मुख्य सामग्रीवर वगळा

कभी ना बिते ये चमकिले दिन...

True friends are like mornings, u cant have them the whole day, but u can be sure, they will be there when u wakeup tomorrow, next year and forever
किंवा
सगळ्या मित्रांच्या वेगवेगळ्या रंगांच्या अस्तीत्वामुळे माझ्या जीवनात अनेक रंग भरले गेले. त्या माझ्या जवळच्या सगळ्या मित्रांसाठी Hapqy Friendship Day.
या आणि या सारख्या मेसेजेसनी आज मोबाईलचा ईनबॉक्स भरत होता.
ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणेजे Friendship Day. (हे कोणी सांगितले, कोणी लिहून ठेवले, कोण म्हणालंय या पैकी काहीच माहित नाही.) जेव्हा मी 11 वी - 12 वीत असेल तेव्हा हा 'FD' (संक्षीप्त नामाभीधानच सर्वांना जास्त आवडतात म्हणून आणि लांबलचक लिहायचा मलाही कंटाळा आलाय म्हणून) मला माहित झाला बहूतेक. व्हेलेंटाईन डे प्रमाणे मुलींना प्रपोज करण्याचा आणखी एक बहाण्याचा दिवस. एवढच काय ते या दिवसाचं मला तेव्हा अप्रूप. मात्र जेव्हा हातात मोबाईल खेळू लागला तेव्हा आज जसे एसएसएस येतायेत तसे रोज येऊ लागले, आणि मैत्रीचा दिवस साजरा करण्यासाठी ऑगस्टच्या पहिल्या रविवारची वाट पाहण्याची वेळ उरली नाही. मात्र या मैत्र दिनामुळे सगळ्या मित्रांची आठवण ताजी होते. त्यांच्याशी उपलब्ध माध्यमाद्वारे संपर्क प्रस्थापीत होतो आणि आपलं नातं आणखी दृढ होण्याला जणू खत पाणीच मिळते. त्यासाठी हा मैत्रदिनाचा खटाटोप महत्त्वाचाच आहे.

मैत्री कालची आणि आजची

कभीना बीते ये चमकीले दिन...
कालची मैत्री म्हटल्यानंतर मी लगेच जाऊन पोहचतो ते मिलिंदच्या दिवसांमध्ये. मिलिंद कॉलेज मधे मला ख-या अर्थाने मित्र लाभले. त्यावेळच्या आमच्या ग्रुप मधील बहुतेक मुली आता सासुरवाशीनी झाल्या आहेत. पण त्या आधीपासूनच त्यांच्या आणि आम्हा मुलांच्या संपर्कात खंड पडत गेला तो, आज इतका की आमच्या ग्रुप मधील मुली कुठे आहेत, त्या काय करतात, त्यांचे लँडलाईन-मोबाईल नंबर्स तीन-चार ठिकाणी संपर्क केल्यावरच सापडतील अशी अवस्था आहे. तर मित्रांच्या मी अजूनही संपर्कात आहे. इतकच नाही तर नित्यनियमाने आमच्या गाठीभेटीही होतात. ही कालची मैत्री आजही ताजी आहे. ती ताजी ठेवण्यासाठी आम्हाला फार काही कष्टही घ्यावे लागत नाहीत. थोडक्यात सांगायचं म्हणजे सो कॉल्ड संस्कृती नुसार आम्हाला एकमेकांना भेटण्यासाठी काही गेट टुगेदर अँरेंज करावे लागत नाही की, ओल्या पार्टीचं निमीत्त आम्हाला जवळ घेवून येत नाही. प्रत्येकाला असलेल्या वेळेनूसार प्रत्येकजण फोन अथवा प्रत्यक्ष भेटीतून संपर्कात राहतो. कधी-कधी मोबाईल कॉन्फरंसद्वारेही आम्ही गप्पा मारतो. एवढं सगळं असूनही मी काही गोष्टीना खुप मिस करतो... जसे सायकॉलॉजी डिपार्टमेंट च्या पाय-या (कॉलेजचा कट्टा), निराला बाजारची संध्याकाळ, विद्यापीठातील कँटीनमधे पडीक असनं, तिथे कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने मारलेल्या मनमुराद गप्पा, सभा-साहित्यसंमेलनाला लेवलेली हजेरी, गझंलांचा घेतलेला आनंद आणि पिक्चर थेटर मधे केलेला धिंगाणा.
मिलिंदच्या शैक्षणिक आयुष्यात मला भेटलेले हे माझे मित्र - आणि त्यांच्याशी असलेलं मैत्र हीच माझी खरी मैत्री... या मैत्रीने मला खुप समृध्द केलंय.
माझे आजचे मित्र (ज्यांना मी आज आवर्जून sms केलेत) हे सगळे माझे व्यवसायीक सहकारी कम मित्र. यातील बहुतेक जण जर्नालिझम डिपार्टमेंट पासूनचे माझे सहकारी. यांच्याशी माझ्या घरगुती- वयक्तीक गप्पा अत्यंत दूर्मीळ. मग या सहकारी मित्रांशी असलेल्या माझ्या गप्पा या कामा बद्दलच्याच, भेट झाल्यानंतर मी कोणत्याही परिस्थीतीत असलो तरी ओठांवर एक हलकसं स्मित करुन त्यांचं आभिवादन स्विकारणं किंवा त्यांना हाय - हॅलो करणं हाच काय तो त्यांच्यांशी असलेला संवाद. कामा मधे आलेल्या साचले पणाची री ओढणे, आपल्या आयडियाज् वापरल्या जातनसल्याची खंत व्यक्त करणं. आणि नव्याचा शोध सुरु आहे का ? याची प्रत्येकाकडे कायम विचारपूस करणं. हाच काय तो या मैत्रीतील एकमेव धागा.
आज माझी सगळ्यात जवळची मैत्रीण बनली आहे ती माझी बायको. आणि माझा सगळ्यात चागंला वेळ जातो तो माझ्या मुली सोबत.

मैत्रीदिना च्या सर्व मित्रांना मनापासून शुभेच्छा...
भाई.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...