मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आई असल्यावर जाणवत नाही

आई असल्यावर जाणवत नाही एकटाच असलो की, मनावर अनाहूत काजळी पसरते. मग चार भिंतीचं सुरक्षा कवच असलेल्या घरात, जर्नालिझमच्या हॉलमध्ये, बुद्धलेणीच्या पायथ्याशी, पिंपळाच्या जाळीदार सावलीत मी कुठेही असलो तरी, माझ्या एकटेपणाला सोबत करायला 'आई' हळुवार पावलाने येते. कधी-कधी माणसांच्या मेळ्यात, नात्यांच्या गोतावळ्यात, माझ्या एकाकी मनाची आई सोबती होते. एकटेपणाच्या गर्तेतून आई माझा उजवा हात हाती धरून, डावा हात पाठीवर फिरवून येणा-या प्रत्येक संकटाशी धैर्याने सामोरे जाणाचे बळ देते. त्यावेळी ती खूप काही सांगते. तिला लाभलेल्या छोट्याशा आयुष्यातील ब-या-वाईट अनुभवाचं संचित आई माझ्या पुढयात ठेवेत... कोजागिरीच्या पिठूर चांदण्यात आईची गोरी कांती अधिकच उजळून निघायची. सर्वांसाठी द्रवणारं तिचं ह्रदय, आजही कळत नाही तिच्या ह्रदयाचा थांग. कुठून साठवलं होतं तिनं एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं तिच्याशी आपलेपणाचं नातं. 'उपाशीपोटी पाण्याच्या घोटी सपान पडतं आभाळ झडतं ग आभाळ झडतं' अशी मनाची अवस्था झाली की, मनाच्याही नकळत मनभर व्यापून राहाते आई; आणि म्हणूनच प्रत्येक ...

इंदू मिल : वृत्तवाहिन्यांचे राजकराण

गेल्या काही वर्षांपासून धगधगत असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा मुद्दा आज निकाली निघाला. संसदेच्या दोन्ही सभागृहात जागा देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली. बाके वाजवून सर्व खासदारांनी त्याचे स्वागत केले. तर, मुबंई आणि राज्यातील इतर शहरांमध्ये आंबेडकरी जनतेने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. हा आनंदोत्सव दाखवत असतानाच, मराठी वृत्तवाहिन्या या आंदोलनाचे प्रणेते आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, राष्टावादी काँग्रेसचे विजय कांबळे यांची प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे प्रतिक्रीया घेत होते. तेव्हा सहाजिकच आता तुम्हाला काय वाटते हा प्रश्न होता, आणि त्याचे स्वाभाविक उत्तर होते, हा आनंदाचा क्षण आहे. आंबेडकरी जनतेचा हा विजय आहे. आंबेडकरी जनतेच्या ह्या जल्लोषात बेकीचे बीज पेरण्याचे काम काही वृत्तवाहिन्या करताना दिसत होत्या. या विजयाचे श्रेय कोणाला देणार?  हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातील शिष्टमं...

स्मारकाचे राजकारण आणि आपण

महाराष्ट्र आणि देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकरण करणा-यांची कमी नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हजारो कार्यकर्ते हे आंबेडकरी विचारधारेने वेगवेगळ्या पक्षात, संघटनांमध्ये, संस्थामध्ये काम करतात. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि त्यांच्या पोटाखाली गेलेले रामदास आठवले यांचा गट. यांच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष व रिपब्लिकन पक्षाचेही शेकडो गट राज्यात कार्यरत आहेत. त्यांची यादी इथे देणेही शक्य होणार नाही एवढी त्यांची संख्या आहे.  एवढ्या विविध पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांमध्ये कार्यरत असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचे राजकारण हे एकाच नावाभवती फिरत आले आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १९५६ च्या डिसेंबरमध्ये बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हापासून आता २०१२ म्हणजे तब्बल ५६ वर्षात बाबासाहेबांच्या नावाने सर्वच पक्षांनी राजकारण केले आहे. बहुजन समाज पक्षाला सोडल्यास इतर कोणत्याही दलित पक्षाला सत्ता संपादन करता आलेली नाही. मात्र, बाबासाहेबांच्या नावाने काँग्रेसपासून आता आताच्या मनसेनेही म...

सुनीसुनी मुंबई, गहिवरलेले मराठीजन आणि आतून पुरता हललेलो मी!

मुंबई... अविरत धावणारे शहर... जिथे कुणालाच कुणासाठी वेळ नाही... कायम धावपळ... लोकलमधील गर्दी... माझ्या तीन साडेतीन वर्षांच्या मुंबईतील वास्तव्यात, विविध रंगाने- गंधाने भरलेली मुंबई कित्येकवेळेस पाहिली.  मात्र, शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरची मुंबई ही सुनीसुनी आणि दुःखाचे सावट पसरलेली होती. गेल्या रविवारी एकाही दुकानाचे शटर उघडे नव्हते. मोठ मोठ्या मॉलपासून चहाच्या आणि पानाच्या टप-यांनीही आपली दारं बंद करुन घेतलेली होती. अशी सन्नाट्याने भरलेली मुबंई या आधी कधीच पाहिली नाही आणि या पुढेही कधी पाहाता येईल, असे वाटत नाही. गेल्या शनिवारी मी माझ्या एका परीक्षेनिमित्त मुंबईला गेलो होतो. शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या तशा सोमवार पासून येत होत्या, त्यामुळे मातोश्रीवर असलेली गर्दी आणि तिथून सुरू असलेले मीडियाचे कव्हरेज याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा म्हणून मी शनिवारी दुपारी कलानगरमधील म्हाडाच्या इमारतीत उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये जाऊन थांबलो. काही क्षणांतच खासदार संजय राऊत बाहेर आले आणि त्यांच्यासोबत इतरही काही लोक होते. गेल्या काही दि...

दुष्काळाच्या झळा... आधी गाव झाले परके, नंतर मुले झाली पोरकी

शहरातील बंद दारा आड टीव्ही समोर बसून नळाला पाणी कधी येईल याची चिंता करणारे 'नागरिक' आणि एसी ऑफिसमध्ये बसून बिस्लरी कॅनचे पाणीही फिल्टर करून पिणारे 'कर्मचारी', दोन दिवस झाले नळाला पाणी आले नाही म्हणून पालिकेला शिव्या घालतात... मात्र, आभाळातून पाणी पडलं नाही म्हणून म्हाता र्‍या -कोता र्‍यां च्या हवाली कच्ची-बच्ची टाकून त्यांच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शहराचा रस्ता धरणा र्‍यां ची कथा फार वेगळी आहे. मात्र, कोट्यवधींचा कोळसा घोटाळा... त्यात कोणाचे हात काळे झाले होते आणि इकडे पावसाचा टिपूस नसताना राज्याच्या उपमुख्यंमत्र्याचे नाव सिंचन घोटाळ्यात येते... नैतिकतेच्या मुद्यावर ते राजीनामा देतात आणि त्यानंतरच्या राजकीय नाट्यावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे रकानेच्या रकाने भरतात आणि तासंतास चर्चा करतात... या चर्चेच्या गुर्हाळात दुष्काळाचे कुणाला घेणे देणे ? पण, दुर्लक्ष्य केले म्हणून दुष्काळाची दाहकता कमी होत नाही. या दुष्काळाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भोजेवाडीच्या दोन जणांचा बळी घेतला. भोजेवाडीत गेल्या दोन वर्षात पावसाचा थेंब पडला नाही.  कोरडवाहू जमीनीतू...

Digvijay Jirage: आमचा विसरभोळा भाई !

Digvijay Jirage: आमचा विसरभोळा भाई ! : शिर्षक वाचून तुम्‍हाला मी महाराष्‍ट्रातील लाडके व्‍यक्‍तीमत्‍व पुलं विषयी बोलत असेल असं वाटेल. पण तसं नाही (कानाला हात लावून) मी ज्‍या भा...

कळेनासे झाले आहे

आसपास एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात की, त्यातून काय सत्य काय असत्य, खरेच कोणाचा दोष की, त्याच्यावर उगाच आरोप केले जात आहेत. घडलेल्या घटनेतील नेमकेपणा माध्यमातून जो समोर येत आहे तो आहे की, ती व्यक्ती सांगते ते खरं आहे. हे ओळखण्याची रेषा एकदम अंधूक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले अण्णांचे आंदोलन हे खरच देशातील भ्रष्टाचार मिटविण्यासाठी सुरु आहे की, केंद्रातून काँग्रेस? की त्यांचा आणखी काही वेगळाच हेतू आहे. हे लिहित असतानाच राजद्रोहाच्या आरोपात बंदिस्त असलेला व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी याची जामीनावर सुटका झाली. त्याआधी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत असीमने केवळ घटनात्मक प्रतिकांचा अपमान केला नसून त्याने अशोकस्तंभाचाही अपमान केला आहे त्यामुळे बौद्ध अनुयायी देखील दुखावल्याचे बोलले गेले. मात्र, जामीनावर सुटलेल्या असीमने प्रथम काही केले असेल तर तो बौद्धविहारात गेला आणि त्याने तिथे भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पुजन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, मी त्यांच्या (बाबासाहेबांच्या) सामाजीक चळवळीला सॅल्यूट करतो. त्यांनी समानतेसाठी काम केले आणि आमच...

तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित तुकाराम हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी दासू वैद्य यांनी गाणी लिहिली आहेत. नुकतीच दिव्य मराठी या माझ्या वेबसाईट साठी (दिव्य मराठी मध्ये मी उपसंपादक म्हणून आहे, म्हणून माझी वेबसाईट) त्यांची मुलाखत घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या गप्पांमध्ये त्यांनी चित्रपट आणि संत तुकाराम यांच्यासंबधी बरेच विवेचन केले. यातून दासू सरांचा व्यासंग आणि तुकारामाकडे पाहण्याची दृष्टी ही कळली. ही मुलाखत म्हणजे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.  माझ्या अल्पबुद्धीला जेवढे पचले तेवढे या मुलाखतीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार, १२ मे २०१२ रोजी आमच्या दिव्य मराठीच्या वेबसाईटवर ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.  तुकारामसाठी गीत लेखन हा माझ्यातील कवीचा गौरव - दासू वैद्य ज्ञानबा-तुकाराम ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुकाराम या चित्रपटाच्या गीत लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुकाराम कळण्यास मदत झाली. तुकाराम हे प्रकरण समजून घेणं तसं फार अवघड आहे. ते कवींचेही कवी किंबहूना कवींचे बाप आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटासाठी काम करण्य...

रिपब्लिकन पक्षाची दुर्दशा कधी थांबेल ?

१९५७ ते १९६७ पर्यंत एक प्रबळ शक्ती असलेला आणि सत्ताधारी काँग्रेस पक्षाला प्रखर विरोध करुन सतत दबावात ठेवणारा रिपब्लिकन पक्ष आज पडझड झालेल्या एखाद्या मजबूत किल्ल्याची जी अवस्था होते तसा झाला आहे. एके काळी दिमाखदार वैभव लाभलेला किल्ला जसे खिंडारात त्याचे रुपातंर होऊन भकास आणि अवकळा आलेली वास्तू दिसावी तसे रिपब्लिकन पक्षाचे झाले आहे. एके काळी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पंजाब, कर्नाटक, तामीळनाडू, आंध्रप्रदेश आदी राज्यातून लोकसभेत खासदार पाठविणारा व विधानसभेत आमदार पाठविणारा तसेच मुंबई आणि नागपूर सारख्या महापालिकेचे महापौर पद भोगलेला हाच रिपब्लिकन पक्ष आहे का असा प्रश्न पडतो. १९५७ मध्ये काँग्रेस पक्षाच्या उरात धडकी भरविणारा रिपब्लिकन पक्ष त्याच काँग्रेससमोर सत्तेसाठी भिकेचे कटोरे घेऊन उभा असलेला पाहिल्यानंतर आंबेडकरी अनुयायांच्या तळपायाची आग मस्तका पर्यंत जाऊन भिडेत. या लाचार पुढा-यांना काळ्या पाण्यावर न नेता जिथे पाणीसुद्धा मिळणार नाही अशा ठिकाणी नेऊन फाशी द्यावी आणि समाजाची कायमच्या लाचारीपासून सुटका करावी, अशी सर्वसामान्य माणसाची उस्फूर्त संतापी प्रतिक्रीया उमटते. परंतू बाबासाहेबांनी दिलेल...

'गड' आला सेनेचा "सिंह" गेला रिपाईचा

रिपब्लिकन पक्षाचे नेत रामदास आठवले यांचा मुंबई महापालिकेत केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र याच वेळी त्यांनी ज्या दोन पक्षांशी युती केली त्या शिवसेना - भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. भाजप तर मागील निवडणूकीपेक्षा तीनने अधिक आहे. मतदानाची टक्केवारी देखील वाढली आहे. ज्याची भाजपनेत्यांनाही अपेक्षा नव्हती. या सगळ्यावर रिपाई नेते आठवले यांनी नुकतेच मुंबईत भाष्य केले आहे. गेली अनेक वर्षे आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर होतो. आमची मते त्यांना मिळत होती, परंतु आता आम्ही शिवसेना-भाजपबरोबर आहोत. महापालिका निवडणुकीत मात्र या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्याने आणि आमच्यातही बंडखोरी झाल्याने रिपाइंचे उमेदवार निवडून आले नाहीत, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी पुन्हा एकदा केला. मुंबई पत्रकार संघात आयोजित एका कार्यक्रमात शिवेसना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले एकत्र आले होते. याप्रसंगी आठवले म्हणाले की, ‘गड आला पण सिंह गेला’ अशी आमची अवस्था झ...

मी गर्दीशी बोलतोय....

रोजचा दिवस नवा, हे प्रत्येकालाच माहित आहे. त्यात मला सांगण्यासारखे वेगळे असे काही नाही. आजचा दिवसही कालच्या सारखाच गेला. रोजच्या नियमाप्रमाणे ऑफिसमध्ये आलो, ऑफिसामध्ये मला नेमून दिलेले काम पूर्ण केले आणि आता घरी जायची वेळ टळून गेली आहे. बरेच दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट दिल्या नाही म्हणून हा प्रपंच. आता मी मुंबई सोडून आठ-नऊ महिने झाले आहेत. आता मी माझ्या मुळ गावी म्हणजे औरंगाबादमध्ये आहे. एवढ्या दिवसांनी मी लिहित आहे, म्हणजे मुंबईत मुबलक वेळ होता असा त्याचा मुळीच अर्थ नाही. मुंबईतील पूर्णवेळ हा ऑफिससाठी होता. कारण तिथे मी ऑफिस संपल्यानंतर घरी जाऊन काय करु ? असा प्रश्न माझ्या समोर उभा राहात असे. (कधी कधी नरिमन पॉईंट - मंत्रालयाकडे चक्कर मारायला जायचो. तेवढाच काय तो विरंगूळा) त्यामुळे वाचन ब-यापैकी वाढलं होतं. हा ही त्या वेळेचा मला फायदा झाला. इथे म्हणजे औरंगाबादला मात्र ऑफिस व्यतीरिक्त अनेक कामे असतात, त्यामुळे कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर घरची आणि इतर काही महत्त्वाची कामे उरकण्यात दिवस निघून जातो आणि दुसरा दिवस उजाड़तो. पण, मी ही सर्वांचीच (कदाचित नसेलही. असे सन्माननीय अपवाद वगळून...