महाराष्ट्रात तिसरी आघाडी एकदाची झाली.तिचं बारसंही काल झालं. "रिपब्लिकन डावी लोकशाही समिती". या समितीतील सगळ्यांनी हातात हात धरून हात उंचावले...आम्ही एकत्र असल्याचे दाखवण्यासाठी... प्रेसवाल्यांना, टिव्हीवाल्यांना फोटो दिले. या तिस-या आघाडीत आहेत, 1)शेतकरी कामगार पक्ष,(त्यांच्याच ऑफिसमधे बसून प्रेस घेतली म्हणून त्यांचे नाव प्रथम) 2)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकत्रीत), अजूनही रिपाईच्या पुढे कंस घालावाच लागतो. त्याशिवाय कळत नाही आपण कोणत्या रिपाई विषयी बोलत आहोत ते. अशीच अवस्था कमी जास्त प्रमाणात या आघाडीत सामील झालेल्या पक्ष - संघटनांची आहे. 3)मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, 4)भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 5)स्वाभिमानी शेतकरी संघटना. 6)समाजवादी पार्टी, 7)जनता दल सेक्युलर, 8)परिवर्तन आघाडी 9)सोशालिस्ट फ्रंट 10)लोक जनशक्ती पार्टी 11)राष्ट्रीय समाज पक्ष 12)समाजवादी जनपरिषद 13)सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 14)लोक राजनिती मंच 15) लोकभारती आणि 16)लोकसंघर्ष मोर्चा या सोळा पक्षाची मोट बांधण्यात आली आहे. आणखी बरेच पक्ष येवून मिळण्याचे संकेत या समितीने काल दिले आहेत. मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या वसई विकास आघाडीला दूर ठेवण्यात आले आहे.
या सर्व पक्ष - संघटनांच्या नावाची उजळणी केली असता काही नावं अगदीच अपरिचीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे स्वबळावर आधी आमदार आणि आता खासदार झाले आहेत. या सगळ्या पक्षांचे मिळून सध्या दोन अंकी आमदार आहेत. रिपाईची एक गठ्ठा ताकत निर्माण झाली आहे. डाव्यांचेही काही टापू मजबूत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचाही बांधलेला मतदार आहे. असा सारासार विचार केला तर तिसरी आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीला मोठी डोके दूखी ठरू शकते. सेना-भाजपच्या खेम्यामधे या आघाडीमुळे नक्कीच आनंदाचे वातावरण असणार. सेनेचे सीईओ उध्दव ठाकरेंच्या गालावर खळी पडली असं खात्रीलायक वृत्त देखील आलं आहे.
मी 8 ऑगस्ट ला लिहिलेल्या ब्लॉग मध्ये रिपाई समोरील आव्हाने यात, रिपाईची ताकत महाराष्ट्र देशा समोर आली तर समविचारी पक्ष नक्कीच त्यांना येवून मिळतील, हा होरा व्यक्त केला होता. कारण महाराष्ट्रात आता छोट्या पक्षांचं मोठं पेव फूटलेलं आहे. त्याने लोकशाही नक्कीच वृद्धींगत होत आहे. (हा वेगळ्या ब्लॉगचा विषय होवू शकेल) काँग्रेस, राष्ट्रवादी हे एकाच माळेचे मणी आहेत, हे आता लोकांना चांगलच कळून चुकलं आहे.पण मग कोणा मागे जावं हा प्रश्न शिल्लक राहतोच. तिस-या आघाडीने समर्थ पर्याय महाराष्ट्राला दिला तर महाराष्ट्र देशाच्या राजकारणात वेगळं चित्र पहायला मिळेल हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही. सेना - भाजप या जातीयवादी पक्षांना चार हात दूर ठेवून रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी आपला मार्ग चोखाळत आहे. तोच न्याय त्यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडी सोबतही ठेवावा. ज्या प्रकारे राजू शेट्टी हा आमचा उमेदवार आहे. तो विधानसभेत-संसदेत गेला पाहिजे ही तळमळ ऊस उत्पादक शेतक-यांना वाटली. अशीच उमेद या समितीने जनतेत निर्माण करायला हवी. यांची जमेची बाजू म्हणजे को-या पोटीची बरीच मंडळी अजून यांच्याकडे आहे. त्यांना प्रमोट केलं पाहीजे. बाह्य फायदा या समितीला होण्याची शक्यता दाट आहे. भाजप आपल्याच चिंतनात गर्क आहे. अंतर्गत सुंदोपसुंदीत त्यांचा वेळ , श्रम आणि बुध्दी खर्च होत आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसचे बैल दिवसागणिक ढूसण्या देवून सतावत आहेत. आम्हाला आघाडी नको - तुम्हीच विलीन व्हा, स्वतंत्र लढू अशी राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारी विधानं रोजच्या रोज केली जात आहेत. त्यामुळे आघाडी झाली तरी ती पोटातून की ओठातून हे कोणालाच कळणार नाही.
सगळ रान हे रिपब्लिकन डावी लोकशाही समितीलाच मोकळं आहे असा नक्कीच याचा अर्थ नाही. जमीन भुसभुशीत आहे हे मात्र तेवढं खरं.
प्रकाश आंबेडकरांचा रिपाई एकिकरणात आणि रि.डा.लो.समितीत अजून सहभाग नाही. त्यांचा या पंधरा सोळा पक्ष-संघटनांपैकी ब-याच जणांशी निवडणूकपूर्व आघाडीसाठी संपर्क होता. रिपाई एक्यावर आंबेडकरांचा विश्वास नसला तरी डाव्या , समविचारी पक्षांशी त्यांचा नेहमी संपर्क असतो . आता ते समितीत सामील होणार की 'ऐकला चलो रे' ची री ओढणार , हे अजून गुलदस्त्यात आहे. समितीचा मतदार ग्रामीण महाराष्ट्रात जास्त असला तरी मनसे फॅक्टरचा अव्हेर करुन आज कोणत्याही पक्षाला पूढे जाता येणार नाही हे ही ध्यानी घ्यावं लागेल.
या सोळाही पक्षाच्या धुरीणांनी अंगझडून एकमेकांसाठी फिरलं पाहिजे. नसता हे कागदी वाघ ठरायला वेळ लागणार नाही.
या सर्व पक्ष - संघटनांच्या नावाची उजळणी केली असता काही नावं अगदीच अपरिचीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे स्वबळावर आधी आमदार आणि आता खासदार झाले आहेत. या सगळ्या पक्षांचे मिळून सध्या दोन अंकी आमदार आहेत. रिपाईची एक गठ्ठा ताकत निर्माण झाली आहे. डाव्यांचेही काही टापू मजबूत आहेत. शेतकरी कामगार पक्षाचाही बांधलेला मतदार आहे. असा सारासार विचार केला तर तिसरी आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीला मोठी डोके दूखी ठरू शकते. सेना-भाजपच्या खेम्यामधे या आघाडीमुळे नक्कीच आनंदाचे वातावरण असणार. सेनेचे सीईओ उध्दव ठाकरेंच्या गालावर खळी पडली असं खात्रीलायक वृत्त देखील आलं आहे.
मी 8 ऑगस्ट ला लिहिलेल्या ब्लॉग मध्ये रिपाई समोरील आव्हाने यात, रिपाईची ताकत महाराष्ट्र देशा समोर आली तर समविचारी पक्ष नक्कीच त्यांना येवून मिळतील, हा होरा व्यक्त केला होता. कारण महाराष्ट्रात आता छोट्या पक्षांचं मोठं पेव फूटलेलं आहे. त्याने लोकशाही नक्कीच वृद्धींगत होत आहे. (हा वेगळ्या ब्लॉगचा विषय होवू शकेल) काँग्रेस, राष्ट्रवादी हे एकाच माळेचे मणी आहेत, हे आता लोकांना चांगलच कळून चुकलं आहे.पण मग कोणा मागे जावं हा प्रश्न शिल्लक राहतोच. तिस-या आघाडीने समर्थ पर्याय महाराष्ट्राला दिला तर महाराष्ट्र देशाच्या राजकारणात वेगळं चित्र पहायला मिळेल हे सांगायला कोण्या जोतिषाची गरज नाही. सेना - भाजप या जातीयवादी पक्षांना चार हात दूर ठेवून रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी आपला मार्ग चोखाळत आहे. तोच न्याय त्यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडी सोबतही ठेवावा. ज्या प्रकारे राजू शेट्टी हा आमचा उमेदवार आहे. तो विधानसभेत-संसदेत गेला पाहिजे ही तळमळ ऊस उत्पादक शेतक-यांना वाटली. अशीच उमेद या समितीने जनतेत निर्माण करायला हवी. यांची जमेची बाजू म्हणजे को-या पोटीची बरीच मंडळी अजून यांच्याकडे आहे. त्यांना प्रमोट केलं पाहीजे. बाह्य फायदा या समितीला होण्याची शक्यता दाट आहे. भाजप आपल्याच चिंतनात गर्क आहे. अंतर्गत सुंदोपसुंदीत त्यांचा वेळ , श्रम आणि बुध्दी खर्च होत आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसचे बैल दिवसागणिक ढूसण्या देवून सतावत आहेत. आम्हाला आघाडी नको - तुम्हीच विलीन व्हा, स्वतंत्र लढू अशी राष्ट्रवादीच्या नेत्या, कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारी विधानं रोजच्या रोज केली जात आहेत. त्यामुळे आघाडी झाली तरी ती पोटातून की ओठातून हे कोणालाच कळणार नाही.
सगळ रान हे रिपब्लिकन डावी लोकशाही समितीलाच मोकळं आहे असा नक्कीच याचा अर्थ नाही. जमीन भुसभुशीत आहे हे मात्र तेवढं खरं.
प्रकाश आंबेडकरांचा रिपाई एकिकरणात आणि रि.डा.लो.समितीत अजून सहभाग नाही. त्यांचा या पंधरा सोळा पक्ष-संघटनांपैकी ब-याच जणांशी निवडणूकपूर्व आघाडीसाठी संपर्क होता. रिपाई एक्यावर आंबेडकरांचा विश्वास नसला तरी डाव्या , समविचारी पक्षांशी त्यांचा नेहमी संपर्क असतो . आता ते समितीत सामील होणार की 'ऐकला चलो रे' ची री ओढणार , हे अजून गुलदस्त्यात आहे. समितीचा मतदार ग्रामीण महाराष्ट्रात जास्त असला तरी मनसे फॅक्टरचा अव्हेर करुन आज कोणत्याही पक्षाला पूढे जाता येणार नाही हे ही ध्यानी घ्यावं लागेल.
या सोळाही पक्षाच्या धुरीणांनी अंगझडून एकमेकांसाठी फिरलं पाहिजे. नसता हे कागदी वाघ ठरायला वेळ लागणार नाही.
काही शब्दांचा अपवाद वगळता ब्लॉग चांगला झाला आहे. उदा. शिवसेनेच्या खेम्यात हा शब्द... खेम्यात हा शब्द खटकतो. खेमा हा उर्दू शब्द तेथे तुम्ही गोटात हा शब्द वापरू शकला असता. दुसरी गोष्ट आकडेवारीत तुम्ही गाफील दिसता. कारण सोळा पक्षांचे कडबोळे असले तरी त्यांची कोणत्या भागात किती ताकद आहे हे इतिहास आणि वर्तमानाचे संदर्भ देऊन आकडेवारीसह देता आले पाहिजे. हे शक्य होऊ शकेल ना. तुम्ही निवडणूक आयोगाच्या बेबसाईटला भेट दिल्यास तेथे आयता संदर्भ उपलब्ध होऊ शकेल.
उत्तर द्याहटवाJai Maharashtra !
उत्तर द्याहटवाVery interesting and realistic analysis. Only shortcoming is About Hon'ble Shree Uddhavaji's position. You are using word C.E.O.which is not acceptable by all means .It is my humble request you to respect him and use word Shivsena Karyadhyaksha OR Shivsena Executive President.
Thank you
Tukaram Saraf
Bhartiya Vidyarthi Sena
Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University,
Sambhajinagar.