मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जयभीम : तुझी माझी अस्मिता आणि अस्तित्वाची ओळख

आज रात्री मस्त पैकी घरावर जाऊन थंडीत - गार हवेत सिगरेट ओढत कोक प्यावा वाटत आहे... घरी जाई पर्यंत दुकानं उघडी राहीली तर मनातला बेत नक्की पूर्ण करणार... वर्ष संपायला एकच दिवस उरला आहे आणि मला सुटी देखील आहे, त्यामुळे रात्री कितीही वेळ जागरण केले तरी उद्या वेळेवर उठण्याचे कंपल्शन नाही.  हे काय सांगत बसलो असे जर वाटत असेल तर,  मनातलं सांगण्यासाठीच तर ब्लॉग असतो. इथं नाही व्यक्त व्हायचं तर मग काय तयखाण्यात... आज 'जयभीम' या घोषणेला 75 वर्ष पूर्ण झाली. मराठवाड्याचे सुपूत्र भाऊसाहेब मोरे यांनी ३० डिसेंबर १९३८ साली तत्कालिन निजाम राजवटीच्या सीमेवरील गावात - कन्नड तालुक्यातील मक्रणपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित केली होती. ही सभा निजाम राजवटीविरोधात आणि दलित, शोषित, शेतमजुरांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्या काळात मराठवाड्यातील दलितांचे जोरजबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्यांना मुसलमान केले जात होते. या सर्वांच्या विरोधात सुशिक्षीत भाऊसाहेब मोरे यांनी बाबासाहेबांच्या उपस्थितीत परिषदेचे आयोजन केले होते. भाऊसाहेब तेव्हा शेड्युल्ड कास्ट फेड...

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मराठवाडा विकास कार्याला हार्दिक शुभेच्छा

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियोजन आयोग, यीपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेतील राष्ट्रीय सल्लागार परिषद यांसारख्या भारत सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांवर  आणि रिझर्व्ह बँकेसह देश-विदेशातील अविकसीत भागांच्या विकासासाठीच्या कामाचा अनुभव असलेले डॉ. नरेंद्र जाधव यांना लोकसभेचे वेध लागले आहेत. अर्थशास्त्र आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये डॉ. मनमोहन सिंह यांना गुरु मानणा-या डॉ. जाधवांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आज औरंगाबाद भेटीत त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्यत्व संपल्यानंतर मराठवाड्याच्या विकासासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. मराठवाडा हा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेतही मागे आहे. येथील समतोल विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर येथील मातीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षमता आणि माणसांमध्ये गुणवत्ता आहे. मात्र, येथील सर्वांगिण विकासासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छूक असलो तरी विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन का...

थीम पार्क 'आठवले'; उद्धव आठवलेंच्या मागणीला विसरले

चाळीशी. हा शब्द वयोमानाच्या स्वरूपात पाहिल्यास वृद्धत्वाकडे झुकणारा आहे.  काहीजण मात्र, चाळीशीतही विशीच्या जोशात असतात. त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडे. असो. चाळीशीबद्दल बोलण्यासाठी आजचा ब्लॉग नाही, याचे कारण वेगळेच आहे. माझा आजचा ब्लॉग हा चाळीसावा आहे, (शतकापासून केवळ साठी दूर आहे.)हे प्रकाशित करण्याच्या काही क्षण आधी कळाले आणि त्यासोबतच आजच बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे थोडासा 'योगायोग' हा शब्द आपल्या ब्लॉगवर असावा यासाठी हा खटाटोप.  तर, आजचा विषय आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या थीम पार्कची कल्पना आणि त्यांच्या नव्या मित्रपक्षाच्या मागणीकडे त्यांनी केलेला कानाडोळा. (याला योगायोग म्हणायचे की नाही हे तुम्हीच ठरवा.) नवा मित्र पक्ष म्हटल्यावर सुज्ञ वाचकांना कळाले असेलच, कोण आहे ते. त्यात तुमचा वेळ आणि माझे शब्द खर्च न करता त्यांची मागणी काय तेच सोंगतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम १५ ऑगस्ट पर्यंत सुरू करावे.  मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे शिवसेनेला थीम प...

मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-special-story-on-the-occasion-of-mothers-day-on-symbol-of-mothers-love-bibi-ka-m-4261608-PHO.html?SL1= "आई" या शब्दात आयुष्याचे सार सामावलले असते. लेकराच्या प्रत्येक इच्छा आकांक्षाची पूर्ती असते आई. ती कधीच स्वतःची नसते, तिचं संपूर्ण आयुष्य म्हणजे तिची मुलं असतात. ती मुलांच्या जवळ असली काय किंवा नसली काय, तिच्या मनात विचार फक्त मुलांचे असतात. याबद्दल प्रसिद्ध शायर निदा फाजली लिहितात, मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार दिल ने दिल से बात की बिन चिठ्ठी बिन तार या मातृदिनानिमीत्त आमच्या वेबसाईटसाठी (divyamarathi.com)मी औरंगाबादमधील एक पर्यटन स्थळ असलेल्या बीबी-का-मकबरा या मातृत्वप्रेमाची कथा सांगणा-या वास्तुबद्दल स्टोरी केली आहे. ही वास्तू म्हणजे, माता आणि पुत्र यांच्या प्रेमाचा अनमोल ठेवा आहे.   बीबी-का-मकबरा हे मातृप्रेमाचे प्रतिक आणि त्यासंबंधीची माहिती वरील लिंकवर आहे. लिंकला क्लिक करुन वाचा, मातृत्वप्रेमाचे प्रतिक 'बीबी-का-मकबरा' ! आणि आपला अभिप्राय नक्की कळवा.   

अजित पवारांची सरंजामशाही जनतेने उतरवावी... कोण राज ठाकरे ? प्रकाश आंबेडकरांशी एक संवाद

बाळासाहेब आंबेडकरांशी बोलायला मिळणे हा तसा आनंददायी क्षण. मानवमुक्तीचे उदगाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते वंशज म्हणून त्यांचे महत्त्व आहेच, त्याशिवाय बाळासाहेबांनी विचारवंत आणि ध्येयनिष्ठ आणि कणा असलेले राजकीय नेते म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा श्रध्देय नेत्याशी बोलण्याची ८ एप्रिल रोजी संधी मिळाली. माझे वडील अँड. रमेशभाई खंडागळे लिखित 'एकीत जय आणि बेकीत क्षय' पुस्तक प्रकाशनानिमीत्त औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहावर त्यांची भेट झाली. जवळपास तासभर त्यांच्या सहवासात होतो. त्यावेळी ते मराठवाडा आणि औरंगाबाद येथील अनेक कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करत होते. कार्यकर्त्यांच्या अडचणी-समस्या समजून घेऊन त्यावर तत्काळ उपाय सुचवत होते. काहीवेळेस ज्यांच्या मार्फत या समस्या सुटतील अशा मंत्री, प्रशासकीय अधिकारी उच्चपदस्थ राजकारणी यांना फोनवर सुचना देत होते.  माझे वडील रमेशभाई यांच्यामुळे सूर्यकुळातील या राजहंसाशी मी संवाद साधला. तो नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांची ज्या खालच्या थरावर जावून टिंगल उडविली त्याविषयी. त्यासोबतच ओघाने आले...

हक्क कोणाचा... अन् भंग कोणाचा ?

२३ मार्च १९३१  रोजी भगतसिंग - राजगुरू - सुखदेव या तीन क्रांतिवीरांना इंग्रज सरकारने फाशी दिली होती. उद्या तो शहिद दिवस आहे. त्यांच्या सारखेच आता विधानसभेत बॉम्ब टाकावा असे वाटत आहे. त्यांनी जरी फक्त सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी धुरांचा बॉम्ब फेकला होता, तरी आता फेकला जाणारा बॉम्ब तिथल्या सर्व आमदारांना मुळापासून संपवणारा असावा असे वाटते. कोणत्याही मद्यावर या आमदारांची तोंडे पन्नास दिशांना असतात मात्र, पत्रकारांच्या हक्कभंगाविरोधात ते सर्व एकत्र येतात या पेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते काय ? एकाही आमदाराराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड असू नये. केवळ यांचेच जनतेने आणि पत्रकारांनी ऐकावे अशीच यांची अपेक्षा आहे का ?  त्यांच्या विरोधात काही बोलयचेच नाही का ? हे कुठले तुर्रमख्खा लागून गेले ? महाराष्ट्र राज्याचे राजकारण एवढ्या रसातळाला गेले आहे की, ज्या वास्तूत बसून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावे त्याच वास्तूत एका पोलिस अधिका-यावर हात उगारले गेले. तेही एक दोघांनी नाही तर, पाच-पंचविस आमदारांनी.  कोणी दुस-याने हे कृत्य केले असते तर, गोष्ट वेगळी होती मात्र, कायद्याचे राज्य ...

ग्राहक राजा... जागा हो !

आज जागतिक ग्राहक दिन आहे. ग्राहकाच्या हक्कांचे रक्षण करणारे अनेक कायदे राज्य आणि केंद्र सरकार कडून केले जात आहेत. उत्पादन निर्माते आणि दुकानदारही ग्राहकाला देव म्हणत त्याला मोठा मान-सन्मान देतात आणि हळूच त्याच्या खिशाला अशी काही कात्री लावतात की, त्याला कळत सुद्धा नाही की, आपण लुबाडल्या गेलो आहोत. सध्या कोणत्याही मौल्यवान वस्तुच्या खरेदीला गेल्यानंतर दुकानदाराकडून एक वाक्य हमखास फेकले जाते, साहेब-बाईसाहेब हौसेला कुठे मोल असते का ? अरे बाबा, हौसेला मोल नसते हे मान्य आहे. पण हौस कोणाची होत आहे आणि फजिती कोणाची एवढे कळण्याची तरी आम्हाला उसंत देत जा ! आज सकाळी साधरण दहा-सव्वा दहाची वेळ होती, औरंगाबादच्या मुख्य बाजारपेठेतली एका दुकानात गेलो होतो. नेमकेच दुकान उघडले गेले होते. दुकानातील सामानावरील धुळ झटकण्याचेच काम सुरु होते. तेव्हाच तेथील एका महिला कर्मचा-याला एक महाविद्यालयीन मुलगा म्हणाला, मला ती वस्तू द्याना.. तेव्हा थोड्या चढ्या आवाजातच ती महिला बोलली त्यावर दुकानाचे मालक शांतपणे त्या महिलेला म्हणाले, त्यांना घाई असेल लवकर आवर आणि त्यांना काय हवे ते दे.. तेव्हा असे वाटले की, किती...

करार

२०१३ हे अजून एक नवे वर्ष सुरु झाले. कित्येकांनी अनेक संकल्प केले असतील. (त्याला काहीजण 'संकल्प सोडला' असेही म्हणतात! संकल्प सोडला म्हटल्यावर पुढे त्याचा पाठपुरावा करण्याची गरजच काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो. असो. ) कॉलेजात असताना अनेक वेळेस सकाळीच उठून व्यायाम करण्याचा संकल्प कित्येक वर्ष नित्यनियमाने केला होता, आणि नित्यनियमाने त्यात विसरही पडत आला आहे. आताही काही त्रास जाणवला की, व्यायाम करण्याचा संकल्प केला जातो आणि जेवढ्या तत्परतेने संकल्प केला जातो तेवढ्याच तत्परतेने तो विसरला देखील जातो. असे नव वर्षाच्या संकल्पांचे आणि माझे आतापर्यंतचे नाते राहीलेले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून संकल्प न करण्याचाच संकल्प केला आहे. मात्र, वरील सवयीप्रमाणे हा संकल्पही मोडीत निघतोच. असो. हे संकल्पाचे प्रवचन कितीही लांबवले तरी लांबतच राहील. मी स्वतःला बौद्ध धम्माचा अनुयायी समजतो. तसा जन्मानेच बौद्ध असल्यामुळे त्यात मी काही समजण्याचा प्रश्न उरतच नाही. पण, मी बौद्ध आहे म्हणजे नेमका कोण आहे? भगवान बुद्धांचा जयघोष आणि बाबासाहेबांचा विजय असो किंवा उठता-बसता जयभीम. सालाबादाप्रमाणे येणा...