , राज्यातील आणि देशातील अशी मृतांची विभागणी केली जात आहे.
स्वाईन फ्ल्यू या रोगाने महाराष्ट्रात मात्र दहशतीचे वातावरण निर्माण झालयं एवढं नक्की. शासकीय रुग्णालयांमध्येच या रोगाचे निदान होत असल्यामुळे त्यांच्यावर ताण आलाय, तर ज्यांनी कधीच या रुग्णालयांचे तोंड पाहिले नाही त्यांना तेथे उपचारासाठी, इथून तिथे... तिथून इथे , या सरकारी खाक्याच्या खेट्या घालाव्या लागत आहेत. सुरवातीला या रोगाचे गांभीर्य लक्षात नघेतलेल्या राज्य शासनाचे "रिदा" या शाळकरी मुलीच्या मृत्यूने खाडकन् डोळे उघडले आहेत. स्वाईन फ्ल्यूच्या या पहिल्या कोवळ्या बळी नंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली आणि रुग्णांची तपासणी आणि उपचार यात युध्द पातळीवर यंत्रणा कार्यरत झाली. मात्र याने गेलेला जीव परत येणार नव्हता. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आकलेचे तारे तोडत काही विधाने केल्यामुळे वातावरणात अजूनच विषाणू पसरले आणि वातावरण गढूळ बनले.
राज्य शासन अपयशी ठरत असतांना त्यांच्यावर टिका करण्याची नामी संधी सोडून देईल तो विरोधी पक्ष कसला. शिवसेनेच्या कार्य-अध्यक्षांनी आपले वाक्-बाण शासन यंत्रणेवर सोडायला सुरवात केलीच. 'मॅक्सिकन पॅटर्न' राबवा. हे मुख्यमंत्रीच अपशकूनी आहेत. अशी मल्लीनाथी त्यांनी सुरु केली. मात्र त्यांच्याच ताब्यात असलेल्या मुंबै महापालिकेत त्यांच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला आयुक्तांनी 'फाटक' दाखवलं आणि जनतेचा कौल मागितला. तर इकडे दुस-या साहेबांनी सरळ शाळेत जाऊन शाळा , सिनेमागृहच बंद करण्यास सुरवात केली. अर्थात मॅक्सिकन पॅटर्न राबवला, एकूण काय तर 'यांच्या' निर्णयावर 'त्यांनी' कुरघोडी केली. असो, कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाहीत ते राजकारणी कसले.
आता गोपाळकाला उद्यावर येवून ठेपलाय तर, महाराष्ट्राचं लाडकं दैवत गणपतीचीही चाहूल लागली आहे. अशातच संसर्गजन्य स्वाईन फ्ल्यूने महाराष्ट्राला विळखा घातल्याने राज्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्यानांही हे सण कसे साजरे करायचे असा प्रश्न पडला आहे. एकूण काय तर आपण सगळे नाक मुठीत घेवून जगत आहोत.
जाता जाता...
आत्ताच बातमी आली आहे... एक्यात सामील न होणा-या नेत्यांच्या सभा उधळा - रामदास आठवले.
सत्ते पासून दूर गेलेल्या आठवलेंना एक्याच्या बळावर तरी आगामी विधानसभेत (मानाचे नसलेतरी) स्थान मिळेल, याचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांचा एक्याचा आटापिटा चालू दिसतोय. पण प्रकाश आंबेडकरांनी ऐक्यात सामील न होण्याचा घेतलेला निर्णय, आठवलेंच्या विधानसभेतील 'स्थाना'ला खो घालत आहे. असा त्यांचा कयास असावा म्हणूनच लोकशाहीवादी - फुले, आंबेडकर विचारधारा मानणा-या पक्षाचा नेता, हाणा मारा ची भाषा आपल्याच बांधवांविरोधात करत आहे. असं 'हाणून मारुन' खरचं ऐक्य होणार आहे का ? का यांच्याही डोक्यात H1N1 घुसला आहे ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा