मुख्य सामग्रीवर वगळा

मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ?


अण्णाभाऊ साठेंनी मुंबईचे यथार्थ वर्णन त्यांच्या 'मुंबईची लावणी'मध्ये केले आहे. पहिल्या दोन ओळीतच त्यांनी मलबार हिलचा उल्लेख केला, तो असा...
'मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।'

अशा कुबेरांच्या वस्तीचे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे मंगल प्रभात लोढा. त्यांनी याच मलबार हिलमधील जीना हाऊस जमीनदोस्त करण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची त्यांनी केलेली मागणी कोणत्याही व्यक्तीला रास्तच वाटू शकते. त्यातही सध्याच्या 'देशद्रोही' आणि 'देशभक्त' या व्याख्येत त्यांची मागणी सहाजिकच देशप्रेमाचे भरते आणणारीच आहे.  त्यांच्या या मागणीने काही प्रश्नही निर्माण झाले आहे.

मंगल प्रभात लोढा यांनाच फाळणीच्या प्रतीकाची एवढी शीरशीरी का यावी ? 

- 'जीना हाऊस' ज्या भागात आहे तो मलबार हिल परिसर लोढांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 1995 मध्ये ते येथून प्रथम आमदार झाले.
- मुख्यमंत्र्यांचा बंगला 'वर्षा' देखील मलबार हिलमध्ये आहे. 'वर्षा' समोरच अडीच एकरातील परिसरात 'जीना हाऊस' आहे.

- लोढा कोण आहेत ? 
मुंबईच्या कोणत्याही रस्त्यावरुन गेल्यानंतर लोढा डेव्हलपर्सच्या लक्झरीयस फ्लॅट्सच्या  जाहिराती तुमच्या नजरेस पडतील. जेवढ्या आकर्षक जाहिराती आहेत तेवढेच डोळे दिपवणारे त्यांचे प्रोजेक्ट्स आहेत. अर्थातच मलबार हिल, कफ परेड येथीलच नाही तर परळमधीलही त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये महाराष्ट्रीयन (मराठी) व्यक्तीला प्रवेश मिळाला असेल याची खात्री देता येत नाही.
असे फुलटाईम बिल्डर आणि पार्ट-टाईम राजकारणी असलेले लोढा 1981 मध्ये राजस्थानातून मुंबईत आले.
त्यांची मुंबईत येण्याची कहाणीही फिल्मी आहे. राजस्थानातील मारवाड मधील भिनमल येथे जन्मलेले आणि वाढलेले लोढा यांचे वडील गुमन मल लोढा हे स्वातंत्र्यसैनिक आणि गुवाहाटी हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते. बी.कॉम एलएलबी झालेल्या मंगल प्रभात लोढांची जोधपूर हायकोर्टात प्रॅक्टिस सुरु होती. त्याचवेळी त्यांच्या वडिलांची बदली जोधपूरला झाली. जेथे वडील जज्ज आहे तेथे मुलाने वकिली करु नये असा नैतिकतेचा मुद्दा पुढे करुन मंगल प्रभात यांनी 1981 मध्ये मुंबईचा रस्ता धरला आणि अवघ्या 14 वर्षांत (1995) मुंबईतील इंद्रपूरी अर्थात मलबारहिलचे ते आमदार झाले.
- बिल्डर मानसिकतेच्या लोढांच्या डोळ्यात जीना हाऊस किती वर्षांपासून असेल याचा नेम नाही, मात्र संधी मिळाली ही भाजपचे सरकार आल्यावर. मग ही संधी सोडेल तो बिल्डर कसला?

आता काही सामान्य प्रश्न 

- इंग्रजांनी भारतावर 150 वर्षे राज्य केले मात्र त्यांनी उभारलेल्या वास्तू आजही आपण 'हेरिटेज'च्या नावाखाली जपत आहोत. तेथे  'जीना हाऊस'च लोढांच्या डोळ्यात का खुपत आहे?
- जीना हाऊस गुलामी आणि फाळणीचे प्रतीक असल्याचे लोढा म्हणाले आहेत.
- दशकभरापासून लोढा आमदार आहे, आताच त्यांना जीना हाऊसची शीरशीरी का आली ?


जीना हाऊसबद्दल 
- पाकिस्तानचे निर्माते आणि भारताच्या फाळणीचे खलनायक ज्यांना म्हटले जाते त्या जीनांनी इंग्लंडहून भारतात परतल्यानंतर 1936 मध्ये मुंबईतील मलबार हिल येथे 2 लाख रुपये खर्चून जो बंगला बांधला तो जीना हाऊस. येथेचे त्यांनी मुस्लीम लीगचा चार्ज घेतला.
- अडीच एकरावरील हा बंगला युरोपियन स्थापत्यशैलीचा नमुना आहे. सी-फेसींग असलेल्या या बंगल्याच्या बांधकावर जीनांनी यांनी स्वतः लक्ष दिले होते. येथे इटालियन मार्बल आणि वॉलन्ट वूडचा वापर करण्यात आला आहे. ते खास इटलितून मागवण्यात आले होते.
- लोढा ज्या जीना हाऊसला फाळणीचे प्रतीक म्हणतात तेथे जीना आणि महात्मा गांधी व पंडित नेहरुच्या अनेक चर्चा झाल्या आहेत. या चर्चांचा साक्षीदार हा बंगला आहे.
- सध्या यावर भारत सरकारची मालकी असली तरी जीना यांची मुलगी दिना वाडिया यांनी  यावर वारसाहक्काने दावा केला आहे. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. योगायोग पाहा, दीना वाडिया यांचा जन्म 1919च्या ऑगस्ट 15 ला झाला होता.
- फाळणीनंतर जीना 1947 ला कराचीला गेले, मात्र मुंबईतील बंगला हा त्यांच्या अतिशय जवळ होता. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंना विनंती केली की हा बंगला परदेशी व्यक्तींना त्यातही यूरोपियन अधिकाऱ्यांना द्याव. त्यांना याची शैली आवडेल असा त्यांचा कयास होता. जीनांची ही विनंती नेहरुंनीही मान्य केली होती.
- अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी मुंबई भेटीत हा बंगला पाकिस्तानी अँबसिला देण्याची मागणी केली होती, मात्र ही चर्चा चर्चाच राहिली.
- ताज्या माहितीनुसार, या प्रॉपर्टीचा वाद न्यायालयात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

योगीसाठी शहीदाच्या घरी लावला एसी, दानवेंच्या दारी आलेली शेतकऱ्यांची पोरं 'उपाशी'

शहीदाच्या कुटुंबाचीही देशभक्तीचे उमाळे येणारं सरकार थट्टा करु शकते, याचे ताजे उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले आहे. भारत 'माते'साठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी योगी आदित्यनाथांना 11 दिवस लागले. (की माहित नाही योगी मयताच्या दहाव्यानंतरच त्या घरात जातात असा काही नियम आहे.) हरकत नाही. ते शहीदाच्या घरी गेले. त्याच्या आदल्या रात्री उत्तर प्रदेशातील देवरिया या शहीद प्रेम सागर यांच्या घरी एसी, सोफा सेट, गालिचा आणि काही भगवी वस्त्रे पाठवण्यात आली होती. एवढेच नाही तर घरातील टॉवेल ही बदलण्यात आले होते. एका रात्रीतून एसी लाकडी बल्ल्यांवर फीट करण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, त्यांनी शहीदाचे घर पाहिले, कुटुंबियांची भेट घेतली आणि कोरडी आश्वासने देऊन ते आल्या पावली परत गेले. शहीद प्रेम सागर यांच्या कुटुंबियांना वाटले होते की आदल्या रात्री आलेल्या वस्तू आता आपल्याच घरात राहातील. मुलगा गेला तरी सरकारने आपल्याला वाऱ्यावर सोडले नाही, मात्र त्यांचा हा भ्रम होता. शहीद प्रेम सागर यांचे वडील इश्वर चंद्र यांनी एका दैनिकाला दिलेल्य...

गरज थोड्या लवचिकतेची

वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातील एक मोठ्या व्होट बँकचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे. हा मतदार स्वाभिमानी, विचारकरणारा आणि आंबेडकरी घराण्यावर निष्ठा असलेला निष्ठावान आहे. मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (भारिप), भारिप बहुजन महासंघ, २०१४ मध्ये डाव्यांसोबत केलेली आघाडी, २०१९ लोकसभा निवडणुकीत  एमआयएमला सोबत घेऊन लढवलेली निवडणूक, आणि विधानसभेत एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग. बाळासाहेबांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या या सर्व प्रयोगांमध्ये 'आंबेडकर'नावावर जीव ओवाळून टाकणारा मतदार तन-मन-धनाने त्यांच्यासोबत राहिला आहे. मात्र या निष्ठावान जनतेला अद्याप सत्तेची चव चाखायला मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत 'वंचित' उमेदवारांना मिळालेली मते पाहिल्यास स्पष्ट होते की, बौद्ध समाजाने बाळासाहेबांच्या नावावर भरभरुन मतदान केले आहे. मात्र बाळासाहेब ज्या ओबीसी, ओबीसींमधील छोट्या जाती, धनगर, अलुतेदार, बलुतेदार, आदिवासी, लिंगायत यांना सोबत घेऊन सत्ता संपादनाची इच्छा व्यक्त करत आहेत तो समाज पूर्ण ताकदीने बाळासाहेबांसोबत आल...

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे

हा कसला फकीर... हा तर बेफिकीर पंतप्रधान - राज ठाकरे १७व्या लोकसभेत महाराष्ट्रासह देशभर सध्या कोणाचे भाषण गाजत असेल तर ते आहे राज ठाकरे यांचे. महाराष्ट्राला राजकीय वक्त्यांची मोठी पंरपरा लाभलेली आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय सभा मारून नेईल असा सध्या एकमेव नेता आहे, ते म्हणजे राज ठाकरे. त्यासोबतच नाव घ्यावे लागेल 'हैदराबादी शेरवानी' अर्थात बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचे. ओवेसी महाराष्ट्रीयन नसले तरी, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांसोबत महाराष्ट्रात अनेक दौरे करुन महाराष्ट्रीयन जनतेची नस अचूक ओळखल्याचे प्रत्येक सभेतून पाहायला मिळाले. राज ठाकरे यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' हे आता वाक्य राहिले नाही तर ती एक फ्रेज झाली आहे. राज यांची भाषणे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही चर्चेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारे त्यांचे 'लाव रे तो व्हिडिओ' सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एकही उमेदवार उभा केलेला नसताना राज्यात सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे यांची. उद्याच्या सभेत राज ठाकरे...