मुख्य सामग्रीवर वगळा

ओढ...

ओढ...
माणसाला कित्येक गोष्टींची ओढ असते... त्यात घराची ओढ ही काही औरच! माणूस कोणत्याही परिस्थितीत असला, कोणत्याही संकटात सापडला किंवा त्याला काही आनंद झाला तरी त्याला ओढ असते ती घराची. कधी एकदा घरी जातो असं होवून जातं.
कोणतीही व्यक्ति घरी आल्यावर घराची दारं त्याचं किंवा तिचं आगत-स्वागत करणार नसतात. घराच्या विटा-मतीच्या किंवा संगमरवरी भिंती आपली विचारपूस करणार नसतात. दारा-खिडक्यांचे पडदे आंगाखांद्यावरुन हात फिरवणार नसतात, की मखमली बिछाना मायेची उब देणार नसतो. खिडक्या कितीही सत्ताड उघड्या करुन ठेवल्यातरी त्या आपल्याशी कोणताच संवाद साधणार नसतात. मनातली घालमेल शेअर करणार नसतात. तरीही माणसाला दगड-विटा-मातीच्या घराची कायम ओढ असते. घरातील वस्तूही आपल्याला जासत वेळ सुखावणा-या नसतात, तरीही घराची ओढ कुणाचीच संपत नाही. कारण या सर्व निर्जीव वस्तूमध्ये आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. या निर्जीव वस्तूंमध्ये जान येते, जेव्हा त्यांना सजीव हलचालींचा स्पर्ष होतो. मग जिन्याची प्रत्येक पायरीही बोलकी होते. जेव्हा तिथे बसून आपल्या प्रियजनांशी केलेल्या सुख दु:खाच्या गप्पा आठवतात...
घरात आल्यावर आई-वडिलांचा आंगा-खांद्यावरुन फिरणारा मायेचा हात प्रत्येक संकटाशी झुंज देण्याचं बळ देतो. आम्ही तुझ्या सोबत आहोत हे शब्द बळ देतात जगण्याचं. घरातल्या बोबड्या बोलाने आपण विसरून जातो सगळं टेन्शन-सगळं फस्ट्रेशन.
घर असं माणसांनी बनलेलं असतं . त्यांच्यातील नात्यानं सांधलेलं असतं. दगड विटांची केवळ इमारत उभी राहू शकते, घर नाही. हे प्रत्येकानेच कधीना कधी अनुभवलेलं असतं. हा अनुभव मला मुंबैत आल्यापासून रोज येत आहे. राहिले घर दूर माझे... अशीच माझी अवस्था असते. म्हणूनच प्रत्येक सुटीत मी, चलचले अपने घर ओ मेरे हमसफर... म्हणत घरी जात असतो... घराच्या ओढीने.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...